शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

औरंगाबादहून बँकॉक आणि टोकियो विमानसेवेची तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2019 23:57 IST

: चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून लवकरच आंतरराष्ट्रीय विमानांचे उड्डाण होणार आहे. विमानतळाचे संचालक डी. जी. साळवे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर हवाई कनेक्टिव्हिटीची परिस्थिती मांडली. तेव्हा औरंगाबाद शहर बँकॉक आणि टोकियोशी जोडण्यासंदर्भात चर्चा सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली, अशी माहिती विमानतळ प्राधिक रणातर्फे देण्यात आली.

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांशी चर्चा : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याबरोबरही विमानसेवा वाढविण्यासंदर्भात संवाद

औरंगाबाद : चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून लवकरच आंतरराष्ट्रीय विमानांचे उड्डाण होणार आहे. विमानतळाचे संचालक डी. जी. साळवे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर हवाई कनेक्टिव्हिटीची परिस्थिती मांडली. तेव्हा औरंगाबाद शहर बँकॉक आणि टोकियोशी जोडण्यासंदर्भात चर्चा सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली, अशी माहिती विमानतळ प्राधिक रणातर्फे देण्यात आली.केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचीही भेट घेऊन डी. जी. साळवे यांनी औरंगाबादहून नवीन विमानसेवा सुरू करण्यासंदर्भात चर्चा केली. विमान कंपन्यांना येथून विमानसेवा सुरू करण्यासंदर्भात प्रोत्साहन देण्याची मागणी केली. याबरोबरच इमिग्रेशन, आंतरराष्ट्रीय चेक पोस्टच्या मुद्द्यांवरही चर्चा केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर औरंगाबादच्या अपुऱ्या विमानसेवेसंदर्भात चर्चा केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी विमानसेवा वाढविण्यासंदर्भात सकारात्मकता दर्शविली. याबरोबर औरंगाबाद शहर बँकॉक आणि टोकियोशी जोडण्यासंदर्भात चर्चा करण्यात येत असल्याचे सांगितले.नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच एअर विस्ताराकडून औरंगाबाद-दिल्ली विमानसेवा सुरू करण्याची तयारी सुरू असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर उडान योजनेंतर्गत उदयपूर, जोधपूरसाठीही विमानसेवा सुरू होण्याचे संकेत मिळाले आहेत. त्यापुढे आता आंतरराष्ट्रीय विमानसेवेसंदर्भात चर्चा सुरू असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. त्यामुळे नव्या वर्षात औरंगाबादहून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विमानसेवेचा विस्तार होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.विमानतळावरून आजघडीला केवळ एअर इंडिया, जेट एअरवेज आणि ट्रू जेट कंपनीची विमानसेवा सुरू आहे. या तीन कंपन्यांच्या सेवेमुळे औरंगाबाद शहर दिल्ली, मुंबई, हैदराबाद आणि तिरुपतीशी हवाईसेवेने जोडलेले आहे. गेल्या दीड वर्षापासून विमानसेवा वाढविण्याचा विमानतळ प्राधिकरणाकडून प्रयत्न सुरू आहे.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAurangabadऔरंगाबाद