शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
2
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
3
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
4
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
5
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
6
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
7
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
8
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
9
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
10
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
11
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
12
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
13
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
14
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
15
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
16
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
17
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
18
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
19
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
20
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?

कारखान्यांमध्ये पूर्वतयारी; पहिल्या टप्प्यात ५ हजार कामगारांवर सुरू होतील उद्योग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2020 19:42 IST

चिकलठाणा औद्योगिक वसाहतीत लहान-मोठे ४०० ते ४२५ उद्योग असून रेल्वेस्टेशन परिसरात २५ ते ३० उद्योग आहेत.

ठळक मुद्दे५० दिवसांहून अधिक काळ होते बंद एमआयडीसीकडून आॅनलाईन पासचे वाटप

औरंगाबाद : चिकलठाणा व रेल्वेस्टेशन औद्योगिक वसाहतीतील कारखाने सोमवारपासून  पूर्ण ताकदीनिशी सुरू होतील. सध्या कामगारांना बस किंवा चारचाकीमधून येण्यासाठी ‘एमआयडीसी’मार्फत आॅनलाईन पास दिले जात असून आठवडाभरात दुचाकीवर ये-जा करण्यासाठीदेखील परवानगी मिळण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. 

महापालिका प्रशासनाने या दोन्ही औद्योगिक वसाहतींतील उद्योग सुरू करण्यास बुधवारी रात्री उशिरा अनुमती दर्शवली. त्यानंतर काल गुरुवारपासून उद्योजकांनी ‘एमआयडीसी’च्या पोर्टलवर उद्योग सुरू करण्याची परवानगी मागणारे आॅनलाईन अर्ज केले. चिकलठाणा औद्योगिक वसाहतीत लहान-मोठे ४०० ते ४२५ उद्योग असून रेल्वेस्टेशन परिसरात २५ ते ३० उद्योग आहेत. ‘एमआयडीसी’नेही तत्परता दाखवत कालपासूनच उद्योजकांना परवानगी व कामगारांना कारखान्यांमध्ये ये-जा करण्यासाठी पास वितरित करण्याची प्रक्रिया सुरू केली. 

तथापि, महापालिका प्रशासनाने उद्योग सुरू करण्यास हिरवा कंदिल दाखविल्यानंतर काल गुरुवारपासून या दोन्ही औद्योगिक परिसरातील उद्योगांनी यंत्रांची साफसफाई, निर्जंतुकीकरण, फिजिकल डिस्टन्सिंंगची व्यवस्था, डिजिटल थर्मल स्क्रीनिंग आदी पूर्वतयारी सुरू केली आहे. या दोन्ही औद्योगिक वसाहतींमध्ये शुक्रवारी हा सुटीचा दिवस असतो. त्यामुळे शुक्रवारीही कारखाने व परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या दोन्ही औद्योगिक  परिसरातील कारखान्यांमध्ये एकूण ३० ते ३५ हजार कामगार आहेत. त्यानुसार परिसरामध्ये पहिल्या टप्प्यात साधारणपणे साडेचार ते पाच हजार कामगारांवर उद्योग सुरू केले जातील.  दुसऱ्या टप्प्यात दुचाकीवर येण्याची परवानगी  मिळाल्यानंतर पूर्ण ताकदीनिशी या परिसरातील सर्व उद्योग सुरू होतील, अशी उद्योजकांची अपेक्षा आहे.

पूरक उद्योग आणि पॅकेजिंगचिकलठाणा औद्योगिक वसाहतीत बजाज, व्हेरॉकसारख्या मोठ्या उद्योगांना सुटे भाग पुरविणारे पूरक उद्योग, पॅकेजिंग, इंजिनिअरिंग, औषधी कंपन्यांची संख्या अधिक आहे. गरवारे, वोक्हार्ट असे मोठे उद्योगही आहेत, तर रेल्वेस्टेशन परिसरात इंजिनिअरिंग, स्टेशनरी, वायरिंग उत्पादन करणारे उद्योग आहेत. मागील ५० दिवसांहून अधिक काळ हे उद्योग बंद होते. उशिरा का होईना, उद्योग सुरू करण्यासाठी प्रशासनाने परवानगी दिल्यामुळे उद्योजक व कामगारांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबादbusinessव्यवसायMIDCएमआयडीसी