शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

दहावीचे परीक्षा फॉर्म भरताना दमछाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2017 01:17 IST

दहावीच्या परीक्षेचे अर्ज यावर्षीपासून आॅनलाईन भरण्यात येत आहे. हे अर्ज भरण्यासाठी आधार क्रमांक बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र, ग्रामीण भागात इंटरनेट सुविधेचा अभाव, आधार क्रमांक नसल्यामुळे शिक्षक व विद्यार्थ्यांची धावपळ होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : दहावीच्या परीक्षेचे अर्ज यावर्षीपासून आॅनलाईन भरण्यात येत आहे. हे अर्ज भरण्यासाठी आधार क्रमांक बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र, ग्रामीण भागात इंटरनेट सुविधेचा अभाव, आधार क्रमांक नसल्यामुळे शिक्षक व विद्यार्थ्यांची धावपळ होत आहे. त्यातच ऐन दिवाळीच्या सुट्यांमध्ये ही प्रक्रिया राबवली जात असल्याने विद्यार्थ्यांना सुट्यांमध्ये शाळेत जावे लागत आहे.डिजिटल इंडियाच्या नावाखाली प्रत्येक काम आॅनलाइन करण्याचा आग्रह शासनाचा आग्रह असून, त्याची सक्तीने अंमलबजावणीही केली जात आहे. मात्र, त्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधाच उपलब्ध नसल्याने आॅनलाईन कामे करताना संबंधित यंत्रणेची गैरसोय होत आहे. दहावीच्या परीक्षेचे आॅनलाईन फॉर्म भरताना शिक्षक व विद्यार्थ्यांची अशीच तारांबळ उडत आहे. १६ आॅक्टोबर ते ६ नोव्हेंबर दहावीचे परीक्षेचे अर्ज भरण्याची अंतिम तारीख आहे. तर विलंब शुल्कासह विद्यार्थ्यांना १४ नोव्हेंबरपर्यंत अर्ज भरता येणार आहेत. आॅनलाईन परीक्षा फॉर्म भरण्याची जबाबदारी शाळांची आहे. फॉर्म भरताना प्रथमच आधार क्रमांक भरणे बंधनकारक करण्यात आले आहे. ज्या विद्यार्थ्यांकडे आधार क्रमांक नाही त्यांना शपथपत्र सादर करावे लागत आहे. यासाठी विद्यार्थ्यांसह पालकांना धावपळ करावी लागत आहे. तसेच परीक्षा अर्जात विद्यार्थ्यांचे जन्म ठिकाणाची नोंद करणे अनिवार्य करण्यात आले आहे. ऐन दिवाळीच्या सुट्यांमध्ये अर्ज भरण्याची ही प्रक्रिया राबवली जात आहे. ग्रामीण भागात असणा-या इंटरनेट सुविधा मिळत नाही. बहुतांश शाळांमध्ये इंटरनेट सुविधाही नाही. त्यामुळे शिक्षकांना तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या इंटरनेट केंद्रावर जावे लागत आहे. शिवाय इंटरनेट वापरासाठी अनेकदा मुख्याध्यापक व शिक्षकांनी स्वत:च्या खिशातून पैसे भरावे लागत आहेत.