शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

कारखान्यांमध्ये पूर्वतयारी; पहिल्या टप्प्यात ५ हजार कामगारांवर सुरू होतील उद्योग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2020 19:42 IST

चिकलठाणा औद्योगिक वसाहतीत लहान-मोठे ४०० ते ४२५ उद्योग असून रेल्वेस्टेशन परिसरात २५ ते ३० उद्योग आहेत.

ठळक मुद्दे५० दिवसांहून अधिक काळ होते बंद एमआयडीसीकडून आॅनलाईन पासचे वाटप

औरंगाबाद : चिकलठाणा व रेल्वेस्टेशन औद्योगिक वसाहतीतील कारखाने सोमवारपासून  पूर्ण ताकदीनिशी सुरू होतील. सध्या कामगारांना बस किंवा चारचाकीमधून येण्यासाठी ‘एमआयडीसी’मार्फत आॅनलाईन पास दिले जात असून आठवडाभरात दुचाकीवर ये-जा करण्यासाठीदेखील परवानगी मिळण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. 

महापालिका प्रशासनाने या दोन्ही औद्योगिक वसाहतींतील उद्योग सुरू करण्यास बुधवारी रात्री उशिरा अनुमती दर्शवली. त्यानंतर काल गुरुवारपासून उद्योजकांनी ‘एमआयडीसी’च्या पोर्टलवर उद्योग सुरू करण्याची परवानगी मागणारे आॅनलाईन अर्ज केले. चिकलठाणा औद्योगिक वसाहतीत लहान-मोठे ४०० ते ४२५ उद्योग असून रेल्वेस्टेशन परिसरात २५ ते ३० उद्योग आहेत. ‘एमआयडीसी’नेही तत्परता दाखवत कालपासूनच उद्योजकांना परवानगी व कामगारांना कारखान्यांमध्ये ये-जा करण्यासाठी पास वितरित करण्याची प्रक्रिया सुरू केली. 

तथापि, महापालिका प्रशासनाने उद्योग सुरू करण्यास हिरवा कंदिल दाखविल्यानंतर काल गुरुवारपासून या दोन्ही औद्योगिक परिसरातील उद्योगांनी यंत्रांची साफसफाई, निर्जंतुकीकरण, फिजिकल डिस्टन्सिंंगची व्यवस्था, डिजिटल थर्मल स्क्रीनिंग आदी पूर्वतयारी सुरू केली आहे. या दोन्ही औद्योगिक वसाहतींमध्ये शुक्रवारी हा सुटीचा दिवस असतो. त्यामुळे शुक्रवारीही कारखाने व परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या दोन्ही औद्योगिक  परिसरातील कारखान्यांमध्ये एकूण ३० ते ३५ हजार कामगार आहेत. त्यानुसार परिसरामध्ये पहिल्या टप्प्यात साधारणपणे साडेचार ते पाच हजार कामगारांवर उद्योग सुरू केले जातील.  दुसऱ्या टप्प्यात दुचाकीवर येण्याची परवानगी  मिळाल्यानंतर पूर्ण ताकदीनिशी या परिसरातील सर्व उद्योग सुरू होतील, अशी उद्योजकांची अपेक्षा आहे.

पूरक उद्योग आणि पॅकेजिंगचिकलठाणा औद्योगिक वसाहतीत बजाज, व्हेरॉकसारख्या मोठ्या उद्योगांना सुटे भाग पुरविणारे पूरक उद्योग, पॅकेजिंग, इंजिनिअरिंग, औषधी कंपन्यांची संख्या अधिक आहे. गरवारे, वोक्हार्ट असे मोठे उद्योगही आहेत, तर रेल्वेस्टेशन परिसरात इंजिनिअरिंग, स्टेशनरी, वायरिंग उत्पादन करणारे उद्योग आहेत. मागील ५० दिवसांहून अधिक काळ हे उद्योग बंद होते. उशिरा का होईना, उद्योग सुरू करण्यासाठी प्रशासनाने परवानगी दिल्यामुळे उद्योजक व कामगारांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबादbusinessव्यवसायMIDCएमआयडीसी