शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
4
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
5
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
6
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
7
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
8
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
9
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
10
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
11
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
12
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
13
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
14
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
15
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
16
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
17
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
18
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
19
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
20
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...

बँकांच्या खासगीकरणाच्या धोरणाचा पुनर्विचार करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:04 IST

औरंगाबाद : सरकार आता सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे खासगीकरण करू पाहत आहे. त्यामुळे आधीच अस्थिर बँकिंग आणखी अस्थिर होईल. लोकांचा ...

औरंगाबाद : सरकार आता सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे खासगीकरण करू पाहत आहे. त्यामुळे आधीच अस्थिर बँकिंग आणखी अस्थिर होईल. लोकांचा बँकिंगवरचा विश्वासच उडेल. हे तर ना लोकांना परवडेल, ना अर्थव्यवस्थेला. या पार्श्वभूमीवर सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या खासगीकरणाच्या धोरणाचा पुनर्विचार करायला हवा, असा आग्रह ऑल इंडिया बँक एम्प्लॉइज असोसिएशनच्या वतीने सरकारकडे करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र स्टेट बँक एम्प्लॉइज फेडरेशनचे महासचिव देवीदास तुळजापूरकर यांनी दिली.

त्यांनी पुढे सांगितले की, या दृष्टीने एक पाऊल म्हणून संघटनेचे कार्यकर्ते व्यापक जनअभियान घेत आहेत. ज्यात ते सरपंचपासून खासदार सर्व लोकप्रतिनिधींना भेटत आहेत. याशिवाय ते शेती, उद्योग, व्यापार, वाणिज्य सर्व क्षेत्रातील प्रतिनिधींना भेटून बँक खासगीकरणातील धोके समजावून सांगतील. यामुळे लोकांची बचत धोक्यात येईल. शेती, स्वयम् रोजगार, शिक्षण क्षेत्र कर्जासाठी दुर्लक्षित होईल. बँकिंग फक्त नफ्यासाठी काम करेल. खेडी, मागास भाग दुर्लक्षित होईल. हे भारतासारख्या विकसनशील देशाला न परवडणारे आहे, असेही तुळजापूरकर यांनी नमूद केले.

चौकट

बँक कर्मचारी संघटनांची सभा

दि. ९ रोजी हैदराबादमध्ये सर्व बँक कर्मचारी संघटनांची एक सभा ९ फेब्रुवारी रोजी हैदराबाद येथे होत आहे. ज्यात या संघटना पुढील कृती कार्यक्रम निश्चित करतील. ज्यात संपासह सर्व कार्यक्रमांवर निर्णय घेण्यात येणार आहे.