शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
2
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
3
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
4
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
5
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
6
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
7
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
8
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
9
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
10
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
11
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
12
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
13
Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!
14
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
15
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
16
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
17
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
18
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
19
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
20
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...

औरंगाबाद बाजारपेठेत मध्यप्रदेशातील गव्हाला चढला ‘भाव’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2019 11:44 IST

बाजारगप्पा : राज्यात दुष्काळामुळे गव्हाचा पेरा कमी झाला आहे.

- प्रशांत तेलवाडकर (औरंगाबाद )

राज्यात दुष्काळामुळे गव्हाचा पेरा कमी झाला आहे. आता संपूर्णपणे परराज्यातील गव्हावर अवलंबून राहावे लागणार आहे. परिणामी, मध्यप्रदेशातील गव्हाला ‘भाव’ चढला आहे. पुन्हा एकदा गहू क्विंटलमागे ३० ते ४० रुपयांनी वधारला आहे. गेल्या आठवड्यात थंडीमुळे बाजरीला मागणी वाढली होती, तर  सर्वप्रकारच्या डाळींचे भाव स्थिर होते. 

नवीन वर्षातील पहिला आठवडा बाजारपेठेसाठी जेमतेम राहिला. कारण, महिन्याच्या किराणा सामान खरेदीसाठी किराणा दुकानात गर्दी होती; पण अन्य बाजारपेठेत व्यापारी ग्राहकांच्या प्रतीक्षेत दिसून आले. यावर्षीही मराठवाडा दुष्काळाला सामोरे जात आहे. मागील तीन दशकांत महाराष्ट्रात गव्हाचे उत्पादन घटले आहे. गरजेएवढाच शेतकरी गहू पेरत असतात; पण यंदा तेवढ्याही गव्हाची पेरणी झाली नाही. ज्यांच्या विहिरीत पाणी आहे तेथेच गहू जगविला जात आहे. मागील आठवड्यात बाजार समितीमध्ये शेतकरी गहू खरेदी करताना दिसून आले. नवीन गहू मार्चपर्यंत बाजारात येणार आहे. यामुळे एक  ते दीड क्विंटल गहू शेतकरी खरेदी करीत होते.

यंदा मराठवाड्याला मध्यप्रदेश, राजस्थान व गुजरातमधून येणाऱ्या गव्हावर संपूर्ण अवलंबून राहावे लागणार आहे. मागील आठवड्यात मध्यप्रदेशात सरकारी गव्हाचे टेंडर क्विंटलमागे ३० ते ४० रुपयांनी चढ्याभावात निघाले. त्याचा थेट परिणाम स्थानिक बाजारपेठेत झाला. येथे शनिवारी २४०० ते २८०० रुपये प्रतिक्विंटल गहू विक्री झाला, तर शरबती गहू २७०० ते ३००० रुपये प्रतिक्विंटल विक्री झाला. तर सर्वात हलका मिलबर गहू २३०० ते २३५० रुपये क्विंटल विकत आहे. मागील आठवड्यात बाजारपेठेत ६०० टन गहू विकला गेला. गव्हाचे व्यापारी नीलेश सोमाणी यांनी सांगितले की, मध्यप्रदेशात गव्हाचा पेरा चांगला आहे तसेच थंडी पडल्याने पिकासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे नवीन गव्हाचे उत्पादन विक्रमी होईल, अशी शक्यता मध्यप्रदेशातील व्यापारी व्यक्त करीत आहेत. थंडी वाढल्याने बाजरीला मागणी वाढली आहे. १९५० ते २३०० रुपये प्रतिक्विंटलने २०० ते २५० टन बाजरी आठवडाभरात विक्री झाली. ज्वारी २४५० ते ३२०० रुपये प्रतिक्विंटल विक्री झाली. 

मागील आठवड्यात डाळींचे भाव स्थिर राहिल्याने ग्राहकांना थोडासा दिलासा मिळाला. यात हरभरा डाळ ५३०० ते ५७०० रुपये, मसूर डाळ ४६५० ते ५००० रुपये, मूगडाळ ६८०० ते ७२०० रुपये, तूरडाळ ६००० ते ६५०० रुपये तर उडीदडाळ ५५०० ते ६००० रुपये प्रतिक्विंटल विक्री झाली. 

नवीन बासमतीची आवकमागील आठवड्यात पंजाब व हरियाणा राज्यातून नवीन बासमतीची आवक झाली. ४००० रुपये ते १०२०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत बासमती विक्री होत आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा क्विंटलमागे ४०० ते ५०० रुपयांनी बासमती महाग विक्री होत आहे. चालू महिन्याच्या दुसऱ्या पंधरवाड्यापासून नवीन तांदळाच्या बहुतांश व्हरायटी बाजारात येतील, असे व्यापाऱ्यांनी सांगितले. 

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी