शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
3
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
4
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
5
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
6
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
7
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
8
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
9
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
10
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
11
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
12
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
13
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
14
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
15
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
16
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
17
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
18
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
19
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
20
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका

जीएसटीच्या अंमलबजावणीतील चुकीमुळे देश आर्थिक संकटात - पृथ्वीराज चव्हाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2017 20:50 IST

वस्तू व सेवाकर (जीएसटी) ही ऐतिहासिक नवीन करप्रणाली आहे. करप्रणाली चांगली आहे पण केंद्र सरकारने त्याची अंमलबजावणी अत्यंत चुकीच्या पद्धतीने केली आहे. परिणामी, संपूर्ण देशात आर्थिक संकट निर्माण झाले आहे.

ठळक मुद्देजीएसटी ही ऐतिहासिक नवीन करप्रणालीअंमलबजावणी अत्यंत चुकीच्या पद्धतीने अमेरिकी बँकांनी मोदींना गंडावले

औरंगाबाद : वस्तू व सेवाकर (जीएसटी) ही ऐतिहासिक नवीन करप्रणाली आहे. करप्रणाली चांगली आहे पण केंद्र सरकारने त्याची अंमलबजावणी अत्यंत चुकीच्या पद्धतीने केली आहे. परिणामी, संपूर्ण देशात आर्थिक संकट निर्माण झाले आहे. सरकार हट्टी असल्याने ते विरोधी पक्षांनी सुचविलेले सुधारणा मान्यास तयार नाही. भारतीय अर्थव्यवस्था पुन्हा प्रगतीपथावर आणण्यासाठी आता जनतेने एकत्र येऊन सरकारवर दबाव आणला पाहिजे, असे स्पष्ट विचार माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी येथे मांडले.भारतीय अर्थव्यवस्था, भूतकाळ, वर्तमानकाळ व भविष्यकाळ या विषयांवरील गुरुवारी सायंकाळी आयोजित व्याख्यानात त्यांनी उद्योजक, व्यापारी, सीए, करसल्लागार यांना मार्गदर्शन केले. या व्याख्यानाचे आयोजन जिल्हा व्यापारी महासंघ, सीए संघटना व कर सल्लागार संघटनेच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. जीएसटीमुळे उद्योग, व्यवसायात निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीवरील भाष्य करणा-या व भविष्यातील अर्थव्यवस्थेचे वेध घेणा-या हे व्याख्यान ऐकण्यासाठी तापडिया नाट्यमंदिर हाऊसफुल झाले होते. चव्हाण पुढे म्हणाले की, जीएसटीच्या अमलबजावणीसाठी दोन ते तीन महिन्याचा अवधी वाढवून देणे आवश्यक होते. २००३ ते २०१० पर्यंत अर्थिक विकास सुवर्णकाळ मानला जातो. या कालावधीत जीडीपी ९ टक्कांपर्यंत जाऊन पोहोचला. मागील तीन वर्षात जीडीपीदर वेगाने खाली उतरला आहे. यावर्षीच्या पहिल्या तिमाहीत अवघ्या ५.७ टक्केवर पोहोचला आहे. सरकार जीडीपीदर फुगवून सांगत आहे. मुळात ३.५ टक्क्यांपर्यंत जीडीपीदर खाली येऊन ठेपला आहे. जीएसटीच्या चुकीच्या अंमलबजावणीचा फटका संपूर्ण देशवासीयांना भोगावा लागत आहे.अर्थव्यवस्थेत सुधारणा येण्यासाठी आणखी दोन तिमाही लागणार आहे. जीएसटीचा घाईत निर्णय घेण्यात आला. सरकारी अधिका-यांना त्याविषयी अधिक माहिती नाही, सॉफ्टवेअर सिस्टीम सक्षम नाही, असेही त्यांनी विविध उदाहरण देऊन देशाची अर्थव्यवस्थेची सत्यपरिस्थिती समोर मांडली. प्रास्ताविकात, जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष अजय शहा म्हणाले की, जीएसटीच्या चुकीच्या अंमलबजावणीचा ताण उद्योग-व्यापा-यांवर आला आहे. व्यवसायिकांची मर्यादा लक्षात घेण्यात येत नाही. अंतर्गत व्यापार धोरण राबवा व व्यापाºयांना नफा नको करवसूलीतील कमिशन द्या, अशी मागणी त्यांनी केली. प्रमुख पाहूण्यांचा परिचय सीए संघटनेचे अध्यक्ष अल्केश रावक यांनी केले. यावेळी आ. अब्दुल सत्तार, आ. सुभाष झांबड, माजी आमदार कल्याण काळे, महाराष्ट्र चेंबरचे माजी अध्यक्ष मानसिंग पवार, राम भोगले आदीं उद्योजक,व्यापारी,सीएची उपस्थिती होती.अमेरिकी बँकांनी मोदींना गंडावलेनोटाबंदीच्या विषयावर पृथ्वीराज चव्हाण यांनी आरोप केला की, नोटाबंदीचा निर्णय अत्यंत चुकीच्या पद्धतीने हाताळण्यात आला. अमेरिकी बहुराष्ट्रीय बँकांनी क्रेडीट कार्ड खपविण्यासाठी नोटाबंदी अंमलात आणण्याचा चुकीचा सल्ला देऊन मोदींना गंडावले. क्रेडीट कार्डच्या व्यवहारावरील कमिशन नियंत्रणात आणण्याचा सल्लाही चव्हाण यांनी दिला.

टॅग्स :Prithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाण