शहरं
Join us  
Trending Stories
1
"ट्रम्प यांनी हस्तक्षेप केला नसता तर...'; शहबाज शरीफ बनले अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते, शांतीदूत म्हणत नोबेल देण्याची मागणी
2
सुपर ओव्हरचा थरार! श्रीलंका २ धावांवर All Out; पहिल्या बॉलवर मॅच संपवत टीम इंडियाचा विजयी 'षटकार'
3
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
4
IND vs SL Match Super Over: अखेरच्या चेंडूवर ड्रामा अन् सामन्यात सुपर ओव्हर ट्विस्ट; नेमक काय घडलं (VIDEO)
5
सोनम वांगचुक जोधपूर मध्यवर्ती कारागृहात; अटक केल्यानंतर लेहमधून विमानाने आणलं, CCTV खाली देखरेख
6
Pathum Nissanka Century : पहिली सेंच्युरी अन् श्रीलंकेच्या पठ्ठ्यानं किंग कोहलीचा मोठा विक्रमही मोडला
7
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
8
संजूचा गगनचुंबी सिक्सर! चाहतीचे ठुमके अन् ड्रेसिंग रुममध्ये सनथ जयसूर्याला कळायचं झालं बंद (VIDEO)
9
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
10
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
11
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
12
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
13
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
14
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
15
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
16
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
17
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
18
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
19
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
20
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल

१५ आरोपींच्या अटकेला पोलिसांची चालढकल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2017 00:20 IST

येथील पुरवठा विभागाच्या गोदामात झालेल्या २८ कोटी रुपयांच्या धान्य घोटाळा प्रकरणात ३७ पैकी १५ आरोपींच्या अटकेला गेल्या वर्षभरापासून पोलिसांकडून चालढकल केली जात असून, शासनालाही पोलिसांकडून याबाबत तकलादू अहवाल देण्यात आला असल्याची बाब समोर आली आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : येथील पुरवठा विभागाच्या गोदामात झालेल्या २८ कोटी रुपयांच्या धान्य घोटाळा प्रकरणात ३७ पैकी १५ आरोपींच्या अटकेला गेल्या वर्षभरापासून पोलिसांकडून चालढकल केली जात असून, शासनालाही पोलिसांकडून याबाबत तकलादू अहवाल देण्यात आला असल्याची बाब समोर आली आहे़शहरातील कोतवाली पोलीस ठाण्यात ४ कोटी ९७ लाख रुपयांच्या शासकीय गोदामातील धान्याचा अपहार झाल्या प्रकरणी १३ आॅगस्ट २०१६ रोजी प्रारंभी दोघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता़ त्यानंतर या घटनेचा तपास जसजसा पुढे गेला़ तसतशी आरोपींची संख्या तब्बल ३७ वर गेली अन् धान्य घोटाळाचा आकडा २८ कोटी ३४ लाख ७४ हजार ५६० रुपयांपर्यंत गेला़ या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत २१ आरोपींना अटक केली आहे़ त्यातील सर्वच आरोपींना जामीन मिळालेला आहे़ उर्वरित १६ पैकी एक आरोपी मयत आहे़ राहिलेल्या १५ आरोपींना पोलिसांनी अद्यापही अटक केलेली नाही़ अटक न केलेल्या आरोपींमध्ये ९ शासकीय अधिकाºयांचा समावेश आहे़ याशिवाय अन्य ६ आरोपींनाही पोलिसांनी अद्याप अटक करण्याची तसदी घेतलेली नाही़ या संदर्भात नुकत्याच झालेल्या विधान मंडळाच्या सभागृहात शासकीय अधिकाºयांच्या अटकेबाबत आ़ बाबाजानी दुर्राणी यांनी लक्षवेधी उपस्थित केली होती़ त्या अनुषंगाने शासनाने जिल्हाधिकाºयांमार्फत माहिती मागविली होती़ जिल्हाधिकाºयांनी याबाबत पोलीस अधीक्षकांकडे माहिती मागितली़ त्यानुसार अतिरिक्त पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी १८ जुलै रोजी जिल्हा पुरवठा अधिकाºयांना कारवाईच्या अनुषंगाने पत्र पाठविले़ त्यामध्ये संपूर्ण प्रकरणाचा इतिहास देण्यात आला असून, ९ शासकीय अधिकारी व कर्मचाºयांना गुन्ह्यात अटक करणे बाकी असल्याचे नमूद केले आहे़ त्यापैकी संतोष वेणीकर, दिलीप कच्छवे, ज्योती पवार, चित्रा देशमुख, प्रकाश यंदे या ५ आरोपींचे अटकपूर्व जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळले आहेत़ तसेच चित्रा देशमुख व प्रकाश यंदे यांचे अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानेही फेटाळले असल्याचे नमूद करण्यात आले आहे़ या गुन्ह्यात आतापर्यंत १२ लाख १५ हजार रुपये रोख व २४ लाख ९५ हजार रुपयांची वाहने आणि प्रत्येकी ५० किलोचे १०४ गहू, तांदूळ, साखरेचे पोते तसेच २२ कट्टे तांदूळ असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे़ सदरचा गुन्हा हा आर्थिक स्वरुपाचा असून, त्याची व्याप्ती मोठी आहे़ गुन्ह्यात कोणत्याही आरोपीची गय करण्यात आली नसून, या पुढेही यात आरोपींकडून दस्ताऐवज पुरावा तसेच साक्ष पुरावा हस्तगत करण्यात येत आहे़ दस्ताऐवज पुराव्यात जप्त करण्यात आलेल्या अभिलेख्यांची पडताळणी करून आरोपीविरूद्ध ठोस पुरावा हस्तगत करण्याचे काम कसोशीने (?) चालूच आहे़ आजपावेतो २१ स्वस्तधान्य दुकानदार व व्यापारी आरोपींना अटक करण्यात आली असून, इतर आरोपींविरूद्धही भक्कम पुरावे प्राप्त होत आहेत़ उर्वरित स्वस्तधान्य दुकानदार व व्यापारी यांना अटक केल्यानंतर त्यांच्याकडून या शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्याविरूद्ध आणखी भक्कम पुरावा मिळण्याची खात्री असल्याने या उर्वरित आरोपींना अटक केल्यानंतर इतर सर्व शासकीय अधिकारी व कर्मचाºयांना अटक करण्याची तजवीज ठेवण्यात आली आहे़, असेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे़ असे असले तरी इतर आरोपींना कधी अटक करणार? त्यांच्या शोधासाठी काय प्रयत्न केले? याबाबतची कोणतीही माहिती या अहवालात देण्यात आलेली नाही़ आरोपींविरूद्ध भक्कम पुरावे असल्याची बाब अहवालात नमूद असतानाही अटक मात्र का केली जात नाही? असा सवालही या निमित्ताने उपस्थित होत आहे़