शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
2
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
3
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
4
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
5
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
6
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
7
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
8
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
9
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
10
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
11
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
12
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
13
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
14
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
15
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
16
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
17
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
18
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
19
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

निकोप जीवनशैलीतून मधुमेहासारख्या गोड शत्रुला रोखा

By admin | Updated: April 7, 2016 00:32 IST

बीड: देशात सुमारे ६२ दशलक्ष जणांना हा विकार झाल्याचे इंटरनॅशनल डायबेटिस फाउंडेशनच्या आकडेवारीनुसार समोर आले आहे.

बीड: देशात सुमारे ६२ दशलक्ष जणांना हा विकार झाल्याचे इंटरनॅशनल डायबेटिस फाउंडेशनच्या आकडेवारीनुसार समोर आले आहे. २०३५ पर्यंत भारतात १०९ दशलक्ष मधुमेही रु ग्ण असतील अशी भीती इंडियन हार्ट असोशिएशनने व्यक्त केली आहे. यामुळे निकोप जीवनशैलीने मधुमेहासारख्या गोड शत्रुला दुर ठेवणे ही गरज बनली असल्याचे मत डॉ. संजय जानवळे यांनी व्यक्त केले. जागतिक आरोग्य दिना विषयी डॉ. जानवळे यांनी मधुमेहाबाबतची सद्यस्थिती व त्यावर उपाय योजना ‘लोकमत’शी बोलताना बुधवारी सांगितल्या. एका सर्वेक्षणानुसार शहरी भागात मधुमेहाचे प्रमाण अंदाजे १२ ते १३ टक्के असून ग्रामीण भागात हेच प्रमाण दोन ते तीन टक्के आहे. खरं तर हा विकार काही नव्याने उद्भवलेला नाही. मात्र त्याचे वाढते प्रमाण भयावह व चिंताजनक आहे. यापुर्वीही अनेक सर्वेक्षणातून त्याच्या वाढत्या प्रमाणाचे इशारे अनेकदा देण्यात आले होते पण परिस्थितीत काहीच सुधारणा झाली नाही, अशी खंत डॉ. जानवळे यांनी व्यक्त केली.बिघडलेली जीवनशैली मधुमेहास कारणीभूत आहे. पस्तीशीच्या पुढे होणारा रोग आहे. मेहनतीचा अभाव व आयोग्य आहार यामुळे होणाऱ्या प्राकृतिक बिघाडामुळे हा रोग होतो. यातील काही घटक आनुवंशिक असतात. आनुवंशिकता, अयोग्य आहार, स्थुलपणा व बैठे काम ही मधुमेहाची प्रमुख कारणे होत. वाढणारे ताणतणाव, कोंडा व तंतूविरहीत धान्ये खाण्याची सवय, चरबीयुक्त विशेषत; दुग्धजन्यपदार्थ पदार्थ म्हणजे लोणी, तूप,चीज यासारख्या गोष्टींचा वाढता वापर ,रात्री उशिरा पर्यंतचे जागरण, आहारात निकस पोटभरु पदार्थांचा समावेश ही मधुमेह वाढण्याची काही प्रमुख कारणे. याच कारणांमुळे भारतात मधुमेहाचे प्रमाण बेसुमार वाढत आहे. मजूर,शेतकरी यापेक्षा बौद्धिक व्यवसाय करणाऱ्यांलोकांत हे प्रमाण जास्त आहे.वारंवार लघवी होणे, जास्त तहान व भूक लागने ही या रोगाची ढोबळ लक्षणे होत. भूक लागूनसुध्दा या रोगात जास्त अशक्यता जाणवते. मधुमेहाबद्दल जनमानसात जागृकता असूनही या विकारावर नियंत्रण नसल्याचे दिसते.४धूम्रपान करणाऱ्या मधुमेहींनी सिगारेट ओढणे बंद केले पाहीजे . मधुमेही रूग्णांनी आपल्या आहारात तेल , तुप , साखर यांचा वापर कमी ठेवावा , त्याचबरोबर प्राणीजन्य चरबी मार्गारीन , लोणी , साय , फास्टफूड , वनस्पतीजन्य चरबी या पदार्थांच प्रमाण कमी कराव, शर्करायुक्त पेये वर्ज करावेत, रक्तदाब असणाऱ्यांनी नियमति रक्तदाबाची तपासणी करावी, आहारात मिठाचे प्रमाण मर्यादेत असावे, चौरस ,संतुलित व कमी उष्मांक देणारा आवश्यक तेवढाच आहार घेऊन वजन आटोक्यात ठेवावे, असा सल्लाही डॉ. संजय जानवळे यांनीदिला आहे.