शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

पूल प्रवास; ‘फुल्ल’ धोका !

By admin | Updated: August 5, 2016 00:15 IST

बीड : रायगड जिल्ह्यातील महाड येथे सावित्री नदीवरील पूल वाहून गेल्याने चाळीस प्रवाशांना प्राण गमवावे लागले. या अनुषंगाने गुरुवारी ‘लोकमत’ने जिल्ह्यातील पुलांची पाहणी केली,

बीड : रायगड जिल्ह्यातील महाड येथे सावित्री नदीवरील पूल वाहून गेल्याने चाळीस प्रवाशांना प्राण गमवावे लागले. या अनुषंगाने गुरुवारी ‘लोकमत’ने जिल्ह्यातील पुलांची पाहणी केली, तेव्हा पूल ‘फुल्ल’ धोक्याचे असल्याचे निदर्शनास आले. पुलांवरुन आरामात व निर्धोकपणे पैलतीर गाठता येईल, असे म्हणणे धाडसाचे ठरेल. लोकप्रतिनिधी व प्रशासन महाडची पुनरावृत्ती होण्याची वाट पाहतेयं का? असा संतप्त सवालही यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.शहरातील बिंदूसरा नदीवरील पूल निजामकालीन असून १९३२ मध्ये तो उभारल्याची प्रशासनदरबारी नोंद आहे. शहराचा वाढता विस्तार, भरमसाठ वाहने या पार्श्वभूमीवर नव्या पुलाची आवश्यकता होती; परंतु जुन्या पुलाच्या डागडुजीवरच कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी करण्यात आली आहे. या पुलावर ऐन मधोमध गत आठवड्यात खड्डा पडला होता. दरवर्षी पावसाळ्यात तोे उघडा पडतो. हे भगदाड बुजवण्यासाठी तीन वर्षांपूर्वी ९० लाख रुपये खर्च केले होते. दरवर्षी तात्पुरती मलमपट्टी केली जाते; परंतु कायमस्वरुपी दुरुस्ती झाली नाही. डागडुजीसाठी वापरलेल्या लोखंडी पट्ट्या उघड्या पडल्या आहेत. त्यामुळे पुलावरुन प्रवास करताना जीव मुठीत धरून जावे लागते. परळी राज्यमार्ग व सोलापूर राष्ट्रीय महामार्गाशी हा पूल जोडलेला आहे, त्यामुळे त्यावर कायम वर्दळ असते. विशेष म्हणजे या पुलाची कालमर्यादा संपलेली आहे. लोकप्रतिनिधी व प्रशासन उदासीन असल्याचे पाहावयास मिळत आहे. जिल्हाभरातील इतर पुलांचीही याहून वेगळी स्थिती नाही. (प्रतिनिधी)परळी तालुक्यात पुलांची अवस्था बिकटपरळी : तालुक्यातील अनेक गावांतील पुलांची संख्या बिकट झाली आहे. पांगरी, नागापूर या पुलांची रुंदी व दुरुस्ती वाढविणे आवश्यक आहे. नंदनज गावालगतचा पूल जीवघेणा व धोकादायक बनला आहे. या पुलाच्या नवीन बांधकामासाठी ग्रामस्थ गेल्या आठ वर्षांपासून अंबाजोगाईच्या सा.बां. विभागाकडे पाठपुरावा करीत आहेत; परंतु काम रखडले आहे. धर्मापुरीतील जिजामाता शाळेसमोर व गढूळ नदीवरील पुलाकडेही दुर्लक्ष झाल्याचा आरोप अ‍ॅड. गोविंद फड यांनी केला. नंदनज गावालगत ३४ वर्षांपूर्वी पुनर्वसनाच्या वेळी बांधलेला पूल अरूंद आहे. खोडवा सावरगाव तांड्याला पूलच नाही. वाघबेट, संगम, वडखेल, वानटाकळी, दौनापूर, बोधेगाव, तडोळी, मोहा, गोपाळपूर, कौडगाव घोडा, गाढेपिंपळगाव, राधोबा तांडा येथेही नवीन पुलांची कामे होणे गरजेचे असल्याचे काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रा. टी.पी. मुंडे यांनी सांगितले.अंबाजोगाई : तालुक्यात धोकादायक पुलावरून बिनधास्त वाहतूक होते. तालुक्यात आजही शेकडो पूल धोकादायक आहेत, तर ग्रामीण भागातील पुलांची मोठी दुरावस्था झालेली आहे. परिणामी लहान मोठे अपघात या परिसरात सातत्याने सुरूच असतात. धोकादायक पूल व रस्त्यावरील खड्डेही समस्या अंबाजोगाईकर वर्षांनुवर्षे निमूटपणे सहन करीत आहेत.४ग्रामीण भागातील शेकडो पूल धोकादायक बनलेले आहेत. पुलाचे कठडे तुटणे, पडणे, याकडे गेल्या १० ते १२ वर्षात दुर्लक्ष झाल्याने ही परिस्थिती धोकादायक बनलेली आहे. तरीही या ठिकाणांहून होणारी वाहतूक ही बिनधास्तपणे होते. ४रिंगरोडवरून जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर मानवलोक संस्थेच्या जवळ मोठा पूल आहे. या पुलाचे कठडे गेल्या चार वर्षांपासून तुटलेल्या अवस्थेत आहेत.गेवराई शहराजवळील विद्रुपा नदीवरील जमादारणीच्या पुलावरील कठडे गेल्या चार वर्षांपासून तुटलेले आहेत. या पुलावरून एक दुचाकीस्वार नदीत कोसळून ठार झाला होता. छोटे अपघातही झाले होते. हिरापूर येथील सिंदफना नदीवरील पुलाचे गेल्या दोन वर्षांपासून कठडे तुटलेले आहेत. धोंडराई, उमापूर पुलांचीही दयनीय अवस्था झालेली असून, तलवाडा येथील राजुरी मळा पूलही खड्डेमय झाला आहे. कठडे नसलेले तालुक्यातील प्रमुख मार्गावरील १० पूल धोकादायक आहेत.