शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनमुळे औरंगाबादवर दीर्घकालीन परिणामाची शक्यता; आढावा घेऊन पुनर्विचार करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2020 19:41 IST

उद्योगपती रिषी बागला यांची लॉकडाऊनचा दोन दिवसांत आढावा घेऊन प्रशासनाने पुनर्विचार करण्याची मागणी

ठळक मुद्दे कचरा, पाणी यासारख्या कारणांनी आधीच औरंगाबादची बदनामी झाली आहे.कोविडच्या पार्श्वभूमीवर इथले प्रशासन नियंत्रण मिळवण्यात अपयशी १४४ कलम लागू करून उद्योग, व्यवसाय सुरू करावेत.

औरंगाबाद : लॉकडाऊनमध्ये दोन-तीन दिवसांच्या परिस्थितीचा आढावा घेऊन या निर्णयाची खरोखर गरज आहे का, याचा प्रशासनाने विचार करावा, अन्यथा औरंगाबादच्या उद्योगांवर याचा दीर्घकालीन प्रतिकूल परिणाम होऊ शकतो, अशी भीती उद्योजक रिषी बागला यांनी व्यक्त केली. 

औरंगाबादेत शुक्रवारपासून पुन्हा नऊ दिवसांचा लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’शी बोलताना उद्योजक रिषी बागला यांनी इथल्या उद्योग क्षेत्राबाबत होणाऱ्या दीर्घकालीन परिणामांबद्दल चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, प्रशासन चुकीचा निर्णय घेत नाही, हे मान्य आहे; परंतु या निर्णयामुळे औरंगाबादच्या उद्योग क्षेत्राला मोठा धक्का बसणार आहे. येथील अनेक उद्योग सिंगल सोर्सच्या माध्यमातून देश-विदेशातील उद्योगांना माल पुरवठा करीत आहेत. या लॉकडाऊनमुळे येथील उद्योग बंद राहतील व देश-विदेशात माल पुरवठा करण्याची चेन खंडित होईल. त्याची मोठी किंमत इथल्या उद्योगांना चुकवावी लागेल. याचा परिणाम येथील सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांवर किती प्रमाणात होईल, किती उद्योग बंद पडतील, इथले काही उद्योग दुसऱ्या शहरात जाण्याचा विचार करतील का, लोकांचा औरंगाबाद शहरावरील विश्वास कमी होईल का, ही वेळच सांगेल. 

ते म्हणाले, कचरा, पाणी यासारख्या कारणांनी आधीच औरंगाबादची बदनामी झाली आहे. आता कोविडच्या पार्श्वभूमीवर इथले प्रशासन नियंत्रण मिळवण्यात अपयशी ठरले, हा संदेश जागतिक स्तरावर गेला तर येथील आॅरिक सिटी किंवा औद्योगिक वसाहतींवर काय परिणाम होऊ शकतो, ते पाहावे लागेल.  अजूनही प्रशासनाने दोन-तीन दिवसांत परिस्थितीचा आढावा घ्यावा. १४४ कलम लागू करून उद्योग, व्यवसाय सुरू करावेत. यामुळे व्यवहार सुरळीत चालतील, अर्थचक्र पूर्वपदावर येण्यास मदत होईल, अशी अपेक्षा बागला यांनी व्यक्त केली. 

संपूर्ण अर्थचक्र थांबेल : जिल्ह्याची २० लाख लोकसंख्या गृहीत धरली, तर सध्या ६ हजार लोक कोरोनाबाधित झाले आहेत. म्हणजे, ०.३ टक्के लोक प्रभावित झालेले असून, ९९.७ टक्के लोक अजूनही कोरोनापासून दूर आहेत. या ०.३ टक्के संसर्ग झालेल्या लोकांसाठी संपूर्ण औरंगाबादकरांना वेठीस धरले आहे, ही विचार करायला लावणारी बाब आहे. यामुळे संपूर्ण अर्थचक्र थांबणार आहे. लॉकडाऊनपेक्षा अन्य काही उपाययोजना करण्याचा निर्णय घेणे आवश्यक होते, असे बागला म्हणाले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबादbusinessव्यवसायMIDCएमआयडीसी