शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
2
भंडाऱ्याचे काँग्रेस खासदार प्रशांत पडोळेंच्या गाडीचा भीषण अपघात; ट्रकची धडक, चौघांना किरकोळ दुखापत
3
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
4
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय
5
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
6
'शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे नाव सेंट मेरी करा'; आमदाराच्या मागणीला CM सिद्धरामय्यांचा होकार
7
Navratri 2025: नवरात्रीची सुरुवात कधीपासून? घटस्थापनेचे महत्त्व, नऊ रंग आणि उत्सवाची पार्श्वभूमी जाणून घ्या
8
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
9
भारताच्या 'या' राज्यात राहतात सर्वाधिक नेपाळी लोक, सरकारी सोयीसुविधांचाही घेतात लाभ!
10
"तुमची मुलगी नक्षलवादी आहे, तिचे आधारकार्ड द्या !" पोलिसांना माओवाद आणि मार्क्सवाद यातील फरक समजत नाही का?
11
विश्रांतीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार 'अँक्शन मोड'मध्ये! प्रशासनाला दिले महत्त्वाचे आदेश
12
पत्नीचं अफेअर, घराच्या छतावर चाळे करताना पतीने बॉयफ्रेंडसह पकडलं, त्यानंतर दिली ऐकून थरकाप उडेल अशी शिक्षा
13
भारतात राहून पोस्ट ग्रॅजुएशन अन् देशालाच उडवण्याची योजना; पोलिसांनी सांगितले अटक केलेल्या ५ दहशतवाद्यांचे मनसुबे! 
14
साखरेच्या डब्यात मुंग्याच मुंग्या; पाहून डोक्याचा होतो भुगा, 'या' घरगुती उपायाने होतील छूमंतर
15
VIDEO: बापरे... मगर आणि पाणघोडा आले समोरासमोर, दोघांमध्ये तुफान जुंपली... कोण जिंकलं?
16
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
17
"आता पहिल्यासारखं आयुष्य नाही..."; एकाच मुलीशी लग्न करणाऱ्या २ भावांवर कोसळला दु:खाचा डोंगर
18
नवीन गाडीची डिलिव्हरी घेताना अपघात झाला तर? महिंद्रा थारच्या घटनेतून जाणून घ्या विमा क्लेमचे नियम
19
Google Pixel 9: चक्क अर्ध्या किंमतीत खरेदी करा गुगल पिक्सेल ९; कॅमेऱ्यानं अनेकांना लावलंय वेड!

तुराबूल हक दर्गाहच्या विकासाचा आराखडा तयार

By admin | Updated: August 24, 2014 23:53 IST

परभणी : येथील प्रसिद्ध सय्यद शाह तुराबूल हक्क दर्गाचा विकास करण्यासाठी राज्यात प्रथमच पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येणार असून, त्याचा विकास आराखडा औकाफ बोर्डाकडे मंजुरीसाठी सादर केला

परभणी : येथील प्रसिद्ध सय्यद शाह तुराबूल हक्क दर्गाचा विकास करण्यासाठी राज्यात प्रथमच पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येणार असून, त्याचा विकास आराखडा औकाफ बोर्डाकडे मंजुरीसाठी सादर केला जाणार असल्याची माहिती राज्यमंत्री फौजिया खान यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली. राज्यमंत्री फौजिया खान म्हणाल्या, धार्मिक स्थळ आणि पर्यटनाच्या बाबतीत नांदेडची ओळख गुरुद्वारा आहे. त्याचप्रमाणे परभणीची ओळख सय्यद शाह तुराबूल हक्क दर्गा आहे. गुरुद्वारा विकासाच्या निमित्ताने नांदेड शहराचा विकास झाला असून, असाच विकास सय्यद शाह तुराबूल हक्क दर्गाच्या निमित्ताने परभणी शहराचाही होऊ शकतो, हे लक्षात घेऊन हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. राज्यातील चार अल्पसंख्यांक बहुल जिल्ह्यापैकी परभणी हा एक जिल्हा होय. त्यातूनच पालकमंत्री असताना फौजिया खान यांनी दर्गा परिसर विकासाची संकल्पना शासनाकडे मांडली. विकासाचा बृहत आराखडा तयार करण्यासाठी मंत्रालयातील संबंधित अधिकारी, औकाफ विभागाचे अधिकारी, जिल्हाधिकारी, मनपाचे अधिकारी यांच्या वेळोवेळी बैठका घेतल्या. अनेक अडथळ्यानंतर तज्ज्ञ एजन्सीकडून आराखडा तयार करण्याचे ठरले. या प्रकल्पाची फिजीबिलीटी स्टडी करण्यासाठी मिटकॉन या एजन्सीला आराखडा बनविण्याचे काम देण्यात आले. त्यानुसार आराखडा बनवून बांधा- वापरा आणि हस्तांतरित करा या तत्वानुसार प्रकल्प सुरू करण्याचा अहवाल एजन्सीने सादर केला आहे. १२१ कोटी रुपयांचा हा प्रकल्प असून, धार्मिक, शैक्षणिक आणि वाणिज्य अशा तीन भागात हा प्रकल्प तयार केला जाणार आहे. धार्मिक अंतर्गत दर्ग्याचा विकास, हज हाऊस, मशिद, निवासस्थाने, प्रदर्शनस्थळे व आवश्यक सुविधा, तात्पुरते दुकाने, घरकुल योजना, कम्युनिटी हॉल, अ‍ॅम्युजमेंट पार्क आदींचा समावेश आहे. तर शैक्षणिक विभागात अद्ययावत शैक्षणिक संकुल, ऊर्दू घर, मुला-मुलींसाठी वसतीगृह, तांत्रिक विद्यालये आदींचा समावेश राहील. या सर्व खर्चाची जुळवाजुळव करण्यासाठी वाणिज्य विभागामध्ये कंदुरीगृह, स्लॉटर हाऊस, हॉटेल्स, थिएटर्स, व्यापारी गाळे, कल्याणकारी निवासस्थाने पार्र्कींग, रुग्णालय, वस्तू संग्रहालय, बहुउद्देशिय संकूल आदींचा समावेश आहे. २२ आॅगस्ट रोजी वक्फ मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे हा प्रस्ताव फिजिबिलीटी तपासून औकाफ बोर्डासमोर सादर केला आहे. औकाफ बोर्डाच्या मंजुरीनंतर खऱ्या अर्थाने प्रकल्पाला सुरुवात होणार असल्याचे राज्यमंत्री फौजिया खान यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेत राज्यमंत्री फौजिया खान यांनी पाच वर्षांत केलेल्या कामांचा लेखाजोखा मांडला. त्या म्हणाल्या प्रामाणिक प्रयत्न करुन राज्यातील इतर जिल्ह्याच्या तुलनेने अधिक १ हजार कोटी रुपयांचा निधी जिल्ह्यासाठी आणला आहे. (प्रतिनिधी)