शहरं
Join us  
Trending Stories
1
Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?
2
चीन अन् पाकसह भारतीय सैन्यही बेलारूसला पोहचले; रशियाच्या खेळीनं NATO देशांची धडधड वाढली, कारण...
3
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' दिवशी ९० मिनिटांसाठी बंद राहणार UPI सेवा, जाणून घ्या
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
5
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! "तो जिवंत आहे की मेला?", राजा रघुवंशीचा काटा काढल्यावर पत्नीने विचारलेला प्रश्न
6
समृद्धी महामार्गावर खिळे ठोकून दुरुस्ती की घातपाताचा प्रयत्न? अनेक वाहने पंक्चर, प्रवासी संतप्त
7
पितृपक्ष 2025: श्राद्धाचा नैवेद्य ठेवताना डावीकडून उजवीकडे पाणी फिरवतात; का ते माहितीय का?
8
नवी मुंबईतील 'त्या' बांधकामांना 'ओसी' देऊ नये; विधान परिषद सभापतींचे आदेश
9
Panvel: जेवताना चिकन कमी वाढले, पत्नीला जाळून मारले; फरार आरोपीला हैदराबादमध्ये अटक
10
नोकरी गेल्यानंतर पीएफमधील पैशांवर व्याज मिळते? काय आहे ईपीएफओचे नियम?
11
भारताच्या वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने दिली 'गुड न्यूज'; पत्नीच्या मॅटर्निटी फोटोशूटची चर्चा
12
फेसबुकचे मालक मार्क झुकरबर्ग यांची जबरदस्त ऑफर! फक्त हे काम करून दर तासाला ५ हजार रुपये मिळवा
13
तमाशातील नर्तकीवर प्रेम, पण ती टाळायला लागल्याने माजी उपसरपंच झाला वेडापिसा, त्यानंतर तिच्या घरासमोरच उचललं टोकाचं पाऊल
14
वर्क फ्रॉम होम कल्चर संपतंय का? 'या' दिग्गज टेक कंपनीनंही आपल्या कर्मचाऱ्यांना ऑफिसला बोलावलं
15
आयफोन १७ सिरीजमध्ये 'या' गोष्टी मिळणार नाहीत; खरेदी करत असाल तर...
16
रशिया-युक्रेन युद्धात 'या' देशानं मारली उडी; रशियन ड्रोन्स पाडले, F 16 लढाऊ विमाने हवेत झेपावली
17
धनत्रयोदशी-दिवाळीपर्यंत कुठवर पोहोचणार सोन्याचा दर? आता आहे ₹१.१२ लाखांच्या पार, खरेदीपूर्वी पाहाच
18
'ही' छोटी कार आता ३ लाख रुपयांपर्यंत स्वस्त; जीएसटी कपातीमुळे नवीन किंमती जाहीर
19
नेपाळमध्ये लष्कराने सूत्रं हातात घेतली, एअर इंडिया-इंडिगोची विमान उड्डाणे रद्द
20
महाराष्ट्रात ७०० आरटीओ अधिकाऱ्यांची कमतरता, प्रशासनावर ताण

डाळिंबाचे भाव गडगडले

By admin | Updated: September 11, 2014 00:36 IST

जालना : जिल्ह्यात डाळिंबाची वाढलेली आवक तसेच उत्पादन यामुळे डाळिंबास अत्यल्प भाव मिळत आहे. त्यामुळे उत्पादक शेतकरी पुरते धास्तावले आहेत.

जालना : जिल्ह्यात डाळिंबाची वाढलेली आवक तसेच उत्पादन यामुळे डाळिंबास अत्यल्प भाव मिळत आहे. त्यामुळे उत्पादक शेतकरी पुरते धास्तावले आहेत. बहुतांश शेतकऱ्यांनी रस्त्याच्या कडेला डाळिंब विक्री सुरु केली आहे. जालना जिल्ह्यात गत काही वर्षांपासून अनेक शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकांना फाटा देत डाळिंब, मोसंबी, चिकू तसेच फुल शेती सारख्या नगदी पिकांना प्राधान्य देत आहेत. या शेतीतून शेतकरी आर्थिक उन्नतीही साधत आहे. मात्र अस्मानी अथवा सुलतानी कारभारामुळे हे शेती धोक्यात येत आहे. गत काही दिवसांपासून डाळिंब उत्पादकांना मोठ्या आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागत आहे. शेतकऱ्यांना अक्षरश: वीस ते पंचवीस रुपये प्रतिकिलो भावाने डाळिंब विक्री करावी लागत आहे. काही शेतकरी डाळिंबाचे ढिगारे रस्त्यावर सोडून जात आहेत. एकूणच डाळिंब शेती चांगलीच अडचणीत आली आहे. जिल्ह्यात साधारणपणे २ हजार हेक्टरवर डाळिंब शेती केली जाते. उत्पादनही चांगले निघते. कृषी विभागाकडून डाळिंब शेतीला प्रोत्साहन तसेच निर्माण झालेल्या परिस्थितीवर उपाययोजना करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.घनसावंगी तालुक्यातील राहेरा येथील प्रगतशील शेतकरी सरपंच पंडितराव धांडगे म्हणाले, जिल्ह्यात डाळिंबाच्या उत्पादनात मोठी वाढ झाली आहे. यामुळे भाव अत्यल्प मिळत आहे. गत काही वर्षातील डाळिंब हे मोठे नुकसान आहे. शासनाने मदत करण्याची गरज आहे.अंबड तालुक्यातील प्रगतशील शेतकरी माजी सभापती सतीश होंडे म्हणाले, की शासनाने निर्यातबंदी केल्याने डाळिंबाचे भाव कमालीचे गडगडले आहेत. शेतकऱ्यांना नाईलाजास्तव रस्त्यावर बसून आपला माल विक्री करावा लागत आहे. भाव कमी झाल्यामुळे केलेला खर्चही भरुन निघालेला नाही.जिल्हा कृषी अधीक्षक उमेश घाटगे म्हणाले, डाळिंबाचे उत्पादन वाढले आहे. त्यामुळे अचानक आवक वाढल्याने भाव वाढीवर परिणाम झाला आहे. त्याचबरोबर काही महिन्यांपूर्वी झालेल्या गारपिटीमुळे बहराचे नुकसान झाले होते. नवा व जुना बहार एकदाच आल्याने उत्पादनात प्रचंड वाढ झाली आहे. निर्यात बंदीचा फारसा फरक पडलेला नाही. ८० टक्के डाळिंब स्थानिक पातळीवरच विक्री होते.जालना जिल्ह्यातील प्रत्येक रस्त्यावर डाळिंब उत्पादक विक्रीसाठी बसलेले दिसतात. काही शेतकरी तर डाळिंबाचे ढिगारे रस्त्यावर सोडून जात आहेत.