शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

निकोप जीवनशैलीतून मधुमेहासारख्या गोड शत्रुला रोखा

By admin | Updated: April 7, 2016 00:32 IST

बीड: देशात सुमारे ६२ दशलक्ष जणांना हा विकार झाल्याचे इंटरनॅशनल डायबेटिस फाउंडेशनच्या आकडेवारीनुसार समोर आले आहे.

बीड: देशात सुमारे ६२ दशलक्ष जणांना हा विकार झाल्याचे इंटरनॅशनल डायबेटिस फाउंडेशनच्या आकडेवारीनुसार समोर आले आहे. २०३५ पर्यंत भारतात १०९ दशलक्ष मधुमेही रु ग्ण असतील अशी भीती इंडियन हार्ट असोशिएशनने व्यक्त केली आहे. यामुळे निकोप जीवनशैलीने मधुमेहासारख्या गोड शत्रुला दुर ठेवणे ही गरज बनली असल्याचे मत डॉ. संजय जानवळे यांनी व्यक्त केले. जागतिक आरोग्य दिना विषयी डॉ. जानवळे यांनी मधुमेहाबाबतची सद्यस्थिती व त्यावर उपाय योजना ‘लोकमत’शी बोलताना बुधवारी सांगितल्या. एका सर्वेक्षणानुसार शहरी भागात मधुमेहाचे प्रमाण अंदाजे १२ ते १३ टक्के असून ग्रामीण भागात हेच प्रमाण दोन ते तीन टक्के आहे. खरं तर हा विकार काही नव्याने उद्भवलेला नाही. मात्र त्याचे वाढते प्रमाण भयावह व चिंताजनक आहे. यापुर्वीही अनेक सर्वेक्षणातून त्याच्या वाढत्या प्रमाणाचे इशारे अनेकदा देण्यात आले होते पण परिस्थितीत काहीच सुधारणा झाली नाही, अशी खंत डॉ. जानवळे यांनी व्यक्त केली.बिघडलेली जीवनशैली मधुमेहास कारणीभूत आहे. पस्तीशीच्या पुढे होणारा रोग आहे. मेहनतीचा अभाव व आयोग्य आहार यामुळे होणाऱ्या प्राकृतिक बिघाडामुळे हा रोग होतो. यातील काही घटक आनुवंशिक असतात. आनुवंशिकता, अयोग्य आहार, स्थुलपणा व बैठे काम ही मधुमेहाची प्रमुख कारणे होत. वाढणारे ताणतणाव, कोंडा व तंतूविरहीत धान्ये खाण्याची सवय, चरबीयुक्त विशेषत; दुग्धजन्यपदार्थ पदार्थ म्हणजे लोणी, तूप,चीज यासारख्या गोष्टींचा वाढता वापर ,रात्री उशिरा पर्यंतचे जागरण, आहारात निकस पोटभरु पदार्थांचा समावेश ही मधुमेह वाढण्याची काही प्रमुख कारणे. याच कारणांमुळे भारतात मधुमेहाचे प्रमाण बेसुमार वाढत आहे. मजूर,शेतकरी यापेक्षा बौद्धिक व्यवसाय करणाऱ्यांलोकांत हे प्रमाण जास्त आहे.वारंवार लघवी होणे, जास्त तहान व भूक लागने ही या रोगाची ढोबळ लक्षणे होत. भूक लागूनसुध्दा या रोगात जास्त अशक्यता जाणवते. मधुमेहाबद्दल जनमानसात जागृकता असूनही या विकारावर नियंत्रण नसल्याचे दिसते.४धूम्रपान करणाऱ्या मधुमेहींनी सिगारेट ओढणे बंद केले पाहीजे . मधुमेही रूग्णांनी आपल्या आहारात तेल , तुप , साखर यांचा वापर कमी ठेवावा , त्याचबरोबर प्राणीजन्य चरबी मार्गारीन , लोणी , साय , फास्टफूड , वनस्पतीजन्य चरबी या पदार्थांच प्रमाण कमी कराव, शर्करायुक्त पेये वर्ज करावेत, रक्तदाब असणाऱ्यांनी नियमति रक्तदाबाची तपासणी करावी, आहारात मिठाचे प्रमाण मर्यादेत असावे, चौरस ,संतुलित व कमी उष्मांक देणारा आवश्यक तेवढाच आहार घेऊन वजन आटोक्यात ठेवावे, असा सल्लाही डॉ. संजय जानवळे यांनीदिला आहे.