शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

तंत्रनिकेतनच्या प्राध्यापकांची सेवाज्येष्ठता रखडली; १६०० प्राध्यापकांवर होतोय अन्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2019 19:25 IST

शासनाच्या पत्रांना संचालकांनी दाखविली केराची टोपली दाखवली

ठळक मुद्दे सामान्य प्रशासन विभागाने वारंवार तंत्रशिक्षण संचालकांना पत्र पाठविले याचिकाकर्त्यांनी पुन्हा ‘मॅट’मध्ये धाव घेऊन अवमान याचिका दाखल केली आहे.

- राम शिनगारे  औरंगाबाद : उच्च व तंत्रशिक्षण विभागांतर्गत येणाऱ्या राज्यातील तंत्रनिकेतनमधील  प्राध्यापक, अधिकाऱ्यांची सेवाज्येष्ठता यादी चार महिन्यांत जाहीर करण्याचे आदेश महाराष्ट्र प्रशासकीय लवादाच्या औरंगाबाद खंडपीठाने (मॅट) २५ जानेवारी २०१९ रोजी दिले होते.  या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने वारंवार तंत्रशिक्षण संचालकांना पत्र पाठविले. या पत्रांना संचालकांनी केराची टोपली दाखविल्यामुळे याचिकाकर्त्यांनी पुन्हा ‘मॅट’मध्ये धाव घेऊन अवमान याचिका दाखल केली आहे.

बीड येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील स्थापत्य विभागाचे प्रमुख राजेंद्रकुमार बºहाटे यांनी नोव्हेंबर २०१८ मध्ये ‘मॅट’मध्ये याचिका दाखल करून तंत्रशिक्षण विभागातील सेवाज्येष्ठता सूची जाहीर करण्याची मागणी केली होती. ही मागणी लवादाने मान्य केली आहे. बºहाटे यांनी सांगितले की, तंत्रशिक्षण विभागात अभियांत्रिकी शिक्षक आणि प्रशासकीय सेवा वर्ग-१ हा एकच संवर्ग होता. परंतु २००४ मध्ये काही अधिकाऱ्यांनी प्रशासन विभागातील अधिकाऱ्यांना हाताशी धरून शिक्षक व प्रशासकीय असे दोन वेगवेगळे संवर्ग केले. दोन संवर्ग वेगळे करताना राज्यातील सुमारे १६०० प्राध्यापकांना प्रशासकीय पदे मिळण्यापासून रोखण्यात आले. प्राचार्य व विभागप्रमुख पदापर्यंत मर्यादित ठेवण्यात आले. याच वेळी प्रशासनातील विद्यमान संचालक डॉ. अभय वाघ यांच्यासह इतर दोघांना नियमबाह्यपणे पदोन्नती देण्यात आली. २०१७ मध्ये तंत्रशिक्षण विभागाने संचालक, सहसंचालक व उपसंचालकांची नियुक्ती करण्यासाठी नियमावली बनविली. त्याविरोधात असोसिएशन आॅफ फार्मसी टीचर्स आॅफ इंडियातर्फे ‘मॅट’मध्ये धाव घेतली. त्याठिकाणी संचालकांसह इतरांची नियुक्ती रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. त्यासंदर्भातील याचिकाही मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सुरू आहे.

याच वेळी सेवाज्येष्ठता यादी जाहीर करण्याची २५ मे रोजी पूर्ण झाल्यानंतरही यादी जाहीर करण्यास टाळाटाळ केली जात आहे. ही यादी जाहीर केल्यास संचालक डॉ. वाघ, तंत्रशिक्षण मंडळाचे अध्यक्ष डॉ. विनोद मोहितकर, सहसंचालक डॉ. एस. पी. यावलकर आदी ९ अधिकाऱ्यांचा सेवाज्येष्ठता यादीमध्ये १३३ नंतर क्रमांक लागतो. त्यामुळे या सर्वांची पदे जाण्याचा धोका निर्माण होतो.  याविषयी तंत्रशिक्षण विभाग, सामान्य प्रशासन विभागाकडे वारंवार निवेदनाद्वारे सेवाज्येष्ठता जाहीर करण्याची मागणी केली. या मागणीनुसार सामान्य प्रशासन विभागाने संचालकांना पत्रे पाठवून प्रकरण निकाली काढण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र, त्यास संचालक डॉ. वाघ यांनी केराची टोपली दाखविल्याचे स्पष्ट होत आहे. 

प्राध्यापकांच्या पदोन्नत्या थांबल्याअभियांत्रिकी शिक्षक आणि प्रशासकीय अधिकारी असे दोन संवर्ग केल्यामुळे १६०० प्राध्यापकांच्या पदोन्नत्या थांबल्या आहेत. प्राध्यापक म्हणून रुजू झाल्यानंतर पदोन्नतीने प्रशासनात जाण्याचे मार्गही बंद केले आहेत. २००० नंतर तंत्रशिक्षण विभागात रुजू झालेले लोक सर्व कारभार करीत असल्याचेही स्पष्ट झाले. संवर्ग विभाजन करतानाही नियमांना पायदळी तुडविण्यात आल्याचेही कागदपत्रांवरून स्पष्ट होत आहे. यात विशेष म्हणजे प्रशासनातील ९ अधिकाऱ्यांचीच मनमानी सुरू असल्याचेही बºहाटे यांनी सांगितले.

टॅग्स :State Governmentराज्य सरकारProfessorप्राध्यापकAurangabadऔरंगाबाद