शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
4
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
5
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
6
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
7
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
8
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
9
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
10
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
11
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
12
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
13
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
14
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
15
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
16
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
17
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
18
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
19
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
20
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
Daily Top 2Weekly Top 5

अंतापूरकरांना धोक्याचा इशारा

By admin | Updated: June 10, 2014 00:16 IST

श्रीधर दीक्षित, देगलूर निमशासकीय नोकरीच्या राजीनाम्यानंतर काँग्रेस पक्षाचे सदस्यत्व व देगलूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळविलेल्या रावसाहेब अंतापूरकर यांनी २००९ च्या निवडणुकीत अल्पश:

श्रीधर दीक्षित, देगलूर निमशासकीय नोकरीच्या राजीनाम्यानंतर काँग्रेस पक्षाचे सदस्यत्व व देगलूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळविलेल्या रावसाहेब अंतापूरकर यांनी २००९ च्या निवडणुकीत अल्पश: मताधिक्याने तत्कालीन आमदार सुभाष साबणे यांना मात देवून चमत्कार घडविला़ त्याची पुनरावृत्ती होईल अशी अपेक्षा करणाऱ्यांना नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतील अल्प मताधिक्याचा विचार करावा लागेल़ एकूणच काँग्रेस आमदार अंतापूरकरांना हा धोक्याचा इशारा आहे़ लोकसभा निवडणुकीत देगलूर मतदारसंघातून काँग्रेसला मिळालेले तोकडे मताधिक्य या पार्श्वभूमीवर विद्यमान आमदार रावसाहेब अंतापूरकर नेमकी काय भूमिका घेतील हे नजीकच्या काळात स्पष्ट होणार आहे़ देगलूर विधासभा मतदारसंघात काँग्रेस व सेना-भाजप या दोन प्रमुख पक्षामध्येच लढत होईल, हे सुस्पष्ट आहे़ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने किंवा आम आदमी पक्षाने येथे उमेदवार दिले तरी या पक्षांच्या संघटनेने अद्याप बाळसेही धरलेले नाही़ काँग्रेस पक्षाकडून उमेदवारीसाठी अन्य कुणाचे नाव समोर नाही आणि विद्यमान आमदारास उमेदवारी देण्याचा काँग्रेस पक्षाचा निर्णय झाल्यास अंतापूरकर हेच उमेदवार राहू शकतात़ विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवूनच शिवसेनेचे सुभाष साबणे यांनी लोकसभेच्या वेळी येथील प्रचार मोहीम राबविली़, परंतु आता उमेदवारी पदरात पाडून घेण्यासाठी साबणे यांना संघर्ष करावा लागणार असल्याचे दिसते़ शिवसेनेचे पदाधिकारी नागनाथ वाडेकर यांनी प्रथमच पक्षाकडे विधानसभेसाठी उमेदवारी मागितली असून जिल्हाप्रमुखांनी त्यासाठी शिफारस केली आहे़मागील विधानसभा निवडणुकीत आघाडीचा धर्म गुंडाळून ठेवून राष्ट्रवादीच्या मारोती वाडेकर यांनी बंडखोरी केली़ राष्ट्रवादीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी वाडेकर यांचा उघड प्रचार केला़ मात्र अंतापूरकर व साबणे अशी सरळ लढत झाली व १६ हजार ८०० मते घेवून मारोती वाडेकर हे तिसऱ्या स्थानावर राहिले़ लोकसभा निवडणुकीत वाडेकर हे चव्हाणांच्या बाजूने सक्रिय होते़ आ़ अमरनाथ राजूरकर यांच्याशीही जवळीक वाढविली़ आ़ अंतापूरकर यांच्याविरूद्ध देगलुरातील काँग्रेसचे पदाधिकारी व नगरसेवकांनी अशोकराव चव्हाण यांच्यासमक्ष रोष व्यक्त केला होता़ त्यांना या मतदारसंघातून केवळ २३३७ एवढेच मताधिक्य मिळाले़ हे सर्व धागे एकत्रित करून आघाडीची उमेदवारी मिळवून नशीब आजमावण्याचा प्रयत्न मारोतीरावांनी चालविला आहे़ कौटुंबिक व सार्वजनिक कार्यक्रमात हजेरी लावत माजी आ़ साबणे यांनी संपर्क मोहीम वाढविली आहे़ तर शिवसेनेकडूनच उमेदवारी मिळविण्याच्या स्पर्धेत भीमराव क्षीरसागरही उतरले आहेत. त्यांनी मतदारसंघातील संपर्क वाढविला आहे. त्यामुळे लढतीत प्रमुख पक्षांचे उमेदवार कोण असतील, याची प्रतीक्षा आहे़