शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

पाणी प्रश्नावर सभागृहात पोरखेळ !

By admin | Updated: January 5, 2016 00:13 IST

आशपाक पठाण , लातूर पाणीटंचाईच्या आपत्कालीन परिस्थितीत महापालिकेच्या विशेष सभेत पाणीप्रश्नावर चर्चा होण्याऐवजी जवळपास एक तास सदस्यांनी नको त्या विषयावर गोंधळ घातला़

आशपाक पठाण , लातूरपाणीटंचाईच्या आपत्कालीन परिस्थितीत महापालिकेच्या विशेष सभेत पाणीप्रश्नावर चर्चा होण्याऐवजी जवळपास एक तास सदस्यांनी नको त्या विषयावर गोंधळ घातला़ परिणामी, संतप्त झालेल्या सत्ताधारीच महिला सदस्यांनी सभागृहातून काढता पाय घेतल्यावर महापौरांनी पंधरा मिनिटांसाठी सभा तहकूब केली़ अन् सभागृह शांत झाले़ ६ लाख लातूरकरांच्या जिव्हाळ्याच्या विषयावर होणाऱ्या सभेत गांभीर्य बाळगायला हवे, ही बाब लक्षात आल्यावर तब्बल एक तासानंतर सभागृहाचे कामकाज सुरळीतपणे सुरू झाले़महापौर अख्तर शेख यांनी सोमवारी दुपारी ३ वाजता महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात विशेष सर्वसाधारण सभा आयोजित केली होती़ लातूरकरांना पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा प्रकल्पानेही तळ गाठल्याने दोन महिन्यांत शहरवासियांना पाण्यासाठी भटकंतीची वेळ येणार आहे़ अत्यंत गंभीर विषय बनलेल्या पाणीप्रश्नावर सदस्यांनी आपली मते मांडावीत, असे आवाहन महापौर अख्तर शेख यांनी सभेच्या प्रारंभीच केले़ परंतू, त्यांच्या आवाहनाकडे दुर्लक्ष करीत काही सदस्यांनी विषय सोडून गोंधळ सुरू केला़ काँगे्रस आणि राष्ट्रवादीच्या सदस्यांत कुरघोडी सुरू असताना त्यात रिपाइंच्या गटनेत्यांनी भर घातली़ विशेष सभेसाठी नियुक्ती करण्यात आलेल्या नगरसचिवांची नियुक्ती कायद्यानुसार योग्य आहे का, असा प्रश्न उपस्थित करून दीपक सूळ यांनी आयुक्तांना धारेवर धरले़ तसेच आयुक्त आणि महापौरांचे जमत नसल्याने पाणीपुरवठ्याचे अनेक प्रस्ताव रखडल्याचा आरोपही त्यांनी केला़ माजी नगराध्यक्ष लक्ष्मण कांबळे आकृतीबंधाच्या विषय मांडला़ याचवेळी राष्ट्रवादीचे गटनेते मकरंद सावे यांनी माईक हातात घेऊन पाणीप्रश्नावर बोला, असे म्हणताच वाद सुरू झाला़ पाण्याच्या खाजगीकरणात काँग्रेसचे गटनेते नरेंद्र अग्रवाल यांनी दलाली केल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या राजा मणियार यांनी करताच गोंधळात भर पडली़ रिपाइचे गटनेते चंद्रकांत चिकटे, शिवसेनेचे गटनेते सुनिल बसपुरे यांनी याप्रकरणी खुलासा करा, त्याशिवाय सभागृह चालू देणार नाही, अशी भूमिका घेतली़ गटनेत्यावर झालेल्या आरोपाचे खंडन करण्यासाठी काँग्रेस सदस्यांनी राजा मणियार यांनी माफी मागावी, अशी मागणी केली़ आपण केलेल्या वक्तव्यावर ठाम असल्याचे सांगत मणियार यांनी काँग्रेस सदस्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले़ महापौर अख्तर शेख वारंवार शांत बसण्याचे आवाहन करीत असतानाही गोंधळ कमी होत नसल्याने अखेर महापौरांना १५ मिनिटांसाठी सभा तहकूब करावी लागली़ रात्री उशिरापर्यंत सभा सुरूच होती़सभागृहात ५० टक्के महिला सदस्य असतानाही सभांमध्ये पुरूषांची मक्तेदारी चालते़ नेहमीप्रमाणे पुरूषांचा गोंधळ पाहून संतप्त झालेल्या माजी महापौर प्रा़ स्मिता खानापुरे, डॉ़ रूपाली सोळुंके यांनी जोपर्यंत सभागृह सुरळीत चालणार नाही, तोपर्यंत आम्ही बाहेर जात असल्याचे सांगत काँग्रेसच्या सर्वच महिला सदस्य सभागृहाबाहेर पडल्या़ सभागृहात आम्हाला बोलू दिले जात नसल्याचा आरोप महिला सदस्यांनी केली़ राष्ट्रवादी व शिवसेनेच्या महिला सदस्य सभागृहात बसून होत्या़ महिला बाहेर जात असल्याने महापौरांनी सभा तहकूब केली़