शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

राजकारण की आर्थिक शिस्तीचा आग्रह ? जिल्हा बँकेच्या निवडणुकीत हरिभाऊ बागडे यांचा पराभव कशामुळे ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 12:25 IST

बिगरशेती मतदार संघाच्या ५ जागांसाठी शेतकरी विकास पॅनलचे प्रमुख नेते म्हणून हरिभाऊ बागडे यांच्यासह नितीन पाटील, सतीश चव्हाण, अंबादास दानवे व अभिजीत देशमुख हे उमेदवार होते.

ठळक मुद्दे ‘मी ठरवून टाकले होते चुकीच्या पद्धतीने निवडणूक लढवायची नाही, मतदारांना लक्ष्मी दर्शन होऊ द्यायचे नाही’अर्थात जिल्हा बँकेतून जरीे मी मुक्त होत असलो, तरी सहकार क्षेत्रातील माझी सेवा चालूच राहणार आहे

औरंगाबाद : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत हरिभाऊ बागडे यांचा झालेला पराभव खळबळजनक व आश्चर्यकारक तर आहेच परंतु तेवढाच नामुष्कीचाही आहे. हा पराभव नेमका कशामुळे झाला, याची कारणमिमांसा होणेही गरजेचे आहे.

बिगरशेती मतदार संघाच्या ५ जागांसाठी शेतकरी विकास पॅनलचे प्रमुख नेते म्हणून हरिभाऊ बागडे यांच्यासह नितीन पाटील, सतीश चव्हाण, अंबादास दानवे व अभिजीत देशमुख हे उमेदवार होते. या मतदार संघातून प्रतिस्पर्धी पॅनलचे उमेदवार जगन्नाथ काळे, अपक्ष अभिषेक जैस्वाल हे निवडून आले. खरंतर हे दोघेच हरिभाऊ बागडे यांना नडले, असे म्हणता येईल. हरिभाऊ बागडे आणि कल्याण काळे-जगन्नाथ काळे यांचे राजकीय वैर सर्वश्रुतच आहे. काळे बंधूंनी बागडे नाना यांच्या पराभवासाठी प्रयत्न केला ही गोष्ट खरीच. परंतु, अभिषेक जैस्वाल हे भाजपचे कार्यकर्ते या निवडणुकीत उगवले आणि त्यांनी विजयही खेचून आणला.

हरिभाऊ बागडे यांनी मतदारांना कसलीही आमिषे वा प्रलोभने दाखवली नाहीत. ते त्यांच्या स्वभावानुसार मतदारांच्या प्रत्यक्ष गाठीभेटी न घेता, दूरध्वनीव्दारे संपर्क करत राहिले. ‘मी ठरवून टाकले होते चुकीच्या पद्धतीने निवडणूक लढवायची नाही, मतदारांना लक्ष्मी दर्शन होऊ द्यायचे नाही’ असे प्रतिनिधीशी बोलताना हरिभाऊ बागडे यांनी स्पष्ट केले. तसेच मतपत्रिकेवर बिगरशेती मतदार संघाच्या उमेदवारांमध्ये माझा क्रमांक तेरावा होता. कदाचित त्याचाही फटका बसला असेल. अर्थात जिल्हा बँकेतून जरीे मी मुक्त होत असलो, तरी सहकार क्षेत्रातील माझी सेवा चालूच राहणार आहे, अशी ग्वाही त्यांनी दिली. पॅनलमध्ये दामूअण्णा नवपुते यांचे नसणे आणि मंगल वाहेगावकर यांचा समावेश करणे ही रणनीती चुकली का, त्यामुळे बागडे यांच्या मतांवर काही परिणाम झाला का, याची चर्चा ऐकायला मिळत आहे.

ऐनवेळी माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी या निवडणुकीत उडी घेतली व हरिभाऊ बागडे यांना वयानुसार घरी बसण्याचा सल्ला दिला. वय झाले असले तरी हरिभाऊ बागडे कार्यक्षम आहेत. आमदार म्हणून ते फुलंब्री मतदार संघाचे प्रतिनिधित्व करतच आहेत. स्वतः स्थापन केलेल्या देवगिरी सहकारी बँक, राजे संभाजी साखर कारखाना, अनेक शैक्षणिक संस्था चालविण्याचा त्यांना प्रदीर्घ अनुभव आहे. शिवाय ते आर्थिक शिस्तीसाठी प्रसिद्ध आहेत. औरंगाबाद जिल्हा दूध उत्पादक संघामध्ये अध्यक्ष या नात्याने त्यांनी आणलेली आर्थिक शिस्त वाखाणण्याजोगी आहे. त्यांची आर्थिक शिस्तही त्यांच्या पराभवाचे कारण असू शकेल, असे राजकीय जाणकार मानतात. हरिभाऊ बागडे यांचा पराभव एकीकडे आणि बँकेच्या निवडणुकीचा सारा निकाल एकीकडे अशी आजची परिस्थिती आहे. हरिभाऊ बागडे यांच्या पराभवाने अनेक बरे-वाईट संदेश दिले आहेत, एवढे मात्र नक्की.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादHaribhau Bagadeहरिभाऊ बागडे