शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
2
'डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष, जगाचे सम्राट नाहीत, त्यांच्या चुकांची किंमत...'; ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी सुनावले
3
अमेरिकेत ३० वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या भारतीयाला ग्रीन कार्ड असूनही अटक, कुटुंबीय हताश! नेमकं प्रकरण काय?
4
पाकिस्तान-सौदी अरेबियात डील, भारताची पहिली प्रतिक्रिया; "आम्ही देशहिताचं रक्षण करण्यासाठी..."
5
'यानं' केवळ ३.७७ रुपयांप्रमाणे घेतलेले Urban Company चे शेअर्स, IPO उघताच त्याचे झाले ३९० कोटी
6
IND vs PAK: नीरज चोप्रा आज अर्शद नदीमशी भिडणार! भारत-पाकमध्ये आणखी एक 'हाय-व्होल्टेज' सामना
7
कर्नाटकमध्ये मतचोरीचा डाव काँग्रेसवरच उलटला, आमदार संशायाच्या भोवऱ्यात, हायकोर्टाने निकाल रद्द केला
8
'साप चावला' म्हणत कळवळला, वांद्रे-वरळी सी-लिंकवर गाडी थांबवली अन्...; मुंबईतल्या व्यापाऱ्याने उचलले टोकाचे पाऊल
9
"पल्लेदार वाक्य बोलणारी प्रिया शेवटच्या क्षणी...", अभिजीतची प्रतिक्रिया ऐकून डोळ्यात येईल पाणी
10
ऐकावं ते नवलच! डिजिटल फ्रेंडली भिकारी; ऑनलाईन मागतो भीक, काही मिनिटांत बक्कळ कमाई
11
दीड कोटींच्या जमिनीवर सगळ्यांचा डोळा; सावत्र भावांनी कट रचला, ८ लाख दिले तरी प्लॅन कसा फसला?
12
फक्त ५००० रुपयांच्या कर्जातून उभारले १३,५०० कोटींचे साम्राज्य! तुमच्या घरातही वापरली जाते 'ही' वस्तू
13
BAN vs AFG Live Streaming : अफगाणिस्तानसमोर मोठं चॅलेंज! लढत श्रीलंकेविरुद्ध अन् चितपट करायचंय बांगलादेशला! जाणून घ्या समीकरण
14
महामार्गावर अचानक भूस्खलन, पळाले म्हणून थोडक्यात वाचले भाजप खासदार; व्हिडीओ केला शेअर
15
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
16
पहिल्याच प्रयत्नात नीरज पोहोचला अंतिम फेरीत; जागतिक अजिंक्यपद : सचिन यादवही ठरला पात्र
17
तासाभराचं नाट्य, बहिष्काराची धमकी, ६ ईमेल आणि..., पाकिस्तान असा आला वठणीवर, त्या बैठकीत काय घडलं?
18
१ रुपया द्या आणि एसी घ्या, नव्या GST दरांवर सुरू केलं बुकिंग; ग्राहकांना खेचण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा
19
'स्पोर्टिंग क्लब'च्या निवडणुकीत शिंदेसेनेला शह देण्यासाठी झाली भाजपा-मनसे-उद्धवसेनेची युती
20
TVS Success Story: इंग्रजांसमोर हार मानली नाही, बँकेची नोकरी सोडून सायकल रिपेरिंगचं काम सुरू केलं; आज आहे ₹१,६६,२०० कोटींची कंपनी

औरंगाबादहून बँकॉक आणि टोकियो विमानसेवेची तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2019 23:57 IST

: चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून लवकरच आंतरराष्ट्रीय विमानांचे उड्डाण होणार आहे. विमानतळाचे संचालक डी. जी. साळवे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर हवाई कनेक्टिव्हिटीची परिस्थिती मांडली. तेव्हा औरंगाबाद शहर बँकॉक आणि टोकियोशी जोडण्यासंदर्भात चर्चा सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली, अशी माहिती विमानतळ प्राधिक रणातर्फे देण्यात आली.

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांशी चर्चा : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याबरोबरही विमानसेवा वाढविण्यासंदर्भात संवाद

औरंगाबाद : चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून लवकरच आंतरराष्ट्रीय विमानांचे उड्डाण होणार आहे. विमानतळाचे संचालक डी. जी. साळवे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर हवाई कनेक्टिव्हिटीची परिस्थिती मांडली. तेव्हा औरंगाबाद शहर बँकॉक आणि टोकियोशी जोडण्यासंदर्भात चर्चा सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली, अशी माहिती विमानतळ प्राधिक रणातर्फे देण्यात आली.केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचीही भेट घेऊन डी. जी. साळवे यांनी औरंगाबादहून नवीन विमानसेवा सुरू करण्यासंदर्भात चर्चा केली. विमान कंपन्यांना येथून विमानसेवा सुरू करण्यासंदर्भात प्रोत्साहन देण्याची मागणी केली. याबरोबरच इमिग्रेशन, आंतरराष्ट्रीय चेक पोस्टच्या मुद्द्यांवरही चर्चा केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर औरंगाबादच्या अपुऱ्या विमानसेवेसंदर्भात चर्चा केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी विमानसेवा वाढविण्यासंदर्भात सकारात्मकता दर्शविली. याबरोबर औरंगाबाद शहर बँकॉक आणि टोकियोशी जोडण्यासंदर्भात चर्चा करण्यात येत असल्याचे सांगितले.नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच एअर विस्ताराकडून औरंगाबाद-दिल्ली विमानसेवा सुरू करण्याची तयारी सुरू असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर उडान योजनेंतर्गत उदयपूर, जोधपूरसाठीही विमानसेवा सुरू होण्याचे संकेत मिळाले आहेत. त्यापुढे आता आंतरराष्ट्रीय विमानसेवेसंदर्भात चर्चा सुरू असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. त्यामुळे नव्या वर्षात औरंगाबादहून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विमानसेवेचा विस्तार होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.विमानतळावरून आजघडीला केवळ एअर इंडिया, जेट एअरवेज आणि ट्रू जेट कंपनीची विमानसेवा सुरू आहे. या तीन कंपन्यांच्या सेवेमुळे औरंगाबाद शहर दिल्ली, मुंबई, हैदराबाद आणि तिरुपतीशी हवाईसेवेने जोडलेले आहे. गेल्या दीड वर्षापासून विमानसेवा वाढविण्याचा विमानतळ प्राधिकरणाकडून प्रयत्न सुरू आहे.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAurangabadऔरंगाबाद