शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

अंतापूरकरांना धोक्याचा इशारा

By admin | Updated: June 10, 2014 00:16 IST

श्रीधर दीक्षित, देगलूर निमशासकीय नोकरीच्या राजीनाम्यानंतर काँग्रेस पक्षाचे सदस्यत्व व देगलूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळविलेल्या रावसाहेब अंतापूरकर यांनी २००९ च्या निवडणुकीत अल्पश:

श्रीधर दीक्षित, देगलूर निमशासकीय नोकरीच्या राजीनाम्यानंतर काँग्रेस पक्षाचे सदस्यत्व व देगलूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळविलेल्या रावसाहेब अंतापूरकर यांनी २००९ च्या निवडणुकीत अल्पश: मताधिक्याने तत्कालीन आमदार सुभाष साबणे यांना मात देवून चमत्कार घडविला़ त्याची पुनरावृत्ती होईल अशी अपेक्षा करणाऱ्यांना नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतील अल्प मताधिक्याचा विचार करावा लागेल़ एकूणच काँग्रेस आमदार अंतापूरकरांना हा धोक्याचा इशारा आहे़ लोकसभा निवडणुकीत देगलूर मतदारसंघातून काँग्रेसला मिळालेले तोकडे मताधिक्य या पार्श्वभूमीवर विद्यमान आमदार रावसाहेब अंतापूरकर नेमकी काय भूमिका घेतील हे नजीकच्या काळात स्पष्ट होणार आहे़ देगलूर विधासभा मतदारसंघात काँग्रेस व सेना-भाजप या दोन प्रमुख पक्षामध्येच लढत होईल, हे सुस्पष्ट आहे़ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने किंवा आम आदमी पक्षाने येथे उमेदवार दिले तरी या पक्षांच्या संघटनेने अद्याप बाळसेही धरलेले नाही़ काँग्रेस पक्षाकडून उमेदवारीसाठी अन्य कुणाचे नाव समोर नाही आणि विद्यमान आमदारास उमेदवारी देण्याचा काँग्रेस पक्षाचा निर्णय झाल्यास अंतापूरकर हेच उमेदवार राहू शकतात़ विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवूनच शिवसेनेचे सुभाष साबणे यांनी लोकसभेच्या वेळी येथील प्रचार मोहीम राबविली़, परंतु आता उमेदवारी पदरात पाडून घेण्यासाठी साबणे यांना संघर्ष करावा लागणार असल्याचे दिसते़ शिवसेनेचे पदाधिकारी नागनाथ वाडेकर यांनी प्रथमच पक्षाकडे विधानसभेसाठी उमेदवारी मागितली असून जिल्हाप्रमुखांनी त्यासाठी शिफारस केली आहे़मागील विधानसभा निवडणुकीत आघाडीचा धर्म गुंडाळून ठेवून राष्ट्रवादीच्या मारोती वाडेकर यांनी बंडखोरी केली़ राष्ट्रवादीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी वाडेकर यांचा उघड प्रचार केला़ मात्र अंतापूरकर व साबणे अशी सरळ लढत झाली व १६ हजार ८०० मते घेवून मारोती वाडेकर हे तिसऱ्या स्थानावर राहिले़ लोकसभा निवडणुकीत वाडेकर हे चव्हाणांच्या बाजूने सक्रिय होते़ आ़ अमरनाथ राजूरकर यांच्याशीही जवळीक वाढविली़ आ़ अंतापूरकर यांच्याविरूद्ध देगलुरातील काँग्रेसचे पदाधिकारी व नगरसेवकांनी अशोकराव चव्हाण यांच्यासमक्ष रोष व्यक्त केला होता़ त्यांना या मतदारसंघातून केवळ २३३७ एवढेच मताधिक्य मिळाले़ हे सर्व धागे एकत्रित करून आघाडीची उमेदवारी मिळवून नशीब आजमावण्याचा प्रयत्न मारोतीरावांनी चालविला आहे़ कौटुंबिक व सार्वजनिक कार्यक्रमात हजेरी लावत माजी आ़ साबणे यांनी संपर्क मोहीम वाढविली आहे़ तर शिवसेनेकडूनच उमेदवारी मिळविण्याच्या स्पर्धेत भीमराव क्षीरसागरही उतरले आहेत. त्यांनी मतदारसंघातील संपर्क वाढविला आहे. त्यामुळे लढतीत प्रमुख पक्षांचे उमेदवार कोण असतील, याची प्रतीक्षा आहे़