शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप
2
डिझेलवाले सुटले...? नाही, पेट्रोलसारखेच इथेनॉल मिसळायचे होते, पण...; नितीन गडकरींच्या मनात चाललेय तरी काय...
3
जगातील ५० इस्लामिक देश एकटवणार; पहिल्यांदाच 'असं' काही घडणार, अमेरिकेची चिंता वाढली
4
भारताला लाल डोळे दाखवणाऱ्या चीनची अर्थव्यवस्था कोलमडली? लोकं पैसे खर्च करायलाच तयार नाही
5
Viral Video : 'ओ काका ही ट्रेन किती अ‍ॅवरेज देते?'; तरुणाच्या प्रश्नावर लोकोपायलटने दिले भन्नाट उत्तर! म्हणाले... 
6
Video: "इरफान... प्रामाणिक राहा..."; IND vs PAK सामन्यानंतर गौतम गंभीर कॅमेऱ्यासमोर असं का बोलला?
7
गर्भवतीची प्रसुती होत असताना प्रसुतीगृहातच एकमेकींशी भिडल्या इंटर्न डॉक्टर, त्यानंतर...  
8
सुपर मॉम! २६ दिवसांच्या लेकीला कुशीत घेऊन दिला इंटरव्ह्यू; आता झाली DSP, पतीने दिली साथ
9
अनंत अंबानी यांच्या वनताराला क्लीनचिट; जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण?
10
ओप्पोचा मोठा धमाका! जबरदस्त फीचर्ससह ३ फोन केले लॉन्च; जाणून घ्या किंमत
11
हवाई दलात इंजिनिअर लोकेश बहिणीच्या घरी आला आणि अचानक २४व्या मजल्यावरून मारली उडी
12
सत्तापालटाच्या अवघ्या ३ दिवसांत नेपाळच्या Gen Z आंदोलकांमध्ये असंतोष; सुशीला कार्कींच्या घराबाहेर निदर्शने!
13
पाकिस्तानला धूळ चारल्यानंतर सूर्यकुमार यादवचं पत्नीसोबत जंगी सेलिब्रेशन, पाहा खास फोटो
14
Astro Tips: घर, प्लॉट विक्रीसाठी सगळे उपाय करून पाहिले? तरी निराशा? करा 'हा' प्रभावी तोडगा!
15
मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेला धक्का? १५ माजी नगरसेवक नाराजीची चर्चा
16
Acharya Devvrat: आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून घेतली शपथ 
17
घाव भर गया है! परेश रावल यांचं 'हेरा फेरी ३'वर भाष्य, दिग्दर्शकासोबतचं नातं बिघडलं? म्हणाले...
18
४०% पार्ट्स होणार स्वस्त! सर्व्हिसिंगच्या बिलातही दिलासा; GST कपातीनंतर सोपा होणार कार-बाईकचा मेंटेनन्स
19
पाकिस्तान फायनलमध्ये हवीय...! प्लीज भारताने पुढला सामना बॉयकॉट करावा; पाकिस्तानी चाहत्यांची मागणी
20
"...तर माझ्या वडिलांचा जीव वाचला असता"; नवजोत सिंग यांच्या मुलाने केला गंभीर आरोप

तुराबूल हक दर्गाहच्या विकासाचा आराखडा तयार

By admin | Updated: August 24, 2014 23:22 IST

परभणी : येथील प्रसिद्ध सय्यद शाह तुराबूल हक्क दर्गाचा विकास करण्यासाठी राज्यात प्रथमच पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येणार असून, त्याचा विकास आराखडा औकाफ बोर्डाकडे मंजुरीसाठी सादर केला

परभणी : येथील प्रसिद्ध सय्यद शाह तुराबूल हक्क दर्गाचा विकास करण्यासाठी राज्यात प्रथमच पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येणार असून, त्याचा विकास आराखडा औकाफ बोर्डाकडे मंजुरीसाठी सादर केला जाणार असल्याची माहिती राज्यमंत्री फौजिया खान यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली. राज्यमंत्री फौजिया खान म्हणाल्या, धार्मिक स्थळ आणि पर्यटनाच्या बाबतीत नांदेडची ओळख गुरुद्वारा आहे. त्याचप्रमाणे परभणीची ओळख सय्यद शाह तुराबूल हक्क दर्गा आहे. गुरुद्वारा विकासाच्या निमित्ताने नांदेड शहराचा विकास झाला असून, असाच विकास सय्यद शाह तुराबूल हक्क दर्गाच्या निमित्ताने परभणी शहराचाही होऊ शकतो, हे लक्षात घेऊन हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. राज्यातील चार अल्पसंख्यांक बहुल जिल्ह्यापैकी परभणी हा एक जिल्हा होय. त्यातूनच पालकमंत्री असताना फौजिया खान यांनी दर्गा परिसर विकासाची संकल्पना शासनाकडे मांडली. विकासाचा बृहत आराखडा तयार करण्यासाठी मंत्रालयातील संबंधित अधिकारी, औकाफ विभागाचे अधिकारी, जिल्हाधिकारी, मनपाचे अधिकारी यांच्या वेळोवेळी बैठका घेतल्या. अनेक अडथळ्यानंतर तज्ज्ञ एजन्सीकडून आराखडा तयार करण्याचे ठरले. या प्रकल्पाची फिजीबिलीटी स्टडी करण्यासाठी मिटकॉन या एजन्सीला आराखडा बनविण्याचे काम देण्यात आले. त्यानुसार आराखडा बनवून बांधा- वापरा आणि हस्तांतरित करा या तत्वानुसार प्रकल्प सुरू करण्याचा अहवाल एजन्सीने सादर केला आहे. १२१ कोटी रुपयांचा हा प्रकल्प असून, धार्मिक, शैक्षणिक आणि वाणिज्य अशा तीन भागात हा प्रकल्प तयार केला जाणार आहे. धार्मिक अंतर्गत दर्ग्याचा विकास, हज हाऊस, मशिद, निवासस्थाने, प्रदर्शनस्थळे व आवश्यक सुविधा, तात्पुरते दुकाने, घरकुल योजना, कम्युनिटी हॉल, अ‍ॅम्युजमेंट पार्क आदींचा समावेश आहे. तर शैक्षणिक विभागात अद्ययावत शैक्षणिक संकुल, ऊर्दू घर, मुला-मुलींसाठी वसतीगृह, तांत्रिक विद्यालये आदींचा समावेश राहील. या सर्व खर्चाची जुळवाजुळव करण्यासाठी वाणिज्य विभागामध्ये कंदुरीगृह, स्लॉटर हाऊस, हॉटेल्स, थिएटर्स, व्यापारी गाळे, कल्याणकारी निवासस्थाने पार्र्कींग, रुग्णालय, वस्तू संग्रहालय, बहुउद्देशिय संकूल आदींचा समावेश आहे. २२ आॅगस्ट रोजी वक्फ मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे हा प्रस्ताव फिजिबिलीटी तपासून औकाफ बोर्डासमोर सादर केला आहे. औकाफ बोर्डाच्या मंजुरीनंतर खऱ्या अर्थाने प्रकल्पाला सुरुवात होणार असल्याचे राज्यमंत्री फौजिया खान यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेत राज्यमंत्री फौजिया खान यांनी पाच वर्षांत केलेल्या कामांचा लेखाजोखा मांडला. त्या म्हणाल्या प्रामाणिक प्रयत्न करुन राज्यातील इतर जिल्ह्याच्या तुलनेने अधिक १ हजार कोटी रुपयांचा निधी जिल्ह्यासाठी आणला आहे. (प्रतिनिधी)