शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

साहित्य संमेलन पूर्णपणे अराजकीय; राजकीय नेत्यांनी ‘रसिक’ म्हणून समोर बसावे : कौतिकराव ठाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2019 19:17 IST

या संमेलनातही भूमिकेनुसारच राजकीय व्यक्ती साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर येणार

औरंगाबाद : कराड येथे झालेल्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा दुर्गाबाई भागवत होत्या. यशवंतराव चव्हाणही संमेलनाला उपस्थित होते; पण त्यांचे राजकीय वलय बाजूला ठेवून ते रसिक म्हणून समोरच्या रांगेत बसले आणि साहित्य संमेलनात साहित्यिकांचा मान असतो, असे सर्वांसमक्ष सांगितले. हा आदर्श समोर ठेवून उस्मानाबाद येथे होणाऱ्या साहित्य संमेलनातही राजकीय नेत्यांनी ‘रसिक’ म्हणून यावे, असे मत अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे आदर्श कौतिकराव ठाले पाटील यांनी व्यक्त केले. 

कथा, कविता, परिसंवादाने खुलणार साहित्य संमेलन

ठाले पाटील यांनी संमेलन पूर्णपणे अराजकीय आणि राजकीय व्यक्तींच्या हस्तक्षेपाशिवाय होणार असल्याचे नमूद केले. यासाठी त्यांनी कराड येथे झालेल्या साहित्य संमेलनात यशवंतराव चव्हाण यांनी घेतलेल्या भूमिकेचा दाखला दिला आणि या संमेलनातही भूमिकेनुसारच राजकीय व्यक्ती साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर येणार असल्याचे नमूद केले. यंदाचे साहित्य संमेलन राजकीय पाठिंब्याशिवाय आणि पूर्णपणे लोकसहभागातूनच घ्यायचे, असे निश्चित केले होते. त्यानुसारच संमेलनाच्या कार्यक्रमांची आखणी झाली असल्याचे सांगत ठाले पाटील म्हणाले. साहित्य संमेलनासाठी आम्ही सर्व राजकीय नेत्यांना पत्रिका दिली असून, त्यांना ‘रसिक’ म्हणून आमंत्रित केले आहे, तर राजकीय हस्तक्षेप नसल्यामुळे यंदाचे साहित्य संमेलन निर्विवाद पार पडेल, अशी अपेक्षा मसापचे कार्यवाह डॉ. दादा गोरे यांनी व्यक्त केली. 

टॅग्स :marathiमराठीliteratureसाहित्यOsmanabadउस्मानाबादAurangabadऔरंगाबाद