शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
5
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
6
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
7
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
8
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
9
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
10
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
11
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
12
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
13
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
14
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
15
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
16
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
17
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
18
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
19
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
20
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार

बाजार प्रकरणात राजकारणाचा वास; शिवसेनेत पडले दोन गट

By admin | Updated: July 23, 2014 00:42 IST

औरंगाबाद : शहागंज ते सिटीचौकपर्यंतच्या रस्त्यावर बाजार भरल्यामुळे शिवसेनेत त्यावरून दोन गट पडले आहेत. या सगळ्या प्रकारामागे राजकारणाचा वास येऊ लागला आहे.

औरंगाबाद : शहागंज ते सिटीचौकपर्यंतच्या रस्त्यावर बाजार भरल्यामुळे शिवसेनेत त्यावरून दोन गट पडले आहेत. या सगळ्या प्रकारामागे राजकारणाचा वास येऊ लागला आहे. माजी आ. किशनचंद तनवाणी व त्यांच्या समर्थकांनी त्या बाजार प्रकरणात मनपा, पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली. आ. प्रदीप जैस्वाल व त्यांच्या कार्यकर्त्यांनी पाठ फिरविल्यामुळे दिवसभर व्यापाऱ्यांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू होती. आ.जैस्वाल व त्यांचे समर्थक या प्रकरणात कुठेही दिसले नाहीत. रस्त्यांत बाजार भरविण्यासाठी पोलिसांवर कोणत्या नेत्याने दबाव आणला. यावरूनही व्यापाऱ्यांमध्ये चर्चेचे पेव फुटले होते. विधानसभा निवडणुका तीन महिन्यांवर येऊन ठेपल्या असताना रस्त्यावरील बाजारावरून सेनेतील गटबाजीचे राजकारण चव्हाट्यावर आले आहे.तीन दिवसांपासून धावणी मोहल्ल्यातील विठ्ठल-रुख्मिणी मंदिरात व्यापाऱ्यांच्या बैठकाही झाल्या. गेल्या आठवड्यापासून मनपा, पोलिसांकडे निवेदन देऊनही व्यापाऱ्यांची व त्या परिसरातील नागरिकांची व्यथा कुणीही ऐकण्यास तयार नव्हते. त्यामुळे शेवटी वैतागून सराफा व्यापाऱ्यांनी दुकाने बंद करण्याचा निर्णय घेतला. बाजार दरवर्षी भरतो. मात्र, यावर्षी बाजारातील विके्रत्यांची व हातगाड्यांची संख्या दुप्पट झाली. मध्य मतदारसंघामध्ये शिवसेनेतील दोन गटांपैकी एका गटाने व्यापारी, वाहतुकीची कोंडी समोर आणून दुसऱ्या गटाची कोंडी केली. तर रिपब्लिकन सेनेने मनपाच्या अधिकाऱ्यांवर व पोलिसांना अरेरावी करून बाजारातील विके्रत्यांची सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न केला. या सर्व घडामोडींवरून शहागंजच्या रस्त्यावरील बाजारावरून मोठे राजकारण होणार असल्याचे दिसते. अशीही दिशाभूल...शहागंज रस्त्यावरील बाजार पारंपरिक असल्याचे पोलीस आयुक्तांना सांगण्यात आल्यामुळे त्यांनीही त्याकडे लक्ष दिले नाही. दरवर्षी मीना बाजार भरत असे. मागील सात वर्षांपासून तो बाजार भरणे बंद झाले. त्यानंतर सिटीचौक परिसरातील फुटपाथवरच चार दिवसांसाठी तो बाजार भरण्याचा प्रघात पडला.यावर्षी मात्र, सिटीचौक पोलीस ठाण्यापर्यंत दोन्ही बाजूंनी आणि मध्यभागी आठवड्यापूर्वीच बाजार भरल्यामुळे नागरिकांची व त्या भागातील व्यापाऱ्यांची कोंडी झाली. स्कूल बस येणे बंद झाले, गर्दीमुळे महिलांना लांबून जावे लागते आहे. बाजार भरण्यास व्यापाऱ्यांचा विरोध नाही. मात्र, सार्वजनिक रस्त्यावरच बाजार भरणे हे कुणाच्याही हिताचे नाही, असे नगरसेवक सिद्ध म्हणाले.