शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय सैन्य अन् पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांना सर्व मॅचची फी देणार; सूर्यकुमार यादवची घोषणा
2
'४ वर्षांपूर्वीपासून...', सोनम वांगचुकच्या पाकिस्तान कनेक्शनवर त्याची पत्नी गीतांजली वांगचुक काय म्हणाल्या?
3
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
4
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
5
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
6
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
7
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
8
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
9
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
10
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
11
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
12
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
13
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
14
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
15
मुत्सद्देगिरी हेच औषध! ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'ने भारतीय फार्मा कंपन्यांचे काय होणार?
16
केवळ ३.९ टक्के महिलाच रोज करतात व्यायाम : सामाजिक मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचा फिटनेस अशक्य
17
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
18
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
19
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
20
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत

खैरे-सावे यांच्यात राजकीय हल्लाबोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2018 00:59 IST

शिवसेनेचे खा. चंद्रकांत खैरे आणि भाजपचे पूर्व मतदारसंघातील आ. अतुल सावे यांच्यात मागील तीन वर्षांपासून विविध कारणांमुळे एकमेकांवर राजकीय कुरघोडी करण्याचे प्रकार सुरू आहेत. युती असताना एकत्रित नांदणाऱ्या या दोन्ही लोकप्रतिनिधींमधील हे द्वंद्व कशामुळे सुरू आहे, याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शिवसेनेचे खा. चंद्रकांत खैरे आणि भाजपचे पूर्व मतदारसंघातील आ. अतुल सावे यांच्यात मागील तीन वर्षांपासून विविध कारणांमुळे एकमेकांवर राजकीय कुरघोडी करण्याचे प्रकार सुरू आहेत. युती असताना एकत्रित नांदणाऱ्या या दोन्ही लोकप्रतिनिधींमधील हे द्वंद्व कशामुळे सुरू आहे, याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.समांतर जलवाहिनी, महापालिकेतील रस्ते अनुदान, राजकीय कार्यक्रमांत नाव न टाक णे, कार्यक्रमला बोलवायचे आणि वाट न पाहता कार्यक्रम आटोपून घ्यायचा. यापासून ते १२ मेच्या दंगलीच्या घटनेसह १५ जूनच्या सिडकोतील हरितपट्टा विकास कार्यक्रम भूमिपूजनापर्यंत राजकीय हल्लाबोल होण्याचे प्रकार घडले आहेत. प्रत्येक व्यासपीठावर या दोघांमध्ये काहीना काही मुद्यांवर बिनसत असल्याचे दिसते आहे.एकमेकांना टोले देणे, राजकीय चिमटे, शालजोडे देण्यामुळे ही जोडगोळी चर्चेत राहण्याचा तर प्रयत्न करीत नाही ना, असाही प्रश्न आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानेच हा सगळा प्रकार सुरू असल्याचे बोलले जातआहे.मुख्यमंत्र्यांचे कार्यक्रम, डीपीसीच्या बैठकांमध्ये खैरेंना तोंडघशी पाण्यात सावे आघाडीवर आहेत, तर पालिकेच्या कार्यक्रमांसह पक्षाच्या व्यासपीठावर सावे व भाजपवर खैरे तोंडसुख घेत असल्याचेदिसते.गेल्या आठवड्यात सिडको कार्यालयासमोर हरितपट्टा विकासाचे भूमिपूजन सकाळी ११ वा. ठेवले होते. मतदारसंघातील कार्यक्रम असल्यामुळे सावे वेळेवर पोहोचले. कार्यक्रम सुरु न झाल्याने ते निघून गेले. नंतर खा. खैरे दुपारी २ वाजेच्या सुमारास आले. त्यांनी महापौर घोडेले, सभापती राजू वैद्य यांच्या उपस्थितीत कार्यक्रम आटोपून घेतला.आ. सावे यांना हा प्रकार कळताच त्यांनी कार्यक्रम स्थळ गाठून खा. खैरेंसह सर्वांना वरच्या आवाजात सुनावले. माझ्या मतदारसंघातील कार्यक्रमाला मला टाळण्याचा प्रयत्न खपवून घेणार नाही. मी सगळ्यांना बघून घेईन, असा संताप सावेंनीकेला.मी मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी असताना माझी वाट का पाहिली नाही, असे सावे चिडून बोलले. खैरेंनी सावेंचा संताप लीलया पचवून घेतला. कारण त्यांनी सावेंची वाट न पाहता कार्यक्रम उरकून त्यांचा पुरता अवमान केला होता.अटीतटीच्या वक्तव्याची स्पर्धामहापालिकेतील समांतर जलवाहिनीवरून आॅक्टोबर २०१५ पासून सावे आणि खैरे यांच्यात वाद पेटला आहे. तत्कालीन मनपा आयुक्त प्रकाश महाजन यांच्या अविश्वास ठरावावरून दोन्ही नेत्यांमध्ये टोकाचा वाद झाला. खा. रावसाहेब दानवे यांच्या चिरंजीवाच्या विवाहसोहळ्यात आ. सावे यांनी खा. खैरे यांना खुर्चीवरून उठविण्याचा प्रयत्न केला. तेव्हापासून या दोन्ही नेत्यांमध्ये अटीतटीची वक्तव्ये करण्याची स्पर्धा लागली आहे.१२ मे रोजी जुन्या शहरात झालेल्या दंगलीनंतर खा. खैरे यांनी आ. सावे यांच्यावर आरोप केले. सावे घटनास्थळी नव्हतेच, असे ते म्हणाले होते. त्यावर सावे यांनी प्रत्युत्तर देत खैरे यांची स्मृती गेल्याचा टोला लगावला होता. युती होवो अथवा न होवो, खैरेंना चारीमुंड्या चीत करण्याची भाषा भाजपच्या गोटातून सुरू असण्यामागे हे वाददेखील असू शकतात.

टॅग्स :Chandrakant Khaireचंद्रकांत खैरेAtul Saaveअतुल सावे