शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

औरंगाबाद बाजारपेठेत मध्यप्रदेशातील गव्हाला चढला ‘भाव’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2019 11:44 IST

बाजारगप्पा : राज्यात दुष्काळामुळे गव्हाचा पेरा कमी झाला आहे.

- प्रशांत तेलवाडकर (औरंगाबाद )

राज्यात दुष्काळामुळे गव्हाचा पेरा कमी झाला आहे. आता संपूर्णपणे परराज्यातील गव्हावर अवलंबून राहावे लागणार आहे. परिणामी, मध्यप्रदेशातील गव्हाला ‘भाव’ चढला आहे. पुन्हा एकदा गहू क्विंटलमागे ३० ते ४० रुपयांनी वधारला आहे. गेल्या आठवड्यात थंडीमुळे बाजरीला मागणी वाढली होती, तर  सर्वप्रकारच्या डाळींचे भाव स्थिर होते. 

नवीन वर्षातील पहिला आठवडा बाजारपेठेसाठी जेमतेम राहिला. कारण, महिन्याच्या किराणा सामान खरेदीसाठी किराणा दुकानात गर्दी होती; पण अन्य बाजारपेठेत व्यापारी ग्राहकांच्या प्रतीक्षेत दिसून आले. यावर्षीही मराठवाडा दुष्काळाला सामोरे जात आहे. मागील तीन दशकांत महाराष्ट्रात गव्हाचे उत्पादन घटले आहे. गरजेएवढाच शेतकरी गहू पेरत असतात; पण यंदा तेवढ्याही गव्हाची पेरणी झाली नाही. ज्यांच्या विहिरीत पाणी आहे तेथेच गहू जगविला जात आहे. मागील आठवड्यात बाजार समितीमध्ये शेतकरी गहू खरेदी करताना दिसून आले. नवीन गहू मार्चपर्यंत बाजारात येणार आहे. यामुळे एक  ते दीड क्विंटल गहू शेतकरी खरेदी करीत होते.

यंदा मराठवाड्याला मध्यप्रदेश, राजस्थान व गुजरातमधून येणाऱ्या गव्हावर संपूर्ण अवलंबून राहावे लागणार आहे. मागील आठवड्यात मध्यप्रदेशात सरकारी गव्हाचे टेंडर क्विंटलमागे ३० ते ४० रुपयांनी चढ्याभावात निघाले. त्याचा थेट परिणाम स्थानिक बाजारपेठेत झाला. येथे शनिवारी २४०० ते २८०० रुपये प्रतिक्विंटल गहू विक्री झाला, तर शरबती गहू २७०० ते ३००० रुपये प्रतिक्विंटल विक्री झाला. तर सर्वात हलका मिलबर गहू २३०० ते २३५० रुपये क्विंटल विकत आहे. मागील आठवड्यात बाजारपेठेत ६०० टन गहू विकला गेला. गव्हाचे व्यापारी नीलेश सोमाणी यांनी सांगितले की, मध्यप्रदेशात गव्हाचा पेरा चांगला आहे तसेच थंडी पडल्याने पिकासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे नवीन गव्हाचे उत्पादन विक्रमी होईल, अशी शक्यता मध्यप्रदेशातील व्यापारी व्यक्त करीत आहेत. थंडी वाढल्याने बाजरीला मागणी वाढली आहे. १९५० ते २३०० रुपये प्रतिक्विंटलने २०० ते २५० टन बाजरी आठवडाभरात विक्री झाली. ज्वारी २४५० ते ३२०० रुपये प्रतिक्विंटल विक्री झाली. 

मागील आठवड्यात डाळींचे भाव स्थिर राहिल्याने ग्राहकांना थोडासा दिलासा मिळाला. यात हरभरा डाळ ५३०० ते ५७०० रुपये, मसूर डाळ ४६५० ते ५००० रुपये, मूगडाळ ६८०० ते ७२०० रुपये, तूरडाळ ६००० ते ६५०० रुपये तर उडीदडाळ ५५०० ते ६००० रुपये प्रतिक्विंटल विक्री झाली. 

नवीन बासमतीची आवकमागील आठवड्यात पंजाब व हरियाणा राज्यातून नवीन बासमतीची आवक झाली. ४००० रुपये ते १०२०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत बासमती विक्री होत आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा क्विंटलमागे ४०० ते ५०० रुपयांनी बासमती महाग विक्री होत आहे. चालू महिन्याच्या दुसऱ्या पंधरवाड्यापासून नवीन तांदळाच्या बहुतांश व्हरायटी बाजारात येतील, असे व्यापाऱ्यांनी सांगितले. 

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी