शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
3
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
4
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
5
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
6
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
7
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
8
आयोग नव्हे, मतदारच राजा !
9
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
10
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
11
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
12
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
13
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
14
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
15
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
16
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
17
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
18
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
19
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
20
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रोहित्र मिळण्यास येताहेत अडचणी

By admin | Updated: November 17, 2015 00:28 IST

जालना : खरीप हंगामानंतर रबी हंगामात तरी काही कसर भरून निघेल हा शेतकऱ्यांचा अंदाजही फोल ठरण्याची भीती आहे. महावितरणच्या दोन्ही विभाग मिळून

जालना : खरीप हंगामानंतर रबी हंगामात तरी काही कसर भरून निघेल हा शेतकऱ्यांचा अंदाजही फोल ठरण्याची भीती आहे. महावितरणच्या दोन्ही विभाग मिळून दीडशेपेक्षा अधिक रोहित्रांना दुरूस्तीची प्रतीक्षा आहे. महावितरणचा कारभारही यासाठी कारणीभूत ठरत असल्याचा आरोप शेतकऱ्यांतून होत आहे.जालना जिल्ह्यात महावितरणच्या विभाग एक व दोन अंतर्गत वीजपुरवठा होतो. विभाग एक अंतर्गत जालना, बदनापूर, भोकरदन व जाफराबाद तर विभाग दोन अंतर्गत मंठा, परतूर, घनसावंगी अंबड या तालुक्यातील गावांचा समावेश आहे. ग्रामीण भागातील शेकडो रोहित्र जळाले आहेत. विजेचा कमी दाब व तांत्रिक बिघाडामुळे रोहित्र जळण्याचे प्रमाण वाढत आहे.याचा परिणाम पिकांना पाणी देण्यावर होत आहे. रबी हंगामातील गहू, हरभरा तसेच इतर पिकांना पाणी देण्याची नितांत गरज आहे. परंतु रोहित्र जळाल्याने पिके धोक्यात आली आहेत. विभाग एक अंतर्गत १०० केव्हीएचे ३८ तर ६३ केव्हीएचे २८ रोहित्रांची दुरूस्ती बाकी असून, ती लवकरच दुरूस्त होतील असा अंदाज विभाग एकचे कार्यकारी अभियंता भालशंकर यांनी सांगितले. तर विभाग दोनचे कार्यकारी अभियंता पवार म्हणाले की आमच्या विभागात १०० केव्हीएचे १७ तर ६३ चे २२ रोहित्रांची दुरूस्ती झालेली नाही. (वार्ताहर)