शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
3
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
4
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
5
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
6
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
7
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
8
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
9
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
10
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
11
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
12
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
13
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
14
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
15
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
16
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
17
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
18
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
19
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
20
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!

विद्यार्थ्यांच्या कौतुक सोहळ्यात राजकीय उखाळ्या-पाखाळ्या

By admin | Updated: June 27, 2014 01:02 IST

औरंगाबाद : महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेत संपादन केलेले यश डोंगराएवढे असल्याचा सूर पदाधिकाऱ्यांनी आज आळवला.

औरंगाबाद : महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेत संपादन केलेले यश डोंगराएवढे असल्याचा सूर पदाधिकाऱ्यांनी आज आळवला. गुणवंतांचा आज सिडको नाट्यगृहात सत्कार करून त्यांच्यावर १७ लाख रुपयांच्या पारितोषिकांची लयलूट करण्यात आली. हा कौतुक सोहळा असला तरी तेथेही राजकीय शेरेबाजी, शालजोडे आणि चिमटे घेणारी भाषणे झाली. मनपा शाळेतील विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळादेखील पालिकेतील रुसव्या- फुगव्यांच्या राजकारणातून सुटला नाही. मनपा शाळेतील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचे श्रेय घेण्यात प्रशासनाने घेतलेली आघाडी पदाधिकाऱ्यांना खटकल्यामुळे त्याचे पडसाद कौतुक सोहळ्यात उमटले. चिमटे आणि शालजोड्यांच्या भाषणांनी विद्यार्थ्यांसह उपस्थिताना खळाळून हसविले. उपमहापौर संजय जोशी म्हणाले, पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना पारितोषिके देण्याची कल्पना पुढे आणली. त्याला प्रशासनाने परवानगी दिली. जोशींचे हे वक्तव्य ऐकताच व्यासपीठावरील आयुक्तांपासून सर्व अधिकाऱ्यांना हसू आवरता आवरेना. कारण प्रशासनाने पदाधिकाऱ्यांना आजवर कधीच पारितोषिकांचा विषय सांगितलेला नव्हता, तर त्यावर कधी चर्चाही झालेली नव्हती. आयुक्तांनीच विद्यार्थ्यांना प्रोत्साहन म्हणून पारितोषिके जाहीर केली होती. कार्यक्रमाची वेळ १० वाजेची होती. रुसव्या-फुगव्यांच्या सिलसिल्यामुळे १२ वा. कार्यक्रम सुरू झाला. महापौर कला ओझा यांना निमंत्रण देण्यासाठी दोन अधिकारी गेले होते. त्यांना कार्यक्रमाची माहिती नव्हती म्हणून त्या वेळेत येऊ शकल्या नाहीत, असे नंतर समजले.तर विद्यार्थ्यांना पारितोषिक म्हणून देण्यात आलेल्या रकमेचा ठराव सभेसमोर झालेला नाही. शिवाय आजच्या कार्यक्रमाची आर्थिक रूपरेषादेखील समोर आली नसल्याचे अनेक प्रश्न पदाधिकाऱ्यांनी आयुक्तांकडे उपस्थित केले.प्रोटोकॉलप्रमाणे महापौर अध्यक्षीय भाषण करतात. मात्र, त्यातही काही गडबड झाली होती. उपमहापौर संजय जोशी यांच्या लक्षात ती बाब आल्यानंतर भाषणाची यादी बदलण्यात आली. त्याचे पडसाद कार्यक्रमात उमटले. भाषण संपताच महापौरांनी सिडको नाट्यगृह सोडले. महापौरांची प्रतिक्रिया...महापौर ओझा म्हणाल्या, कार्यक्रमाला जायचे होते म्हणून कार्यक्रमातून बाहेर पडले. दुसरी गोष्ट विद्यार्थ्यांचे कौतुक करणे पालिकेचे कर्तव्य आहे. आजच्या कार्यक्रमाविषयी काहीही नाराजी नव्हती; परंतु पारितोषिकांचा मुद्दा धोरणात्मक होता. त्याची माहिती सर्वांना असणे गरजेचे होते. मनपा शाळांची अवस्था वाईट आहे. शाळेच्या प्रांगणात वृक्षारोपण करण्याच्या सूचनाही केल्याचे त्यांनी सांगितले.