शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
2
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
3
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
4
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
5
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
6
Poonam Pandey: रामायणात पूनम पांडे रावणाच्या पत्नीच्या भूमिकेत, रामलीला कमिटी म्हणते- "तिला सुधरायचं आहे..."
7
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित
8
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
9
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
10
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
11
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
13
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
14
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
15
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
16
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
17
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
18
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
19
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
20
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका

पीपीई कीट, मास्कमुळे आरोग्य कर्मचारी देताहेत आजारांना तोंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2020 16:27 IST

पीपीई कीट वापरल्याने अचानक चक्कर, डिहायड्रेशन

ठळक मुद्देडॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचा रोज ६ तास वापर परिणामांकडे दुर्लक्ष करून कोरोनाविरुद्ध लढा

- संतोष हिरेमठ

औरंगाबाद : गेल्या ७ महिन्यांपासून डॉक्टर, परिचारिका, आरोग्य कर्मचारी अविरतपणे कोरोनाविरुद्ध लढा देत आहेत. उपचारातून शेकडो रुग्णांना त्यांनी कोरोनामुक्त केले. मात्र, या लढ्यात रोज किमान ६ तास पीपीई कीट, मास्क वापरावा लागतो. त्यादरम्यान पाणीही पिता येत नाही, लघुशंकेला जाता येत नाही. त्यातून अचानक चक्कर येणे,  डिहायड्रेशन, किडनीवर परिणाम अशा समस्यांना त्यांना तोंड द्यावे लागत आहे.

औरंगाबादेत मार्चपासून कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू आहे. गेल्या ७ महिन्यांत जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या ३७ हजारांवर गेली. यातील ३५ हजारांवर रुग्ण बरे झाले आहेत. जिल्ह्यात जिल्हा परिषद, मनपा, घाटी, जिल्हा रुग्णालय आणि खाजगी रुग्णालयांतील डॉक्टर, कर्मचारी २४ तास कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत. उपचार करताना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. कोरोनाच्या प्रारंभी पीपीई कीट घालून उपचार करणे ही बाब सर्वांसाठी नवीन होती. शिवाय कोरोनाची सुरुवात ऐन उन्हाळ्यात झाली. त्यामुळे सुरुवातील हे कीट घालून उपचार करताना डॉक्टर, आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रचंड शारीरिक त्रासाला सामोरे जावे लागले. घामाघूम होत उपचाराची कसरत करावी लागली. ही कसरत अजूनही सुरूच आहे. पीपीई कीट, मास्क घालून ६ ते ८ तास कर्तव्य बजावताना अनेक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. मास्कमुळे श्वसनावर परिणाम होतो. तरीही रुग्णसेवेत कोणताही फरक पडणार नाही, याची काळजी आरोग्य कर्मचारी घेताना दिसतात. 

पीपीई कीट वापरल्याने अचानक चक्कर, डिहायड्रेशनआयसीयूमध्ये किमान ६ तास कर्तव्य बजवावे लागते. त्यामुळे एकदा याठिकाणी गेल्यानंतर किमान ६ तास  पीपीई कीट, मास्क काढता येत नाही. त्यामुळे  पाणीही पिता येत नाही. त्यातूून अचानक चक्कर येणे, डिहायड्रेशनच्या समस्यांना आरोग्य कर्मचारी सामोरे जात आहेत. पीपीई कीट परिधान केल्यानंतर लघुशंकेलाही जाता येत नाही. त्यामुळे याचाही सर्वाधिक त्रास सहन करावा लागतो. परिणामी, त्यातूनही शारीरिक आजारांना आमंत्रण मिळण्याचा धोका बळावत आहे.रुग्णसेवा देताना पीपीई कीटमुळे ६ ते ८ तास पाणी पिता येत नाही. त्यामुळे निवासी डॉक्टरांना अचानक चक्कर येण्याचे प्रकार झाल्याचे मार्ड संघटनेचे अध्यक्ष डॉ. आबासाहेब तिडके म्हणाले.

कर्तव्यानंतर व्हावे लागते क्वारंटाईनघाटीतील निवासी डॉक्टरांना १४ दिवस रुग्णसेवा दिल्यानंतर पुढील ७ दिवस क्वारंटाईन व्हावे लागते. तर जिल्हा रुग्णालयातील आरोग्य कर्मचाऱ्यांना एक दिवसाआड कर्तव्य दिले जात आहे.

कुटुंबापासून दूर राहण्याची वेळकोरोना रुग्णांवर उपचार देत असल्याने डॉक्टर, परिचारिका, आरोग्य कर्मचारी आपल्यामुळे कुटुंबातील सदस्यांपासून काहीसे दूर राहत आहेत. अनेकांनी तात्पुरत्या स्वरूपात किरायाच्या घरात राहणे पसंत केले आहे. तर काहींनी घरातच वेगळे राहण्याची व्यवस्था केली आहे. अशावेळी मोबाईलवरून संवाद, व्हिडिओ कॉलिंगद्वारे कुटुंबाबरोबर संवाद साधला जातो. 

रोटेशननुसार कर्तव्य दिले जातेडॉक्टर, कर्मचाऱ्यांना रोटेशननुसार कर्तव्य दिले जाते. दोन कर्तव्यांत मोठे अंतर असते. रुग्णांचा राऊंड घेताना पीपीई कीट वापरण्यास प्राधान्य दिले जाते.  पूर्वीच्या तुलनेतील सध्याचे पीपीई कीट अतिशय चांगले आहे. त्यामुळे त्यांचा काहीही त्रास होत नाही. सतत मास्कचा वापर केल्याने कोणताही परिणाम होत नाही. - डॉ. सुंदर कुलकर्णी, जिल्हा शल्यचिकित्सक

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबादdoctorडॉक्टर