शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

पालिकेची तक्रार सेवा ‘आॅफलाईन’!

By admin | Updated: April 19, 2015 00:49 IST

बीड : येथील पालिकेने मोठा गाजावाजा करीत नागरिकांच्या तक्रारी आॅनलाईन स्वीकारण्याची सुविधा उपलब्ध केली

बीड : येथील पालिकेने मोठा गाजावाजा करीत नागरिकांच्या तक्रारी आॅनलाईन स्वीकारण्याची सुविधा उपलब्ध केली. मात्र, ही सुविधा आॅफलाईन असल्यामुळे ना तक्रारी करता येताहेत ना त्याचे निराकरण होतेय. त्यामुळे पालिकेची आॅनलाईन तक्रार सेवा फुसका बार ठरली आहे.ई गर्व्हनन्स अंतर्गत बीड पालिकेने १९ जुलै २०१२ रोजी आॅनलाईन तक्रार सेवा सुरू केली. तेव्हापासून ते आतापर्यंत या तक्रार विभागाला ग्रहनच लागलेले आहे. तक्रार घेण्यासाठी नेमलेले कर्मचारी जागेवर नसतात. नगर रचना विभागातील तक्रारी आॅनलाईन स्वीकारण्याची सोय मराठवाड्यात पहिल्यांदा बीडमध्ये उपलब्ध झाली होती. जन्म मृत्यू नोंद २०१२, आवकजावक २०१३, विवाह नोंदणी, मालमत्ता २०१४ व लेखा संबंधित तक्रारींची आॅनलाईन सुविधा २०१५ मध्ये सुरू करण्यात आली आहे.निवारण सेवाच समस्येच्या गर्तेतही सुविधा सुरू झाल्यामुळे नागरीकांच्या समस्या मार्गी लागतील अशी आशा होती, मात्र पालिकेची उदासीनता आणि अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष यामुळे ही सुविधा पुर्णत: ‘फ्लॉप’ ठरली आहे. त्यामुळे तक्रारींचा पाढा आजही कायमच असल्याचे दिसून येत आहे. एसएमएस सुविधा सुरूआपल्या तक्रारींची आणि कर भरणा केलेली पावती, कर थकबाकी याची माहिती मोबाईलवर घरबसल्या मिळत आहे. ही सुविधा ४ एप्रिलपासून सुरू करण्यात आली असल्याचे लिपीक राम शिंदे यांनी सांगितले.नागरिकांची सीओंकडे धावतक्रारी घेण्यासाठी कोणीच नसल्याने संतप्त नागरीकांनी तक्रार विभागाचीच तक्रार मुख्याधिकारी श्रीकृष्ण भालसिंग यांच्याकडे केली होती. यावर मुख्याधिकारी भालसिंग यांनी सर्वच विभागातील अधिकाऱ्यांना बोलावून चांगलेच धारेवर धरले. (प्रतिनिधी)तक्रार घेण्यासाठी नेमलेले कर्मचारी गैरहजर असूनही त्यांना केवळ नोटीस दिली जाते.४मात्र त्यांच्यावर कसलीच कारवाई केली जात नाही. ४वरिष्ठच पाठिशी घालत असल्याचा आरोप होत आहे.पहिल्यांदा तक्रार विभागात तक्रार द्यावी. नंतर ही तक्रार तीन दिवसात संबंधीत विभागाला जाणे आवश्यक आहे. त्यानंतर ३० दिवसात संबंधीत विभागाने ती दुर करणे आवश्यक आहे. असे न झाल्यास प्रशासकीय अधिकारी यांच्याकडे तिचा अहवाल पाठवावा. त्यांनी याची चौकशी करून तीन महिन्याच्या आत मुख्याधिकाऱ्यांकडे पाठविणे आवश्यक असून यावर काय कारवाई करायची हा निर्णय मुख्याधिकाऱ्यांचा असल्याचे प्राशासकीय अधिकारी प्रमोद पाटील यांनी सांगितले.