शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
2
रोहित शर्मा पुन्हा बनला कर्णधार, मिळाला नवा 'ओपनिंग पार्टनर'; Playing XI मध्ये आणखी कोण?
3
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
4
VIDEO: शत्रूवरही अशी वेळ नको रे देवा... नवरदेवाची भर लग्नमंडपात होणाऱ्या बायकोसमोर 'फजिती'
5
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
6
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
7
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
8
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
9
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
10
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
11
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
12
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
13
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
14
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
15
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी
16
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
17
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
18
निष्काळजीपणाचा बळी! इमारतीवरून वीट डोक्यात पडल्याने संस्कृतीचा करुण अंत, जोगेश्वरीतील घटनेने खळबळ
19
Nobel Prize: सुसुमू कितागावा, रिचर्ड रॉबसन आणि उमर याघी यांना रसायनशास्त्रातील नोबेल जाहीर
20
“पंतप्रधानांचा हात लागतो त्याचे सोने होते, नरेंद्र मोदी हे विकासाची आंधी”: DCM एकनाथ शिंदे

पंतप्रधान आवास; ८० हजार अर्ज; नियोजन शून्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2018 22:47 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२२ पर्यंत ‘मागेल त्याला घर’ या घोषणेप्रमाणे पंतप्रधान आवास योजना सुरू केली. या योजनेला औरंगाबाद शहरात भरभरून प्रतिसाद मिळाला. तब्बल ८० हजार नागरिकांनी महापालिकेकडे आॅनलाईन पद्धतीने अर्ज दाखल केले. मनपा प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे योजनेला अद्याप मुर्हूतच सापडलेला नाही.

ठळक मुद्देमनपाचीच अनास्था : बांधकाम व्यावसायिकांनाच दोषी ठरविले

औरंगाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२२ पर्यंत ‘मागेल त्याला घर’ या घोषणेप्रमाणे पंतप्रधान आवास योजना सुरू केली. या योजनेला औरंगाबाद शहरात भरभरून प्रतिसाद मिळाला. तब्बल ८० हजार नागरिकांनी महापालिकेकडे आॅनलाईन पद्धतीने अर्ज दाखल केले. मनपा प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे योजनेला अद्याप मुर्हूतच सापडलेला नाही. शनिवारी स्थायी समितीच्या बैठकीत नगरसेवकांनी प्रशासनाच्या कारभाराची चिरफाड केली. प्रशासनानेही या योजनेत बांधकाम व्यावसायिक सहकार्य करीत नसल्याचे सांगितले. विशेष बाब म्हणजे सत्तेत असलेल्या भाजपनेही या स्तुत्य उपक्रमासाठी पुढाकार घेतला नाही.पंतप्रधान आवास योजनेंतर्गत शहरातील बेघर नागरिकांकडून २०१६-१७ मध्ये आॅनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले होते. त्याला भरभरून प्रतिसाद मिळाला. तब्बल ८० हजार अर्ज दाखल झाले. या अर्जांचे पुढे काय झाले? असा प्रश्न शनिवारी स्थायी समितीच्या बैठकीत नगरसेवकांनी उपस्थित केला. उपअभियंता शेख खमर यांनी खुलासा केला की, अर्जांची छाननी करून पाच हजार घरांसाठी डीपीआर (प्रकल्प आराखडा) तयार करून तो मुंबई येथे म्हाडाकडे पाठविला होता. असंख्य नागरिकांकडे मालकी हक्काचा पुरावा (रजिस्ट्री, पीआर कार्ड) नाही. त्यामुळे त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही. महापालिकेने दाखल केलेल्या पाच हजार प्रस्तावांमध्ये २० बाय ३० आकाराच्या म्हणजेच बॉण्ड पेपरवरील घरांचा अधिक समावेश होता. त्यामुळे हा प्रस्ताव रद्द करण्यात आला आहे. नव्याने प्रस्ताव पाठविण्यात येत असल्याचे त्यांनी नमूद केले. बिल्डरांच्या भागीदार योजनेतही मनपाने वारंवार बैठका घेतल्या. त्याला प्रतिसाद मिळाला नाही. बिल्डर भागीदार योजनेत मनपाकडे प्राप्त अर्जांमध्ये ५२ हजार नागरिकांचा समावेश आहे. योजनेच्या या परिस्थितीमुळे सभापतींनी यासंदर्भातील सविस्तर प्रस्ताव सर्वसाधारण सभेसमोर सादर करण्याचे निर्देश दिले.मुख्यमंत्र्यांची सूचनामुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन महिन्यांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात मनपासोबत आढावा घेतला होता. यावेळी मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान आवास योजनेवर विशेष लक्ष केंद्रित करा, अशी सूचना केली होती. त्यानंतरही महापालिकेने ठोस उपाययोजना केली नाही. निव्वळ कागदी घोडे नाचविणे सुरू केले आहे.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाCentral Governmentकेंद्र सरकार