शहरं
Join us  
Trending Stories
1
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
2
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
3
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
4
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये २ नक्षलवादी ठार; गेल्या २४ तासांत दुसरी मोठी कारवाई
5
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
6
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता
7
"सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला, आतातरी तो अन्यायकारी शासन निर्णय रद्द करा’’, काँग्रेसची मागणी 
8
आता जुनी कार चालवणं होणार महाग, फिटनेस टेस्टच्या नावाखाली खिसे कापायची तयारी
9
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
10
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
11
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
12
VIRAL : "हा तर आमच्या पाणीपुरीचा अपमान"; सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओ पाहून का संतापले नेटकरी?
13
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत होते मंत्री, तेवढ्यात धडाधड कोसळलं छत, त्यानंतर...  
14
नोकरी गमावल्यानंतर तुमचे गृहकर्ज, गाडीचा हप्ता भरला जाईल! काय आहे जॉब लॉस इन्शुरन्स? कसा मिळवायचा?
15
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
16
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
17
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
18
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
19
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
20
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!

पंढरपुरात हरवलेले पाकिट पोस्टाने घरपोच

By admin | Updated: August 23, 2015 00:01 IST

मोहन साखरे, नंदागौळ काळाच्या ओघात नैतिकता व प्रामाणिकपणाची उदाहरणे दुर्मिळ झाली आहेत. मात्र, आजही प्रामाणिक लोक असल्याचे उदाहरण पहावयास मिळत आहे.

पंढरपुरात हरवलेले पाकिट पोस्टाने घरपोचमोहन साखरे, नंदागौळकाळाच्या ओघात नैतिकता व प्रामाणिकपणाची उदाहरणे दुर्मिळ झाली आहेत. मात्र, आजही प्रामाणिक लोक असल्याचे उदाहरण पहावयास मिळत आहे. आषाढी वारीत लाखो लोकांच्या गर्दीत हरवलेले पाकिट तब्बल महिनाभरानंतर भाविकाला अनपेक्षितपणे त्याच्या पत्त्यावर मिळाले. कर्मचाऱ्याने प्रामाणिक उद्देश ठेवून आजच्या काळात आदर्श घडावा असे उदाहरण समोर ठेवले आहे.पंढरपूरच्या विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीच्या रमेश गोडसे या कर्मचाऱ्याने मंदिर समितीचा गौरव वाढवणारे कार्य केले आहे. त्याचे झाले असे, परळीपासून जवळच असलेल्या उखळी बु. येथील भाविक सुरेंद्र भास्करराव जोशी हे आषाढी वारीनिमित्त पंढरपूरला गेले होते. मंदिरात विठूरायाचे दर्शन झाल्यानंतर नगर प्रदक्षिणा करण्यासाठी निघालेले असताना त्यांच्या खिशातील पाकिट गायब झाल्याचे कळले. पाकिटात काही रक्कम, आधारकार्डची दुय्यम प्रत व काही पावत्या आदी साहित्य होते. एवढ्या गर्दीत पाकिट कोठे शोधणार ? असे वाटून पाकिट गेले असल्याचा ठाम विचार त्यांनी केला व विषय सोडून दिला. काही दिवसानंतर मंदिर समितीचे पार्सल अनपेक्षितपणे त्यांच्या पत्त्यावर आले. सर्वांना प्रसादाचे पार्सल असल्याचे वाटले. मात्र, ध्यानीमनी नसताना हरवलेले पाकिट असल्याचे दिसले व आश्चर्याचा सुखद धक्का बसला. विशेष म्हणजे पाकिटातील सर्व साहित्य जशास तसे होते. शिवाय पोस्टेजच्या खर्चासाठी लागणारी रक्कम पाकिटातून न काढता स्वखर्चाने करण्यात आली होती. पाकिटचे पार्सल मिळाल्यनांतर फोन करावा, अशी सूचनाही चिठ्ठीद्वारे करण्यात आली होती. संपर्क साधला असता प्रामाणिकपणा दाखविणारा माणूस विठ्ठल-रूक्मिणी मंदिर समितीचा कर्मचारी असल्याचे समजले.