शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

मास्क लावण्यावरून मनपा पथकाला राजकीय कार्यकर्त्यांची मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2021 13:37 IST

कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेचे कंत्राटी कर्मचारी (माजी सैनिक) विनामास्क, सॅनिटायझर, थर्मल गन अथवा ऑक्सिमीटर नसल्याचे कारण पुढे करत दुकानदारांवर रोज दंडात्मक कारवाई करतात.

ठळक मुद्देमनपा प्रशासकांच्या वाहनातून सोमवारी सायंकाळी ६ वाजता एक पथक गुलमंडी आले. संतापलेले व्यापारी आणि कार्यकर्त्यांनी पथकाला चांगलीच मारहाण केली.

औरंगाबाद : विनामास्क विद्यार्थ्यावर दंडात्मक कारवाई करणाऱ्या महापालिकेच्या पथकाला समजावून सांगणाऱ्या कार्यकर्त्यास अरेरावीची भाषा करणाऱ्या पथकाला कार्यकर्ते आणि व्यापाऱ्यांनी मारहाण केल्याची घटना सोमवारी सायंकाळी गुलमंडी परिसरात घडली. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत क्रांती चौक ठाण्यात गुन्हा दाखल झाला नव्हता. मनपाचे कंत्राटी कर्मचारी मनमानी पध्दतीने व्यापारी आणि हॉकर्सकडून दंडाच्या नावाखाली ५०० ते ५ हजार रुपये उकळत असल्याची तक्रार व्यापारी आणि कार्यकर्त्यांनी पोलिसांत नोंदविली.

कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेचे कंत्राटी कर्मचारी (माजी सैनिक) विनामास्क, सॅनिटायझर, थर्मल गन अथवा ऑक्सिमीटर नसल्याचे कारण पुढे करत दुकानदारांवर रोज दंडात्मक कारवाई करतात. ५०० ते ५००० रुपयांपर्यंत ते दंड ठोठावतात. रोज होणाऱ्या कारवाईमुळे व्यापारी त्रस्त झाले आहेत. मनपा प्रशासकांच्या वाहनातून सोमवारी सायंकाळी ६ वाजता एक पथक गुलमंडी आले. तेथे त्यांनी विनामास्क लोकांवर कारवाई सुरू केली. एका विद्यार्थ्यांवरही कारवाई करू लागले. त्याच्याकडून दंडाची वसुली केली जात होती. विद्यार्थी गयावया करत असताना तेथे उभे माजी नगरसेवक, भाजपाचे कार्यकर्ते सुरेंद्र कुलकर्णी यांनी पथकाला समजावून सागण्याचा प्रयत्न केला. मात्र, पथक त्यांचे काहीएक ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते.

तेवढ्यात माजी आमदार किशनचंद तनवाणी देखील तेथे आले. त्यांनी देखील पथकाला, हवे तर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलतो, पण त्या विद्यार्थ्याला सोडा, अशी विनंती केली. पथकाने तनवाणी यांनाही अरेरावीची भाषा केली. त्यामुळे संतापलेले व्यापारी आणि कार्यकर्त्यांनी पथकाला चांगलीच मारहाण केली. पथकाने सिटी चौक पोलीस ठाण्यात धाव घेतली. मात्र ही घटना क्रांती चौक ठाण्याच्या हद्दीत घडल्याचे समजल्याने त्यांना तक्रार देण्यासाठी क्रांती चौक पोलीस ठाण्यात पाठवण्यात आले. क्रांती चौक ठाण्यात रात्री उशिरापर्यंत पथकातील कर्मचारी तक्रार देण्यासाठी बसून होते. मात्र, वृत्त देईपर्यंत गुन्हा नोंद झाला नव्हता.

मनपा पथकाविरुध्द सिटी चौक ठाण्यात तक्रार अर्जमनपाच्या पथकाकडून कॅरीबॅग असो अथवा कोविडच्या नावाखाली व्यापाऱ्यांकडून अवाच्या सवा दंड वसुली केली जाते. त्याच्या बऱ्याचदा पावत्या दिल्या जात नाहीत. मनपाच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, असा तक्रार अर्ज व्यापाऱ्यांनी सिटी चौक ठाण्यात दाखल केला.

गुंडांसारखी हप्ता वसुलीमी गुलमंडीवर वैयक्तिक कामानिमित्त गेलो होतो. तेथे महापालिकेचे नागरिक मित्र पथक दोन विद्यार्थ्यांना मास्क न लावल्याबद्दल दंड आकारत होते. दोन्ही विद्यार्थी अक्षरशः रडत होते. विद्यार्थ्यांच्या विनंतीवरून व नागरिकांच्या म्हणण्यानुसार मी पथकाला समजावून सांगण्यासाठी गेलो. विद्यार्थ्यांसोबत त्यांची भाषा गुंडासारखी होती. माझ्या सोबतही अत्यंत उद्धट आणि असभ्य भाषेत पथकातील कर्मचारी बोलत होते. महापालिकेने तुम्हाला चांगल्या कामासाठी नेमले आहे, असे मी समजावून सांगत होतो. सभ्यतेची भाषा त्यांना कळतच नव्हती. त्यामुळे त्यांना कळेल या भाषेतच मला बोलावे लागले. घटनेनंतर माजी आ. किशनचंद तनवाणीसुद्धा तेथे आले. त्यांच्या समोरही पथकातील कर्मचारी तसेच वागत होते. या कर्मचाऱ्यांच्या विरोधात उद्या पोलिसांत तक्रार देणार आहे. महापालिका प्रशासकांची भेट घेऊन व्यथा मांडू.-सुरेंद्र कुलकर्णी, माजी नगरसेवक

टॅग्स :Municipal Commissioner Aurangabadमहानगरपालिका आयुक्त औरंगाबादCrime Newsगुन्हेगारी