शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
2
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
4
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
5
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
6
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
7
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
8
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
9
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
10
मुत्सद्देगिरी आणि सैन्यदलांचं निर्विवाद यश!
11
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
12
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
13
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
14
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
15
चंद्रावर उमटणार भारतीय अंतराळवीराचे पदचिन्ह
16
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा
17
रोहितने ‘तो’ निर्णय तेव्हाच घेतलेला? गंभीर आलेला, पण रोहित शर्मा अनुपस्थित होता... 
18
रोहित शर्माने घेतली कसोटीतून तडकाफडकी निवृत्ती; इंग्लंड दौऱ्यात मिळणार होता डच्चू...
19
गोष्ट मिठी नदीच्या न उपसलेल्या गाळाची..., गाळाने भरले भ्रष्ट अभियंत्याचे खिसे; चौकशीतून स्पष्ट 
20
उद्धव ठाकरे ‘धनुष्यबाणा’साठी पुन्हा सक्रिय; याचिकेवर सुनावणी घेण्याची मागणी

देणेकऱ्यांच्या तगाद्यामुळे साडे आठ लाखांची बॅग पळविल्याचा बनाव; तक्रारदाराविरुध्दच गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 15:08 IST

हिंगोली गेट भागात चोरट्यांनी चाकूच्या धाकावर आपली साडे आठ लाख रुपये असलेली बॅग पळविल्याची तक्रार दिली.

ठळक मुद्देचोरीची खोटी तक्रार आली अंगलट

नांदेड : हिंगोली गेट भागात सकाळी साडे नऊ वाजता चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवून आपल्या जवळील साडे आठ लाख रुपये असलेली बॅग पळविल्याची तक्रार एकाने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आज सकाळी दिली. मात्र, पोलीस तपासात चोरी झाली नसल्याचे उघड होऊन खोटी तक्रार दिल्याचे स्पष्ट झाले. यामुळे पोलिसांनी तक्रारदाराविरूद्धच गुन्हा दाखल केला आहे. 

शहरात गेल्या काही दिवसात बॅग पळविण्याच्या घटनेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. भर दिवसा चाकू आणि बंदुकीचा धाक दाखवून बॅग लंपास करण्यात येत आहे. शुक्रवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास सोमेश कॉलनी भागातील गणेश उत्तम पतंगे हा युवक शिवाजीनगर ठाण्यात आला होता. त्याने हिंगोली गेट भागात चोरट्यांनी चाकूच्या धाकावर आपली साडे आठ लाख रुपये असलेली बॅग पळविल्याची तक्रार दिली. यानंतर अप्पर पोलिस अधीक्षक निलेश मोरे यांनी तातडीने शहरात नाकाबंदी करण्याचे आदेश दिले. पोनि.अनंत नरुटे, जगदीश भंडरवार, साहेबराव नरवाडे, अभिमन्यू सोळंके, संजय ननवरे हे पोलिस निरिक्षकांची फौज रस्त्यावर उतरली होती. 

दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेचे पथकही शिवाजीनगर ठाण्यात येवून धडकले. पोनि.द्वारकादास चिखलीकर यांनी पतंगे याची उलटतपासणी केली. त्यात देणेकऱ्यांच्या तगाद्यामुळे बनाव रचल्याचे उघडकीस आले. तसेच रकमेतील ३ लाख २० हजार रुपये बँकेत भरले, ५० हजार रुपये नारळ पाणी विक्रेत्याला दिले आणि २ लाख ५० हजार घरी असल्याचे पोलिसांना सांगितले. यामुळे खोटी तक्रार दिल्याचे उघड झाल्याने पोलिसांनी तक्रारदार पतंगे याच्या विरोधातच गुन्हा दाखल केला आहे. हे प्रकरण आता पतंगे यांच्याच अंगलट आले आहे. या प्रकरणात शिवाजीनगर पोलिसांकडून कारवाई सुरु करण्यात आली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNandedनांदेड