शहरं
Join us  
Trending Stories
1
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
2
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
3
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
4
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
5
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
6
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
7
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
8
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
9
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
10
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
11
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
12
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
13
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
14
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
15
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
16
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी
17
Donald Trump Tariff News : अमेरिकाच टॅरिफबाबत गंडली! ट्रम्प यांची भारताबद्दल कडक भूमिका, पण परराष्ट्र मंत्रालय करतंय कौतुक
18
२ तासांचा हायव्हॉल्टेज ड्रामा, गर्लफ्रेंडच्या मिठीत सापडला नेता; पत्नीला पाहून पती पळाला, पण...
19
आकाश 'वाणी'! वैभव सूर्यवंशीमुळे स्टार विकेट किपर बॅटर संजूवर आलीये संघ सोडण्याची वेळ!
20
भारतीयांसाठी कॅनडा ठरतोय मृत्युचं घर; गेल्या ५ वर्षातील आकडे चिंताजनक!

पूल प्रवास; ‘फुल्ल’ धोका !

By admin | Updated: August 5, 2016 00:15 IST

बीड : रायगड जिल्ह्यातील महाड येथे सावित्री नदीवरील पूल वाहून गेल्याने चाळीस प्रवाशांना प्राण गमवावे लागले. या अनुषंगाने गुरुवारी ‘लोकमत’ने जिल्ह्यातील पुलांची पाहणी केली,

बीड : रायगड जिल्ह्यातील महाड येथे सावित्री नदीवरील पूल वाहून गेल्याने चाळीस प्रवाशांना प्राण गमवावे लागले. या अनुषंगाने गुरुवारी ‘लोकमत’ने जिल्ह्यातील पुलांची पाहणी केली, तेव्हा पूल ‘फुल्ल’ धोक्याचे असल्याचे निदर्शनास आले. पुलांवरुन आरामात व निर्धोकपणे पैलतीर गाठता येईल, असे म्हणणे धाडसाचे ठरेल. लोकप्रतिनिधी व प्रशासन महाडची पुनरावृत्ती होण्याची वाट पाहतेयं का? असा संतप्त सवालही यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.शहरातील बिंदूसरा नदीवरील पूल निजामकालीन असून १९३२ मध्ये तो उभारल्याची प्रशासनदरबारी नोंद आहे. शहराचा वाढता विस्तार, भरमसाठ वाहने या पार्श्वभूमीवर नव्या पुलाची आवश्यकता होती; परंतु जुन्या पुलाच्या डागडुजीवरच कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी करण्यात आली आहे. या पुलावर ऐन मधोमध गत आठवड्यात खड्डा पडला होता. दरवर्षी पावसाळ्यात तोे उघडा पडतो. हे भगदाड बुजवण्यासाठी तीन वर्षांपूर्वी ९० लाख रुपये खर्च केले होते. दरवर्षी तात्पुरती मलमपट्टी केली जाते; परंतु कायमस्वरुपी दुरुस्ती झाली नाही. डागडुजीसाठी वापरलेल्या लोखंडी पट्ट्या उघड्या पडल्या आहेत. त्यामुळे पुलावरुन प्रवास करताना जीव मुठीत धरून जावे लागते. परळी राज्यमार्ग व सोलापूर राष्ट्रीय महामार्गाशी हा पूल जोडलेला आहे, त्यामुळे त्यावर कायम वर्दळ असते. विशेष म्हणजे या पुलाची कालमर्यादा संपलेली आहे. लोकप्रतिनिधी व प्रशासन उदासीन असल्याचे पाहावयास मिळत आहे. जिल्हाभरातील इतर पुलांचीही याहून वेगळी स्थिती नाही. (प्रतिनिधी)परळी तालुक्यात पुलांची अवस्था बिकटपरळी : तालुक्यातील अनेक गावांतील पुलांची संख्या बिकट झाली आहे. पांगरी, नागापूर या पुलांची रुंदी व दुरुस्ती वाढविणे आवश्यक आहे. नंदनज गावालगतचा पूल जीवघेणा व धोकादायक बनला आहे. या पुलाच्या नवीन बांधकामासाठी ग्रामस्थ गेल्या आठ वर्षांपासून अंबाजोगाईच्या सा.बां. विभागाकडे पाठपुरावा करीत आहेत; परंतु काम रखडले आहे. धर्मापुरीतील जिजामाता शाळेसमोर व गढूळ नदीवरील पुलाकडेही दुर्लक्ष झाल्याचा आरोप अ‍ॅड. गोविंद फड यांनी केला. नंदनज गावालगत ३४ वर्षांपूर्वी पुनर्वसनाच्या वेळी बांधलेला पूल अरूंद आहे. खोडवा सावरगाव तांड्याला पूलच नाही. वाघबेट, संगम, वडखेल, वानटाकळी, दौनापूर, बोधेगाव, तडोळी, मोहा, गोपाळपूर, कौडगाव घोडा, गाढेपिंपळगाव, राधोबा तांडा येथेही नवीन पुलांची कामे होणे गरजेचे असल्याचे काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रा. टी.पी. मुंडे यांनी सांगितले.अंबाजोगाई : तालुक्यात धोकादायक पुलावरून बिनधास्त वाहतूक होते. तालुक्यात आजही शेकडो पूल धोकादायक आहेत, तर ग्रामीण भागातील पुलांची मोठी दुरावस्था झालेली आहे. परिणामी लहान मोठे अपघात या परिसरात सातत्याने सुरूच असतात. धोकादायक पूल व रस्त्यावरील खड्डेही समस्या अंबाजोगाईकर वर्षांनुवर्षे निमूटपणे सहन करीत आहेत.४ग्रामीण भागातील शेकडो पूल धोकादायक बनलेले आहेत. पुलाचे कठडे तुटणे, पडणे, याकडे गेल्या १० ते १२ वर्षात दुर्लक्ष झाल्याने ही परिस्थिती धोकादायक बनलेली आहे. तरीही या ठिकाणांहून होणारी वाहतूक ही बिनधास्तपणे होते. ४रिंगरोडवरून जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर मानवलोक संस्थेच्या जवळ मोठा पूल आहे. या पुलाचे कठडे गेल्या चार वर्षांपासून तुटलेल्या अवस्थेत आहेत.गेवराई शहराजवळील विद्रुपा नदीवरील जमादारणीच्या पुलावरील कठडे गेल्या चार वर्षांपासून तुटलेले आहेत. या पुलावरून एक दुचाकीस्वार नदीत कोसळून ठार झाला होता. छोटे अपघातही झाले होते. हिरापूर येथील सिंदफना नदीवरील पुलाचे गेल्या दोन वर्षांपासून कठडे तुटलेले आहेत. धोंडराई, उमापूर पुलांचीही दयनीय अवस्था झालेली असून, तलवाडा येथील राजुरी मळा पूलही खड्डेमय झाला आहे. कठडे नसलेले तालुक्यातील प्रमुख मार्गावरील १० पूल धोकादायक आहेत.