शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
4
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
5
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
6
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
7
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
8
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
9
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
10
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
11
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
12
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
13
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
14
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
15
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
16
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
17
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
18
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
19
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
20
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 

अंतापूरकरांना धोक्याचा इशारा

By admin | Updated: June 10, 2014 00:16 IST

श्रीधर दीक्षित, देगलूर निमशासकीय नोकरीच्या राजीनाम्यानंतर काँग्रेस पक्षाचे सदस्यत्व व देगलूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळविलेल्या रावसाहेब अंतापूरकर यांनी २००९ च्या निवडणुकीत अल्पश:

श्रीधर दीक्षित, देगलूर निमशासकीय नोकरीच्या राजीनाम्यानंतर काँग्रेस पक्षाचे सदस्यत्व व देगलूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळविलेल्या रावसाहेब अंतापूरकर यांनी २००९ च्या निवडणुकीत अल्पश: मताधिक्याने तत्कालीन आमदार सुभाष साबणे यांना मात देवून चमत्कार घडविला़ त्याची पुनरावृत्ती होईल अशी अपेक्षा करणाऱ्यांना नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतील अल्प मताधिक्याचा विचार करावा लागेल़ एकूणच काँग्रेस आमदार अंतापूरकरांना हा धोक्याचा इशारा आहे़ लोकसभा निवडणुकीत देगलूर मतदारसंघातून काँग्रेसला मिळालेले तोकडे मताधिक्य या पार्श्वभूमीवर विद्यमान आमदार रावसाहेब अंतापूरकर नेमकी काय भूमिका घेतील हे नजीकच्या काळात स्पष्ट होणार आहे़ देगलूर विधासभा मतदारसंघात काँग्रेस व सेना-भाजप या दोन प्रमुख पक्षामध्येच लढत होईल, हे सुस्पष्ट आहे़ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने किंवा आम आदमी पक्षाने येथे उमेदवार दिले तरी या पक्षांच्या संघटनेने अद्याप बाळसेही धरलेले नाही़ काँग्रेस पक्षाकडून उमेदवारीसाठी अन्य कुणाचे नाव समोर नाही आणि विद्यमान आमदारास उमेदवारी देण्याचा काँग्रेस पक्षाचा निर्णय झाल्यास अंतापूरकर हेच उमेदवार राहू शकतात़ विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवूनच शिवसेनेचे सुभाष साबणे यांनी लोकसभेच्या वेळी येथील प्रचार मोहीम राबविली़, परंतु आता उमेदवारी पदरात पाडून घेण्यासाठी साबणे यांना संघर्ष करावा लागणार असल्याचे दिसते़ शिवसेनेचे पदाधिकारी नागनाथ वाडेकर यांनी प्रथमच पक्षाकडे विधानसभेसाठी उमेदवारी मागितली असून जिल्हाप्रमुखांनी त्यासाठी शिफारस केली आहे़मागील विधानसभा निवडणुकीत आघाडीचा धर्म गुंडाळून ठेवून राष्ट्रवादीच्या मारोती वाडेकर यांनी बंडखोरी केली़ राष्ट्रवादीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी वाडेकर यांचा उघड प्रचार केला़ मात्र अंतापूरकर व साबणे अशी सरळ लढत झाली व १६ हजार ८०० मते घेवून मारोती वाडेकर हे तिसऱ्या स्थानावर राहिले़ लोकसभा निवडणुकीत वाडेकर हे चव्हाणांच्या बाजूने सक्रिय होते़ आ़ अमरनाथ राजूरकर यांच्याशीही जवळीक वाढविली़ आ़ अंतापूरकर यांच्याविरूद्ध देगलुरातील काँग्रेसचे पदाधिकारी व नगरसेवकांनी अशोकराव चव्हाण यांच्यासमक्ष रोष व्यक्त केला होता़ त्यांना या मतदारसंघातून केवळ २३३७ एवढेच मताधिक्य मिळाले़ हे सर्व धागे एकत्रित करून आघाडीची उमेदवारी मिळवून नशीब आजमावण्याचा प्रयत्न मारोतीरावांनी चालविला आहे़ कौटुंबिक व सार्वजनिक कार्यक्रमात हजेरी लावत माजी आ़ साबणे यांनी संपर्क मोहीम वाढविली आहे़ तर शिवसेनेकडूनच उमेदवारी मिळविण्याच्या स्पर्धेत भीमराव क्षीरसागरही उतरले आहेत. त्यांनी मतदारसंघातील संपर्क वाढविला आहे. त्यामुळे लढतीत प्रमुख पक्षांचे उमेदवार कोण असतील, याची प्रतीक्षा आहे़