शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर प्रदेशमध्ये मतदार यादीतून तब्बल २.८९ कोटी लोकांची नावं वगळणार, SIRबाबत धक्कादायक माहिती समोर 
2
‘सर्व भारतीयांना अमेरिकेतून बाहेर काढा, अन्यथा…’, अमेरिकन पत्रकाराचं वादग्रस्त विधान   
3
पळवा पळवी! पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमानंतर लोकांनी कुंड्या, होर्डिंग आणि पुतळे पळवले   
4
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
5
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
6
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
7
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
8
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
9
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
10
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
11
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
12
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
13
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
14
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
15
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
16
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
17
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
18
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
19
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
20
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

साहित्य संमेलन पूर्णपणे अराजकीय; राजकीय नेत्यांनी ‘रसिक’ म्हणून समोर बसावे : कौतिकराव ठाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2019 19:17 IST

या संमेलनातही भूमिकेनुसारच राजकीय व्यक्ती साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर येणार

औरंगाबाद : कराड येथे झालेल्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा दुर्गाबाई भागवत होत्या. यशवंतराव चव्हाणही संमेलनाला उपस्थित होते; पण त्यांचे राजकीय वलय बाजूला ठेवून ते रसिक म्हणून समोरच्या रांगेत बसले आणि साहित्य संमेलनात साहित्यिकांचा मान असतो, असे सर्वांसमक्ष सांगितले. हा आदर्श समोर ठेवून उस्मानाबाद येथे होणाऱ्या साहित्य संमेलनातही राजकीय नेत्यांनी ‘रसिक’ म्हणून यावे, असे मत अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे आदर्श कौतिकराव ठाले पाटील यांनी व्यक्त केले. 

कथा, कविता, परिसंवादाने खुलणार साहित्य संमेलन

ठाले पाटील यांनी संमेलन पूर्णपणे अराजकीय आणि राजकीय व्यक्तींच्या हस्तक्षेपाशिवाय होणार असल्याचे नमूद केले. यासाठी त्यांनी कराड येथे झालेल्या साहित्य संमेलनात यशवंतराव चव्हाण यांनी घेतलेल्या भूमिकेचा दाखला दिला आणि या संमेलनातही भूमिकेनुसारच राजकीय व्यक्ती साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर येणार असल्याचे नमूद केले. यंदाचे साहित्य संमेलन राजकीय पाठिंब्याशिवाय आणि पूर्णपणे लोकसहभागातूनच घ्यायचे, असे निश्चित केले होते. त्यानुसारच संमेलनाच्या कार्यक्रमांची आखणी झाली असल्याचे सांगत ठाले पाटील म्हणाले. साहित्य संमेलनासाठी आम्ही सर्व राजकीय नेत्यांना पत्रिका दिली असून, त्यांना ‘रसिक’ म्हणून आमंत्रित केले आहे, तर राजकीय हस्तक्षेप नसल्यामुळे यंदाचे साहित्य संमेलन निर्विवाद पार पडेल, अशी अपेक्षा मसापचे कार्यवाह डॉ. दादा गोरे यांनी व्यक्त केली. 

टॅग्स :marathiमराठीliteratureसाहित्यOsmanabadउस्मानाबादAurangabadऔरंगाबाद