शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, मुंबईत जागावाटपाचा तिढा सुटला; भाजपा-शिंदेसेना किती जागा लढणार?
2
"मुंबईचा महापौर पठाण, शैख, सैयद, अन्सारी का होऊ शकत नाही?"; वारीस पठाण यांचा प्रश्न, संजय राऊतांचंही स्पष्टच उत्तर!
3
भारतीयांना रशियन दारूचे वेड! १० महिन्यांत ५२० टन व्हिस्की, जिन आणि वोडका रिचवली
4
कानातले, मोजे आणि अंडरगारमेंट गायब...; उदयपूर गँगरेपमधील IT मॅनेजर पीडितेची आपबीती
5
मंत्री भरत गोगावलेंचे पुत्र विकास गोगावले २४ दिवसांपासून पोलिसांना सापडेना, महाडमधील प्रकरण काय?
6
पोलिसांवर दगडफेक! 12 महिलांसह 75 जणांना अटक; जयपूरमध्ये मध्यरात्री नेमकं काय झालं?
7
"धुरंधर हा एक भयानक कुत्रा...", राम गोपाल वर्मा यांचं वादग्रस्त ट्वीट, म्हणाले- "गेल्या ५० वर्षांत..."
8
"राहिलेलं आयुष्य राजसाहेबांसोबत" म्हणणाऱ्या पाटलांनी मनसे सोडली; भाजपला लबाड म्हटल्याचा व्हिडीओ व्हायरल
9
भाईंदरनंतर आता ठाण्यात बिबट्या घुसला, नागरिकांमध्ये दहशत, नेमका कुठे आणि कधी दिसला?
10
भाजपाच्या सांगण्यावरून शिवसेना चालणार का?; संतप्त शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांचं पुण्यात आंदोलन
11
भारतातच फिरायला जायचा विचार करताय? 'या' ४ राज्यांत विनापरवाना गेलात तर होईल ५ वर्षांची जेल!
12
₹७६१३ वरुन ₹१५२२ वर आला 'हा' शेअर; अखेर का एका दिवसात ८० टक्क्यांनी स्वस्त झाला स्टॉक?
13
Malegaon Municipal Corporation Election : दोन्ही ठाकरे बंधूंची झाली युती; मालेगाव पालिकेत प्रभाव किती? मनोमिलनानंतर शांतता
14
"ते माझं भवितव्य बरबाद करतील...", 'इंडियन आयडल' जिंकल्यानंतर अभिजीत सावंतने केलेला मोठा गौप्यस्फोट
15
"ड्रग्ज... शिंदे... माजी पोलीस अधिकारी..., राज्याचं राजकारण नशेबाज झालंय!"; राऊतांचा फडणवीसांवर निशाणा
16
पुन्हा राज्यसभेवर संधी मिळेल का? मोदी सरकारमधील सहा मंत्र्यांची 2026 मध्ये ‘अग्निपरीक्षा’
17
अरे हे काय! मुंबईच्या संघात दोन-दोन रोहित; व्हायरल फोटो पाहून चाहते थक्क, हिटमॅनचा 'ड्युप्लिकेट' कोण?
18
सरकारी कर्मचारी दांपत्यांना दिलासा! पती-पत्नीची एकाच शहरात नियुक्ती करण्याचे केंद्राचे निर्देश
19
Malegaon Municipal Corporation Election : मालेगावमध्ये एमआयएम-काँग्रेस युतीचा प्रयोग; वरिष्ठांच्या हालचाली, जागा वाटपाचीही चर्चा
20
Accident : भाड्याने थार घेतली, गर्लफ्रेंडला भेटायला निघाला; समोर कुटुंब दिसताच गाडी पळवू लागला अन्... 
Daily Top 2Weekly Top 5

आता रंगणार पूर्व विदर्भाच्या पाण्याचा खेळ

By admin | Updated: July 20, 2016 00:27 IST

औरंगाबाद : मराठवाड्याच्या पाणीप्रश्नात आता पूर्व विदर्भातील पाण्याची भर पडणार आहे. पूर्व विदर्भातील जादा पाणी मराठवाड्यात आणण्यासाठी प्रकल्प अहवाल तयार

औरंगाबाद : मराठवाड्याच्या पाणीप्रश्नात आता पूर्व विदर्भातील पाण्याची भर पडणार आहे. पूर्व विदर्भातील जादा पाणी मराठवाड्यात आणण्यासाठी प्रकल्प अहवाल तयार करून देण्याची तयारी नागपूर येथील एका स्वयंसेवी संस्थेने दाखविली असून, त्यासाठी २५ लाख रुपयांची मागणी केली आहे. विशेष म्हणजे या संस्थेला ही रक्कम द्यावी, यासाठी मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने मराठवाडा विकास मंडळावर दबाव आणण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येत आहे.नगर, नाशिक जिल्ह्यांतून मराठवाड्याच्या हक्काचे पाणी देण्यास विरोध होत असताना आता पूर्व विदर्भातील जादा पाणी मराठवाड्याकडे वळविण्याचे प्रयत्न होत आहेत. पूर्व विदर्भाच्या गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांतून वाहणाऱ्या वैनगंगा आणि वर्धा या नद्या पुढे प्राणहिता या नदीस मिळतात. प्राणहिता नदीचे पाणी उपसा पद्धतीने हिंगोली, परभणी व जालना जिल्ह्यांत आणता येऊ शकते. मराठवाडा विकास मंडळाने त्यासाठी पाठपुरावा सुरूकेला असतानाच नागपूरच्या सेंटर फॉर रुरल वेलफेअर (पान ५ वर)पूर्व विदर्भातील जादा पाणी मराठवाड्यात आणण्यासाठी अहवाल तयार करण्याची तयारी सेंटर फॉर रुरल वेलफेअर या संस्थेने दाखविली आहे. त्यासाठी २५ लाख रुपयांच्या निधीची मागणीही केली आहे. मंडळाच्या बैठकीत संस्थेचा प्रस्ताव समोर आल्यानंतर चर्चा करून निर्णय घेतला जाईल.- उमाकांत दांगट, विभागीय आयुक्त तथा अध्यक्ष मराठवाडा विकास मंडळपूर्व विदर्भातील पाणी मराठवाड्यात आणता येऊ शकते. हिंगोली, परभणी आणि जालना या जिल्ह्यांना याचा फायदा होऊ शकतो. नागपूर येथील संस्थेने त्यासाठी प्रकल्प अहवाल तयार करून देण्याची तयारी दर्शविली आहे. या संस्थेने मागितलेली २५ लाख रुपयांची रक्कम तुलनेने खूप जास्त असून, ती देणे अयोग्य आहे. अहवालासाठी या संस्थेस ३ ते ५ लाख रुपये दिल्यास वावगे ठरणार नाही.- शंकरराव नागरे, सदस्य मराठवाडा विकास मंडळलांबून पाणी आणण्याच्या कोणत्याही योजना आगामी काळात यशस्वी होणार नाहीत, अशा योजनांची कामे निधीअभावी अर्धवट राहतील. पर्यावरण खात्याचीही त्यांना मान्यता मिळणार नाही. कृष्णा खोऱ्याचे पाणी मराठवाड्यात आणण्यासाठी ५०० कोटी रुपये खर्च करण्यात आले, परंतु प्रत्यक्षात पाणी मिळालेच नाही. पूर्व विदर्भातील पाण्याचेही असेच होईल. विशेष म्हणजे यामुळे राजकीय, सामाजिक व आर्थिक प्रश्नही निर्माण होऊ शकतात.- प्रदीप पुरंदरे, जलतज्ज्ञ