शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
2
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
3
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
4
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
5
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
6
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
7
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
8
"डोळे आणि मन आज तृप्त झालं...", ठाकरे बंधू एकत्र, मराठी अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
9
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप
10
Navi Mumbai: पत्नीसह सासूलाही कपडे काढायला लावले अन्...; काळ्या जादूच्या नावाखाली जावयाने सर्व मर्यादा ओलांडल्या!
11
ही तरुणी बनणार मंगळावर पाय ठेवणारी पहिली व्यक्ती, कोण आहे एलिसा कार्सन, म्हणते सुखरूप परतले तर...
12
'डियर क्रिकेट... डोन्ट गिव्ह वन मोअर चान्स' असं म्हणायची वेळ! करुण नायर चौथ्या प्रयत्नातही 'नापास'
13
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस
14
Sushil Kedia Office Vandalise: सुशील केडिया यांच्या मुंबईतील कार्यालयाची तोडफोड, मनसेच्या ५ कार्यकर्त्यांना अटक
15
Himachal Flood : पावसाचे थैमान! ७२ जणांचा मृत्यू, ३७ बेपत्ता; हिमाचलमध्ये ढगफुटीमुळे नुकसान, रेड अलर्ट जारी
16
PNB घोटाळ्यातील फरार आरोपी नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदी अटकेत, अमेरिकेत मुसक्या आवळल्या
17
Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava Marathi : "अडवाणी ख्रिश्चन मिशनरी स्कूलमध्ये शिकले, त्यांच्या हिंदुत्वावर शंका घेऊ का?"; राज ठाकरेंनी यादीच वाचली...
18
धक्कादायक! दुधात थुंकायचा आणि तेच लोकांना द्यायचा; किळसवाणा प्रकार CCTV मध्ये कैद
19
इंग्लंडनं २४ चेंडूत गमावल्या ९ विकेट्स! टीम इंडियानं अखेरच्या षटकात हातात आलेली मॅच घालवली
20
Post Office ची जबरदस्त स्कीम, केवळ व्याजातूनच होईल ₹८२,००० ची कमाई; एकरकमी गुंतवणूक करावी लागणार

डाळिंबाचे भाव गडगडले

By admin | Updated: September 11, 2014 00:36 IST

जालना : जिल्ह्यात डाळिंबाची वाढलेली आवक तसेच उत्पादन यामुळे डाळिंबास अत्यल्प भाव मिळत आहे. त्यामुळे उत्पादक शेतकरी पुरते धास्तावले आहेत.

जालना : जिल्ह्यात डाळिंबाची वाढलेली आवक तसेच उत्पादन यामुळे डाळिंबास अत्यल्प भाव मिळत आहे. त्यामुळे उत्पादक शेतकरी पुरते धास्तावले आहेत. बहुतांश शेतकऱ्यांनी रस्त्याच्या कडेला डाळिंब विक्री सुरु केली आहे. जालना जिल्ह्यात गत काही वर्षांपासून अनेक शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकांना फाटा देत डाळिंब, मोसंबी, चिकू तसेच फुल शेती सारख्या नगदी पिकांना प्राधान्य देत आहेत. या शेतीतून शेतकरी आर्थिक उन्नतीही साधत आहे. मात्र अस्मानी अथवा सुलतानी कारभारामुळे हे शेती धोक्यात येत आहे. गत काही दिवसांपासून डाळिंब उत्पादकांना मोठ्या आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागत आहे. शेतकऱ्यांना अक्षरश: वीस ते पंचवीस रुपये प्रतिकिलो भावाने डाळिंब विक्री करावी लागत आहे. काही शेतकरी डाळिंबाचे ढिगारे रस्त्यावर सोडून जात आहेत. एकूणच डाळिंब शेती चांगलीच अडचणीत आली आहे. जिल्ह्यात साधारणपणे २ हजार हेक्टरवर डाळिंब शेती केली जाते. उत्पादनही चांगले निघते. कृषी विभागाकडून डाळिंब शेतीला प्रोत्साहन तसेच निर्माण झालेल्या परिस्थितीवर उपाययोजना करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.घनसावंगी तालुक्यातील राहेरा येथील प्रगतशील शेतकरी सरपंच पंडितराव धांडगे म्हणाले, जिल्ह्यात डाळिंबाच्या उत्पादनात मोठी वाढ झाली आहे. यामुळे भाव अत्यल्प मिळत आहे. गत काही वर्षातील डाळिंब हे मोठे नुकसान आहे. शासनाने मदत करण्याची गरज आहे.अंबड तालुक्यातील प्रगतशील शेतकरी माजी सभापती सतीश होंडे म्हणाले, की शासनाने निर्यातबंदी केल्याने डाळिंबाचे भाव कमालीचे गडगडले आहेत. शेतकऱ्यांना नाईलाजास्तव रस्त्यावर बसून आपला माल विक्री करावा लागत आहे. भाव कमी झाल्यामुळे केलेला खर्चही भरुन निघालेला नाही.जिल्हा कृषी अधीक्षक उमेश घाटगे म्हणाले, डाळिंबाचे उत्पादन वाढले आहे. त्यामुळे अचानक आवक वाढल्याने भाव वाढीवर परिणाम झाला आहे. त्याचबरोबर काही महिन्यांपूर्वी झालेल्या गारपिटीमुळे बहराचे नुकसान झाले होते. नवा व जुना बहार एकदाच आल्याने उत्पादनात प्रचंड वाढ झाली आहे. निर्यात बंदीचा फारसा फरक पडलेला नाही. ८० टक्के डाळिंब स्थानिक पातळीवरच विक्री होते.जालना जिल्ह्यातील प्रत्येक रस्त्यावर डाळिंब उत्पादक विक्रीसाठी बसलेले दिसतात. काही शेतकरी तर डाळिंबाचे ढिगारे रस्त्यावर सोडून जात आहेत.