शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
4
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
5
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
6
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
7
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
8
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
9
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
10
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
11
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
12
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
13
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
14
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
15
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
16
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
17
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
18
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
19
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
20
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
Daily Top 2Weekly Top 5

पेरणीची शाश्वती संपल्याने डाळी कडाडल्या

By admin | Updated: July 2, 2014 01:01 IST

प्रशांत तेलवाडकर, औरंगाबाद जून महिना संपत आला; पण पावसाने दडी मारल्याने उडीद-मुगाची पेरणी झालीच नाही.

प्रशांत तेलवाडकर, औरंगाबादजून महिना संपत आला; पण पावसाने दडी मारल्याने उडीद-मुगाची पेरणी झालीच नाही. पेरणीची शाश्वती न राहिल्याने बाजारपेठेत त्याचा त्वरित परिणाम दिसून आला. उडीद-मूग डाळीच्या भावात क्विंटलमागे २०० ते ३०० रुपयांनी भाव वधारले. करडी व शेंगदाणा तेलातील तेजीने फोडणी देणेही महागले. साखरेच्या भावातही चढ-उतार दिसून आला. एकंदरीत मागील आठवड्यात महागाईने सर्वसामान्यांना होरपाळून काढले.रमजान महिन्याला सुरुवात झाली आहे. लवकरच चातुर्मासाला आरंभ होणार आहे. तसेच आषाढी एकादशी आठवड्यावर येऊन ठेपली आहे. जुलै महिन्यापासून उपवास, व्रत, धार्मिक कार्यक्रम मोठ्या प्रमाणात केले जाणार आहेत. दुसरीकडे जून महिना संपत आला तरीही मान्सून सक्रिय झाला नाही. परिणामी, उडीद व मुगाची ९९ टक्के पेरणी झालीच नाही. जिथे १ टक्का पेरणी झाली तिथे दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे. १० जुलैच्या आत मान्सून सक्रिय झाला तरीही उडीद व मुगाच्या पेरणी क्षेत्रात मोठी वाढ होणार नाही. कारण, येत्या १० दिवसांत पेरणी केली तरीही उत्पादनात घट होणार आहे. नजीकच्या भविष्यात डाळी बाजारपेठेत येण्याची शाश्वती नसल्याने बाजारपेठेत व्यापाऱ्यांनी मागील वर्षीच्या शिल्लक डाळींचे भाव वाढवण्यास सुरुवात केली आहे. मागील आठवड्यात ३०० रुपयांनी महागून मूग डाळ ७,८०० ते ८,४०० रुपये, उडीद डाळीत २०० रुपये वाढून ६,८०० ते ७,७०० रुपये प्रतिक्विंटल विक्री झाली. याचा परिणाम अन्य डाळींवरही झाला. यातही २०० ते ३०० रुपये तेजी येऊन हरभरा डाळ ३,००० ते ३,६०० रुपये, तूर डाळ ५,८०० ते ६,२०० रुपये, मठ डाळ ७,५०० ते ७,७०० रुपये प्रतिक्विंटल विक्री झाली, अशी माहिती कमिशन एजंट प्रकाश जैन यांनी दिली.करडी, शेंगदाणा तेल आणखी महागलेएकीकडे करडी बीची आवक अंतिम टप्प्यात येऊन पोहोचली आहे. करडी पेंडचे भाव उतरले आहेत. परिणामी, करडी बी महागले. भुईमुगाचे उन्हाळी पीक कमी आले. दुसरीकडे रमजान महिना, चातुर्मास, आषाढी एकादशीने खाद्यतेलाला मागणी वाढल्याने याचा एकंदरीत परिणाम खाद्यतेलाच्या भाववाढीवर झाला आहे. करडी तेलाच्या भावात मागील १५ दिवसांत लिटरमागे १० रुपयांची वाढ होऊन साधे ९५ रुपये व डबल फिल्टर १०० रुपये प्रतिलिटर विकले जात आहे. शेंगदाणा तेलाच्या भावातही ५ रुपयांनी वाढ होऊन साधे ९० रुपये, तर डबल फिल्टर ९५ रुपये प्रतिलिटर विकले जात आहे, अशी माहिती खाद्यतेल विक्रेते जगन्नाथ बसैये यांनी दिली. गेल्यावर्षीच्या तुलनेत तांदूळ महागच मागील वर्षी तांदूळ कमीत कमी २,२०० ते ९,००० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत विक्री झाला होता. यंदा बाजारात २,५०० ते १५,००० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत तांदूळ विकला जात आहे. ओरिजनल बासमती तांदळाचा भाव प्रतिकिलो १५० रुपयांपर्यंत जाऊन पोहोचल्याने बासमतीची विक्री नगन्य राहिली आहे.