शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

विष प्राशन केलेल्या युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:04 IST

जायकवाडी : नम्रतानगर-ईसारवाडीतील १९ वर्षीय युवकाने भांडणाच्या त्रासाला कंटाळून २७ फेब्रुवारीला विष प्राशन केले. ही बाब कुटुंबीयांच्या लक्षात येताच ...

जायकवाडी : नम्रतानगर-ईसारवाडीतील १९ वर्षीय युवकाने भांडणाच्या त्रासाला कंटाळून २७ फेब्रुवारीला विष प्राशन केले. ही बाब कुटुंबीयांच्या लक्षात येताच त्यांनी युवकाला उपचारासाठी औरंगाबादेतील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्या युवकाचा शनिवारी (दि. ६) उपचारादरम्यान मृत्यू झाला. नितीन हरी वीर असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे तर नितीनच्या कुटुंबियांनी त्याच्या आत्महत्येस कारणीभूत असलेल्या चार जणांविरोधात एमआयडीसी पैठण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

पोलीस सूत्रांनी सांगितले की, नितीन हरी वीर हा घरासमोर उभा होता तेव्हा शेजारच्यांशी झालेल्या भांडणात त्याला शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. त्या भीतीने नितीनने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही बाब कुटुंबीयांच्या लक्षात आली परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी मृताचा भाऊ सचिन वीर याने पैठण पोलीस ठाण्यात एजाज ऊर्फ कालू शेख, जावेद शेख, आलादिन शेख, आफसाना शेख (रा. नम्रतानगर, ईसारवाडी परिसर) या चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला. यांच्या त्रासाला कंटाळूनच माझ्या भावाने आत्महत्या केली आहे, असे तक्रारीत म्हटले आहे. पुढील तपास सपोनि अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी दिनेश दाभाडे, शरद पवार, राजेंद्र जिवढे हे करत आहेत.