शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
3
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
4
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
5
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
6
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
7
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
8
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
9
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
10
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
11
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
12
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
13
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
14
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
15
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
16
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
17
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
18
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
19
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
20
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत

बँकांच्या खासगीकरणाच्या धोरणाचा पुनर्विचार करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:04 IST

औरंगाबाद : सरकार आता सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे खासगीकरण करू पाहत आहे. त्यामुळे आधीच अस्थिर बँकिंग आणखी अस्थिर होईल. लोकांचा ...

औरंगाबाद : सरकार आता सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे खासगीकरण करू पाहत आहे. त्यामुळे आधीच अस्थिर बँकिंग आणखी अस्थिर होईल. लोकांचा बँकिंगवरचा विश्वासच उडेल. हे तर ना लोकांना परवडेल, ना अर्थव्यवस्थेला. या पार्श्वभूमीवर सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या खासगीकरणाच्या धोरणाचा पुनर्विचार करायला हवा, असा आग्रह ऑल इंडिया बँक एम्प्लॉइज असोसिएशनच्या वतीने सरकारकडे करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र स्टेट बँक एम्प्लॉइज फेडरेशनचे महासचिव देवीदास तुळजापूरकर यांनी दिली.

त्यांनी पुढे सांगितले की, या दृष्टीने एक पाऊल म्हणून संघटनेचे कार्यकर्ते व्यापक जनअभियान घेत आहेत. ज्यात ते सरपंचपासून खासदार सर्व लोकप्रतिनिधींना भेटत आहेत. याशिवाय ते शेती, उद्योग, व्यापार, वाणिज्य सर्व क्षेत्रातील प्रतिनिधींना भेटून बँक खासगीकरणातील धोके समजावून सांगतील. यामुळे लोकांची बचत धोक्यात येईल. शेती, स्वयम् रोजगार, शिक्षण क्षेत्र कर्जासाठी दुर्लक्षित होईल. बँकिंग फक्त नफ्यासाठी काम करेल. खेडी, मागास भाग दुर्लक्षित होईल. हे भारतासारख्या विकसनशील देशाला न परवडणारे आहे, असेही तुळजापूरकर यांनी नमूद केले.

चौकट

बँक कर्मचारी संघटनांची सभा

दि. ९ रोजी हैदराबादमध्ये सर्व बँक कर्मचारी संघटनांची एक सभा ९ फेब्रुवारी रोजी हैदराबाद येथे होत आहे. ज्यात या संघटना पुढील कृती कार्यक्रम निश्चित करतील. ज्यात संपासह सर्व कार्यक्रमांवर निर्णय घेण्यात येणार आहे.