शहरं
Join us  
Trending Stories
1
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
2
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
3
उल्हासनगरात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! पत्नी व मुलीची हत्या करून पवन पाहुजा यांनी घेतला गळफास
4
Video - दहशतवाद्याच्या हातात बंदूक, चेहऱ्यावर भीती...; त्राल चकमकीचं ड्रोन फुटेज आलं समोर
5
WTC Finalच्या विजेत्याला मिळणार मोठ्ठी रक्कम, टीम इंडियाही मालामाल, पाकिस्तानला किती बक्षीस?
6
आमिर खान-राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र, महाराष्ट्राच्या 'या' सुपुत्रावर घेऊन येणार बायोपिक!
7
पाकिस्तानातून गाढवांची खरेदी का करतो भारताचा शेजारी देश? काय आहे चिनी कनेक्शन?
8
इंग्लंड दौऱ्याआधी टीम इंडियाचा कोच गौतम गंभीरने पत्नीसह घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन
9
सोशल मीडियावर लाईव्ह होती प्रसिद्ध इन्फ्लुएंसर, भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने आलेल्या इसमाने झाडल्या गोळ्या!
10
Swami Samartha: स्वामी कृपा व्हावी वाटत असेल तर त्यांना नावडणारी 'ही' गोष्ट ताबडतोब सोडा!
11
कहाणी १९६५ च्या युद्धाची! आदमपूर एअरबेसवर कब्जा करण्यासाठी उतरले ५५ पाकिस्तानी कमांडो, १२ ठार तर बाकी...
12
मुकेश अंबानी यांनी घेतली डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; आखाती देशात किती पसरलाय व्यवसाय?
13
IAS-IPS बनण्याची सूवर्णसंधी; UPSC ने जारी केले परीक्षांचे वेळापत्रक, जाणून घ्या संपूर्ण माहिती...
14
Sensex मध्ये १३०० तर Nifty मध्ये ४०० अंकांपेक्षा अधिक तेजी, काय आहे तेजीमागचं कारण?
15
राजस्थानात पाकिस्तान सीमेपासून १५ किमी दूर कोसळलेला ड्रोन सापडला; बीएसएफकडून चौकशी सुरु
16
समुद्राचे खारट पाणी गोड करता येणार; तटरक्षक दल, डीआरडीओच्या संशोधकांना मोठे यश
17
'पाकिस्तानची अवस्था घाबरलेल्या कुत्र्यासारखी', अमेरिकेतील माजी अधिकाऱ्याने पार इज्ज काढली
18
अवघ्या २३ वर्षांच्या मुलीने लावली पाकिस्तान-बांगलादेशच्या नात्यात आग! राजदूतांना काढावा लागला पळ
19
संकष्ट चतुर्थी २०२५: एकदंत संकष्ट चतुर्थी असणार खास, 'या' राशींची पूर्ण होणार धन-संपत्तीची आस!

डाळिंबाचे भाव गडगडले

By admin | Updated: September 11, 2014 00:36 IST

जालना : जिल्ह्यात डाळिंबाची वाढलेली आवक तसेच उत्पादन यामुळे डाळिंबास अत्यल्प भाव मिळत आहे. त्यामुळे उत्पादक शेतकरी पुरते धास्तावले आहेत.

जालना : जिल्ह्यात डाळिंबाची वाढलेली आवक तसेच उत्पादन यामुळे डाळिंबास अत्यल्प भाव मिळत आहे. त्यामुळे उत्पादक शेतकरी पुरते धास्तावले आहेत. बहुतांश शेतकऱ्यांनी रस्त्याच्या कडेला डाळिंब विक्री सुरु केली आहे. जालना जिल्ह्यात गत काही वर्षांपासून अनेक शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकांना फाटा देत डाळिंब, मोसंबी, चिकू तसेच फुल शेती सारख्या नगदी पिकांना प्राधान्य देत आहेत. या शेतीतून शेतकरी आर्थिक उन्नतीही साधत आहे. मात्र अस्मानी अथवा सुलतानी कारभारामुळे हे शेती धोक्यात येत आहे. गत काही दिवसांपासून डाळिंब उत्पादकांना मोठ्या आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागत आहे. शेतकऱ्यांना अक्षरश: वीस ते पंचवीस रुपये प्रतिकिलो भावाने डाळिंब विक्री करावी लागत आहे. काही शेतकरी डाळिंबाचे ढिगारे रस्त्यावर सोडून जात आहेत. एकूणच डाळिंब शेती चांगलीच अडचणीत आली आहे. जिल्ह्यात साधारणपणे २ हजार हेक्टरवर डाळिंब शेती केली जाते. उत्पादनही चांगले निघते. कृषी विभागाकडून डाळिंब शेतीला प्रोत्साहन तसेच निर्माण झालेल्या परिस्थितीवर उपाययोजना करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.घनसावंगी तालुक्यातील राहेरा येथील प्रगतशील शेतकरी सरपंच पंडितराव धांडगे म्हणाले, जिल्ह्यात डाळिंबाच्या उत्पादनात मोठी वाढ झाली आहे. यामुळे भाव अत्यल्प मिळत आहे. गत काही वर्षातील डाळिंब हे मोठे नुकसान आहे. शासनाने मदत करण्याची गरज आहे.अंबड तालुक्यातील प्रगतशील शेतकरी माजी सभापती सतीश होंडे म्हणाले, की शासनाने निर्यातबंदी केल्याने डाळिंबाचे भाव कमालीचे गडगडले आहेत. शेतकऱ्यांना नाईलाजास्तव रस्त्यावर बसून आपला माल विक्री करावा लागत आहे. भाव कमी झाल्यामुळे केलेला खर्चही भरुन निघालेला नाही.जिल्हा कृषी अधीक्षक उमेश घाटगे म्हणाले, डाळिंबाचे उत्पादन वाढले आहे. त्यामुळे अचानक आवक वाढल्याने भाव वाढीवर परिणाम झाला आहे. त्याचबरोबर काही महिन्यांपूर्वी झालेल्या गारपिटीमुळे बहराचे नुकसान झाले होते. नवा व जुना बहार एकदाच आल्याने उत्पादनात प्रचंड वाढ झाली आहे. निर्यात बंदीचा फारसा फरक पडलेला नाही. ८० टक्के डाळिंब स्थानिक पातळीवरच विक्री होते.जालना जिल्ह्यातील प्रत्येक रस्त्यावर डाळिंब उत्पादक विक्रीसाठी बसलेले दिसतात. काही शेतकरी तर डाळिंबाचे ढिगारे रस्त्यावर सोडून जात आहेत.