शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
4
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
5
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
6
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
7
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
8
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
9
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
10
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
11
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
12
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
13
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
14
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
15
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
16
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
17
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
18
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
19
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
20
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
Daily Top 2Weekly Top 5

बायोगॅस निर्मिती... एलपीजीपासून मुक्ती...

By admin | Updated: May 10, 2016 00:57 IST

औरंगाबाद : रोजच्या रोज कचरा निर्माण होण्याचे अनेक स्रोत आहेत. यापैकी सर्वांत मोठा स्रोत म्हणजे स्वयंपाकघरातून निघणारा कचरा

औरंगाबाद : रोजच्या रोज कचरा निर्माण होण्याचे अनेक स्रोत आहेत. यापैकी सर्वांत मोठा स्रोत म्हणजे स्वयंपाकघरातून निघणारा कचरा. रोज घरातून निघणाऱ्या कचऱ्यापैकी ४० टक्के कचरा स्वयंपाकघरातून निघतो. या ४० टक्के कचऱ्याचे जरी रोज योग्य व्यवस्थापन झाले, तरी बहुतांश प्रमाणात कचऱ्याची समस्या सुटू शकते. त्यामुळेच ‘बायोगॅस निर्मिती’ हा घनकचरा व्यवस्थापनाचा सर्वोत्तम पर्याय म्हणून समोर येऊ पाहतो आहे. बायोगॅसमुळे कचऱ्याची विल्हेवाट तर लागतेच, शिवाय अन्न शिजविण्यासाठीही त्याचा उपयोग होतो. बायोगॅस निर्मितीचे मॉडेल :बायोगॅस निर्मितीसाठी पाणी भरण्यासाठी वापरण्यात येणारा प्लास्टिकचा मोठ्या आकाराचा ड्रम वापरण्यात येतो. घराच्या अंगणात, गच्चीवर किंवा बाल्कनीमधील जागेत हा ड्रम ठेवता येऊ शकतो. या ड्रमच्या झाकणाला वरच्या दिशेला एक छिद्र पाडण्यात येते. या छिद्रामध्ये नरसाळे अडकवण्यात येते. रोजचा कचरा ड्रमचे झाकण उघडून थेट न टाकता या नरसाळ्यातून टाकावा लागतो. कचरा टाकल्यावर हे छिद्र बंद करावे. याच झाकणाला अजून एक छिद्र पाडण्यात येते, त्या छिद्रात एक पाईप अडकवला जातो. या पाईपचे दुसरे तोंड एका मोठ्या आकाराच्या रबरी पिशवीत उघडते. ड्रममध्ये तयार होणारा बायोगॅस या पाईपच्या माध्यमातून रबरी पिशवीत वाहून आणला जातो. या रबरी पिशवीला आणखी एक दुसरा पाईप लावतात. त्या पाईपचे दुसरे टोक बायोगॅस शेगडीला लावण्यात येते. या प्लास्टिकच्या ड्रमला एक छोटेसे आऊटलेट असते. यामधून कचऱ्यातून तयार होणारे पाणी बाहेर पडते. बायोगॅस निर्मितीसाठी वापरण्यात येणारा कचरा :उरलेले अन्न, शिळे किंवा कुजलेले अन्न, फळांची साले, टरफले, पालेभाज्यांच्या काड्या, झाडांची सुकलेली पाने, गवत, चहा करून उरलेली चहा पावडर. 1बायोगॅस निर्मितीचे हे मॉडेल आपल्या घरात बसवल्यानंतर सुरुवातीला पंधरा ते वीस दिवस या ड्रममध्ये नित्यनेमाने स्वयंपाकघरात निर्माण होणारा कचरा टाकावा. ज्या ठिकाणी बायोगॅसचे अशा प्रकारचे मॉडेल आधीपासून कार्यरत आहे, त्या ड्रममधील कचऱ्यातून निर्माण होणारे थोडे पाणी या नव्या ड्रममध्ये टाकावे. 2ज्याप्रमाणे दुधापासून दही बनवताना दुधात विरजण म्हणून थोडे दही टाकतात, त्यासारखाच हा प्रकार आहे. पंधरा-वीस दिवसांच्या काळात ड्रममध्ये टाकलेला कचरा कुजतो आणि त्यापासून वायूची निर्मिती होते. 3हाच वायू रबरी पिशवीत जमा होत जातो. ही पिशवी बायोगॅस भरून पूर्णपणे फुगली की मग बायोगॅस शेगडी वापरायला सुरुवात करावी. साधारणत: रोज अर्धा किलो ओला कचरा टाकल्यावर पंधरा मिनिटांसाठी गॅस चालेल, एवढा बायोगॅस निर्माण होतो. एका घरातून रोज एवढा कचरा निघणे शक्य आहे. रोज अंदाजे ६ ते ८ किलो ओल्या कचऱ्यापासून दोन ते अडीच तास गॅस चालेल, एवढ्या बायोगॅसची निर्मिती होते. एका कुटुंबातून एवढा ओला कचरा रोज निर्माण होत नसल्याने भाजीविक्रेते, हॉटेलचालक, मेसचालक किंवा शेजारी आदींची आपण मदत घेऊ शकतो. त्यामुळे पर्यायाने त्यांच्याकडून निघणाऱ्या कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन तर होईलच, शिवाय बायोगॅसची निर्मितीही मोठ्या प्रमाणावर होईल.