शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
2
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
3
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
4
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
5
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
6
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
7
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
8
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
9
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
10
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
11
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
12
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
13
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
14
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
15
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
16
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
17
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
18
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
19
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
20
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!

सिल्लोड तालुक्यातील १६५ पैकी १४० पाणी योजनांची वीज ‘गूल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 1:26 AM

सहा कोटींचे वीजबिल थकल्याने महावितरण कंपनीने तालुक्यातील १६५ पैकी १४० पाणीपुरवठा योजनांचा वीजपुरवठा खंडित केल्याने तालुक्यात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे.

श्यामकुमार पुरे ।लोकमत न्यूज नेटवर्कसिल्लोड : सहा कोटींचे वीजबिल थकल्याने महावितरण कंपनीने तालुक्यातील १६५ पैकी १४० पाणीपुरवठा योजनांचा वीजपुरवठा खंडित केल्याने तालुक्यात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे.१६५ पाणीपुरवठा योजनांकडे महावितरण कंपनीचे तब्बल ५ कोटी ८३ लाख रुपये वीजबिल थकले आहे. त्यामुळे या वसुलीसाठी गेल्या आठ दिवसांत १४० पाणीपुरवठा योजनांची वीज महावितरणने ‘गूल’ केली आहे. त्यामुळे तालुक्यातील नागरिक पाण्यासाठी भटकंती करीत आहेत.तालुक्यातील ११ गावात २२ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. तर ११ गावांत आणखी टँकर सुरू करावे, अशी मागणी ग्रामपंचायतींनी केली आहे. अजून ९ गावांत टँकर सुरू करण्याची मागणी आली आहे. नाटवी, आमसरी, मादनी, उंडणगाव, भराडी,पालोद, वांगी, मोढा, रहिमाबाद, दहीगाव, अंभई, कोटनांद्रा, धानोरा, केळगाव, सावखेडा, आधारवाडी, शिवना, खुपटा, जळकी बाजार, वडाळी, चांदापूर, मंगरूळ, आसडी, सराटी, हळदा, बोदवड, मुखपाठ या पाणीपुरवठा योजनांचे वीज कनेक्शन कट करण्यात आले आहे. टंचाईग्रस्त गावात प्रशासन टँकरद्वारे पाणीपुरवठा देण्याचा प्रयत्न करीत असताना महावितरण कंपनीने गावकºयांना ‘शॉक’ दिल्याने नाराजी वाढली आहे.महावितरणच्या एकूण थकीत १० कोटी ८३ लाख रुपयांपैकी १ कोटी ५० लाख रुपये आठ दिवसांत वसूल झाले आहे. त्यात पाणीपुरवठा योजनेकडून ११ लाख तर इतर ग्राहकांकडून मिळून एकूण १ कोटी ५० लाख रुपये वसूल झाले असल्याचे अधिकार यांनी सांगितले.तालुक्यातील १४० पैकी ४० पाणीपुरवठा योजनांचे बिल भरले आहे. त्यामुळे तासगाव, अजिंठा, वसई, मंगरूळ, गव्हाली, भवन, मोढा, पिरोला, लोणवाडी, कासोद म्हसला खुर्द, बोरगाव बाजार, बोरगाव सारवणी, उपळी, घाटनांद्रा, चारनेर, पेंढगाव,खुपटा, गोळेगाव, लिहाखेडी, मांडणा आदी ४० पाणीपुरवठा योजनांचे वीज कनेक्शन पूर्ववत सुरू करण्यात आले. अजूनही तालुक्यातील १०० पाणीपुरवठा योजनांचे वीज कनेक्शन कट आहे. लवकर थकबाकी भरून सहकार्य करावे.-एस. बी. अधिकार, उपविभागीय अभियंता, महावितरण४सिल्लोड तालुक्यात २६ हजार २०० शेतकरी वीज ग्राहक आहेत. त्यांच्याकडून मागील तीन महिन्यात ३ कोटी ५० लाख रुपये वसूल करण्यात आले असले तरी अजून ५३ कोटी ५० लाख रुपये बाकी आहे.-एस. बी. अधिकार,उपविभागीय अभियंता महावितरण सिल्लोड