शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
2
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
3
३ तासांत चेकद्वारे पैसे मिळणार का? आरबीआयने ऐनवेळी घेतला मोठा निर्णय, वाचा नवे परिपत्रक
4
तैवानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, समोर आला इमारत हलतानाचा धडकी भरवणारा VIDEO
5
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
6
मेहुण्याचा जाच आणि भावाचा राग! दारू पाजली अन् सपासप केले वार; वादाचं कारण ऐकून होईल संताप
7
घटस्फोटानंतर मुलांपासून दूर झाली अभिनेत्री, पतीने ख्रिसमसलाही भेटू दिलं नाही; म्हणाली...
8
एक दोन नाही...! पंधरा राज्यांमध्ये बहिणी झाल्या लाडक्या; त्या कुठे कुठे करतात खर्च...
9
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
10
'धुरंधर'च्या FA9LA गाण्यावर स्वत:च्याच लग्नात नाचला मराठी अभिनेता, सगळे बघतच राहिले, व्हिडीओ व्हायरल
11
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
12
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
13
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
14
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
15
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
16
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
17
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
18
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
19
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
20
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
Daily Top 2Weekly Top 5

प्रकल्पांच्याच घशाला कोरड

By admin | Updated: May 31, 2014 00:32 IST

उस्मानाबाद : गतवर्षी अर्ध्या जिल्ह्यात सरासरीच्या आसपास पाऊस झाला. तर अर्ध्यापेक्षा अधिक भागात अत्यल्प पावसाची नोंद झाली होती.

उस्मानाबाद : गतवर्षी अर्ध्या जिल्ह्यात सरासरीच्या आसपास पाऊस झाला. तर अर्ध्यापेक्षा अधिक भागात अत्यल्प पावसाची नोंद झाली होती. त्यामुळेच भूम, वाशी, कळंब या तालुक्यातील बहुतांश लहान मोठे प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले होते. आजघडीला प्रकल्पातील पाणी पातळी चिंताजनक आहे. मध्यम व लघु असे ६९ प्रकल्प कोरडेठाक पडले आहेत. परिणामी टंचाईचे संकट दिवसागणिक गडद होऊ लागले आहे. भूम, वाशी, परंडा आणि कळंब या तालुक्यामध्ये गतवर्षी अत्यल्प पाऊस झाला होता. त्यामुळेच या तीन-चार तालुक्यातील जवळपास ८४ गावांना अधिग्रहण व टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात आहे. दिवसागणिक टँकरची संख्या वाढू लागली आहे. कारण या परिसरातील जलस्त्रोतही तितक्याच झपाट्याने कोरडेठाक पडत आहेत. धरणांची पाणीपातळीही त्याच गतीने कमी होऊ लागली आहे. जिल्हाभरात लहान-मोठे व मध्यम प्रकल्पांची संख्या २११ इतकी आहे. यामध्ये १७ मध्यम प्रकल्पांचा समावेश आहे. या प्रकल्पांची साठवण क्षमता २०२.८५९ दलघमि इतकी आहे. प्रत्यक्षात आजघडीला १८.५७७ दलघमि इतका अत्यल्प साठा आहे. लघु प्रकल्पाच्या बाबतीतही काही वेगळे चित्र नाही. १९३ प्रकल्पात प्रत्यक्ष २६.०१९ इतकाच साठा उपलब्ध आहे. दरम्यान, २११ पैकी ६९ प्रकल्पात पाण्याचा टिपूसही शिल्लक राहिलेला नाही. यामध्ये ६५ लघु तर ४ मध्यम प्रकल्पांचा समावेश आहे. तसेच ६२ प्रकल्पांची पाणीपातळी जोत्याखाली गेली आहे. तर ४ लघु मध्यम प्रकल्पामध्ये ५० टक्केच्या आसपास पाणीसाठा आहे. प्रकल्पाची पाणीपातळी झपाट्याने खालावत असल्याने त्या-त्या भागातील विहिरी, हातपंप हेही तेवढ्याच गतीने बंद पडू लागले आहेत. त्यामुळे जलसंकट दिवसागणिक तीव्र होऊ लागले आहे. भूम तालुक्यामध्ये सध्या २४ गावे आणि ९ वाड्यांना २७ टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. विशेष म्हणजे गतवर्षीही या तालुक्यातील ग्रामस्थांनी टंचाईच्या तीव्र झळा सोसल्या आहेत. यावर्षीही त्यापेक्षा काही वेगळी स्थिती नाही. डिसेंबर महिन्यापासून वालवड सर्कलमधील काही गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. कळंब तालुक्यातही टँकरची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. सध्या १४ गावांची तहान ६४ अधिग्रहण आणि १८ टँकरच्या माध्यमातून भागविली जात आहे. परंडा तालुक्यातील टँकरचा आकडा दोनवरुन पाचवर जाऊन ठेपला आहे. तसेच दोन जलस्त्रोतांचे अधिग्रहण करण्यात आले आहे. या माध्यमातून पाच गावांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे. वाशी तालुक्यात ९ टँकर सुरु आहेत. तसेच ८ स्त्रोतांचे अधिग्रहण करण्यात आले आहे. या माध्यमातून १२ गावांना पाणीपुरवठा केला जात आहे. टंचाईग्रस्त गावांची संख्या दिवसागणिक वाढू लागली आहे. भविष्यात वेळेवर पाऊस न पडल्यास हे जलसंकट अधिक गडद होऊ शकते. (प्रतिनिधी)