शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
2
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
3
पवईत मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य कोण?; शिक्षण विभागाशी समोर आले कनेक्शन, काय आहे प्रकार?
4
बाजारात 'ब्लॅक थर्सडे'! निफ्टी २६,००० च्या खाली; एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे १.८२ लाख कोटी बुडाले
5
सोनं १ लाखाच्या खाली येणार, चांदीही चमक गमावणार, ही ४ कारणं निर्णायक ठरणार
6
'मी का लोकांच्या शिव्या खाऊ; यापुढे रस्ता खराब झाला तर...', नितीन गडकरींचा मोठा निर्णय, जाणून घ्या
7
KKR: आयपीएल २०२६ पूर्वी केकेआरच्या संघात मोठा बदल, अभिषेक नायरवर मोठी जबाबदारी!
8
Mumbai Children Hostage: ओलीस मुलांची सुखरुप सुटका; अपहरणकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले 
9
Mumbai Hostage: बिग ब्रेकिंग! मुंबईत एका क्लासमधील मुलांना ओलीस ठेवण्यात आले; पोलिसांनी इमारत घेरली  
10
जिओचा 'या' २ राज्यात दबदबा! दोन कोटी ५१ लाखांहून अधिक युजर्स; एअरटेल-व्हीआयला मोठा फटका
11
Smartphone Tips : बिघडण्याआधी तुमचा स्मार्टफोन देतो 'हे' संकेत! तुम्ही दुर्लक्ष तर करत नाही ना?
12
रासायनिक खतांचे दर नऊ वर्षांत ७५ टक्क्यांनी वाढले; शेतकऱ्यांचे मरण, उसाचा दर केवळ २२ टक्केच वाढला
13
गंभीर आजारांवर केवळ रेग्युलर प्लॅन पुरेसा नाही; 'क्रिटिकल इलनेस' कव्हरचे गणित समजून घ्या
14
IND vs AUS : क्रांतीनं झाकली हरमनप्रीतची मोठी चूक! स्टार्क बायकोला चीअर करायला आला, पण...
15
अमेरिकेचा भारताला दिलासा! चाबहार पोर्टवरील निर्बंधातून डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली सूट
16
लेकाच्या सिनेमात काम करणार का? शाहरुख खान म्हणाला, "त्याला परवडलं तर आणि..."
17
नारनौलमध्ये थरकाप उडवणारा अपघात, तरुणाचा मृतदेह तब्बल ११ किमीपर्यंत फरफटत गेला; दृष्य पाहून स्थानिकही सुन्न
18
Healthy Tea: चहा सोडायचाय? 'हा' घ्या उत्तम पर्याय; एकदा पावडर तयार करा, तीन महीने वापरा!
19
३ महिन्यांत ५० किलो वजन घटवा आणि थेट पोर्शे कार घेऊन घरी जा! जिमनं दिलं 'गोल्डन' चॅलेंज
20
कौतुकास्पद! आईची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी मुलाने 290 शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे कर्ज फेडले

बांधकाम व्यवसायास धोरणाचा फटका; एकसमान नियमावलीची व्यावसायिकांना प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2020 17:24 IST

मुंबई वगळता राज्यातील सर्व शहरांसाठी एकच बांधकाम नियमावली असावी

ठळक मुद्देबांधकाम व्यावसायिकांची नाराजी‘क्रेडाई’ची मागणी लक्षात घेऊन मार्च २०१९ मध्ये मसुदा तयार९० टक्केव्यावसायिक प्रतीक्षेत

- नजीर शेख 

औरंगाबाद : मुंबई वगळता राज्यातील इतर शहरांत एकसमान बांधकाम नियमावली लागू करण्याच्या मागणीकडे राज्य सरकारचे दुर्लक्ष होत असल्याने परिणामी राज्यांतील हजारो नवे बांधकाम प्रकल्प सुरू होऊ शकले नाहीत. मंदीच्या काळात बांधकाम क्षेत्राला राज्य सरकारच्या धोरणाचा मोठा फटका बसत आहे. 

मुंबई वगळता राज्यातील सर्व शहरांसाठी एकच बांधकाम नियमावली असावी, अशी राज्यातील बांधकाम व्यावसायिकांची संघटना असलेल्या ‘क्रेडाई’ने २००३ पासून मागणी लावून धरली आहे. राज्यांमध्ये विविध महापालिका, विविध प्राधिकरण, सिडको, अशा विविध संस्थांमार्फत बांधकाम परवानग्या देण्यात येतात. या बांधकाम परवानग्या देत असताना प्रत्येक प्राधिकरणाच्या बांधकाम परवानगीमध्ये बदल असल्याचे दिसते.  अनेक ठिकाणी चटई निर्देशांक (एफएसआय), टीडीआर, साईड मार्जिन आदींमध्ये बदल झालेले असतात. या सर्व बाबींमुळे बांधकाम व्यावसायिकांना मोठी कसरत करावी लागत आहे. ही बाब लक्षात घेऊन ‘क्रेडाई’ने राज्यात एकच बांधकाम नियमावली लागू करावी, ही मागणी लावून धरली होती. 

‘क्रेडाई’ची मागणी लक्षात घेऊन मार्च २०१९ मध्ये तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारने राज्यात एकसमान बांधकाम नियमावली तयार करण्यासंबंधीचा मसुदाही तयार केला. या मसुद्यावर हरकती आणि सूचना मागविण्यात आल्या. त्यामध्ये सहा हजार हरकती आणि सूचना आल्या. मात्र, त्यानंतर त्याची अंमलबजावणी झालीच नाही. नव्या सरकारने अद्यापपर्यंत ‘क्रेडाई’ला याबाबत प्रतिसाद दिला नसल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. 

नव्या नियमावलीत काय बाबी समोर येतात, त्यानुसार बांधकाम परवानगी घेऊन बांधकामे सुरू करायची असा विचार अनेकांनी केला आहे. परिणामी, या क्षेत्रातील मोठी गुंतवणूक थांबली आहे. विशेषकरून नवी मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, नाशिक आदी शहरांसह संपूर्ण राज्यात बिल्डरांचे कोट्यवधी रुपयांचे हजारो प्रकल्प सुरूच होऊ शकले नाहीत. यामुळे घरांच्या निर्मितीतही राज्याला फटका बसला असल्याचे ‘क्रेडाई’चे उपाध्यक्ष  रवी वट्टमवार यांनी लोकमतला सांगितले. 

९० टक्केव्यावसायिक प्रतीक्षेतराज्यातील मुंबई वगळता जवळपास ९० टक्के बांधकाम व्यावसायिक नव्या एकसमान बांधकाम नियमावलीच्या प्रतीक्षेत आहेत. यामुळे राज्यात अब्जावधी रुपयांची गुंतवणूक थांबली आहे. ही बाब लक्षात घेऊन राज्य सरकारने याबाबत लवकर कार्यवाही करावी, अशी अपेक्षा आहे.     - राजीव पारीख, अध्यक्ष क्रेडाई, महाराष्ट्र 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादState Governmentराज्य सरकार