शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
2
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; जन्मदात्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
3
भारताच्या हल्ल्यामुळे पाकिस्तानात न्यूक्लियर रेडिएशन लीक?; अमेरिकेचं पहिल्यांदाच भाष्य
4
पाकिस्ताननंतर भारताचा चीनविरोधात 'डिजिटल स्ट्राईक'; ग्लोबल टाईम्सचे X अकाउंट केलं BLOCK !
5
CJI BR Gavai Oath Ceremony : महाराष्ट्राचे सुपुत्र बी. आर. गवई देशाचे नवे सरन्यायाधीश; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी दिली शपथ
6
भाजपा मंत्र्याच्या नेमप्लेटवर शाई, काँग्रेसची निदर्शनं; कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत वादग्रस्त विधान भोवलं
7
'या' दिग्गज कंपनीतून बाहेर पडण्याच्या तयारीत Reliance; ५०० कोटींची केलेली गुंतवणूक, मिळणार ११,१४१ कोटी रुपये
8
Video: भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीचे श्रेय घेणारा अमेरिका दहशतवादाच्या प्रश्नावर गप्प...
9
सरन्यायाधीशांना मिळतो पंतप्रधानांपेक्षा जास्त पगार; सोबत भत्ते आणि मिळतात 'या' खास सुविधा
10
कर्नल सोफिया कुरेशींबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या भाजपा मंत्र्याला दणका; वरिष्ठांचे आदेश आले, अन्...
11
रितेश देशमुखनं विचारलं 'मोठं होऊन काय होणार?' लहानग्याचं उत्तर ऐकून तुम्हालाही वाटेल अभिमान!
12
बर्फ वितळेल, जास्त पाऊस पडेल, गंगा नदीचा प्रवाह ५० टक्क्यांनी वाढेल..; IIT रुरकीचा रिपोर्ट
13
विराटशिवाय 'टेस्ट' झाली फिकी; प्रीती झिंटानं बोलून दाखवली मनातली गोष्ट
14
पाकिस्ताननं जितक्या रकमेसाठी IMF मध्ये नाक कापून घेतलं, भारताला त्यापेक्षा अधिक तर 'गिफ्ट'च मिळणारे; प्रकरण काय?
15
अनुष्का सेनवर चिडला नील नितीन मुकेश? आगामी सीरिजच्या प्रमोशनल इव्हेंटमधील व्हिडिओ व्हायरल
16
एकामागोमाग एक दिग्गज कंपन्या निर्णय घेतायत; मायक्रोसॉफ्ट ६००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार
17
Rohit Sharma : कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर रोहित शर्मा मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला, कारण काय ?
18
ब्रेकअपनंतर प्रेयसीचे ’तसले’ व्हिडीओ पॉर्न साईटवर टाकण्याची धमकी: कोल्हापूरच्या प्रियकरावर पुण्यात गुन्हा
19
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आता बुलेटप्रुफ कारमधून ये-जा करणार; पाकिस्तानमुळे वाढली सुरक्षा
20
मोठी बातमी! अकोल्यातील पाच सराफा दुकानांवर आयकरची धाड; सकाळपासून शोधमोहिम सुरू

प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुलांना २ महिन्यांत मंजुरी

By admin | Updated: July 8, 2017 00:28 IST

नांदेड : प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत घरकुल मिळावे यासाठी नोंदणी केलेल्या ५६ हजार लाभार्थ्यांपैकी ८० टक्के कुटुंबांच्या तपासणीचे काम पूर्ण झाले असून त्यांचे प्रस्ताव म्हाडाकडे सादर केले आहेत़

भारत दाढेल । लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत घरकुल मिळावे यासाठी नोंदणी केलेल्या ५६ हजार लाभार्थ्यांपैकी ८० टक्के कुटुंबांच्या तपासणीचे काम पूर्ण झाले असून त्यांचे प्रस्ताव म्हाडाकडे सादर केले आहेत़ आता या प्रस्तावांना केंद्र शासनाच्या मंजुरीची प्रतीक्षा असून येत्या दोन महिन्यांत मंजुरी मिळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे़ त्यामुळे लाभार्थ्यांच्या घरकुलाचे स्वप्न पूर्ण होणार आहे़ शहरात बीएसयुपी योजनेनंतर प्रधानमंत्री आवास ही महत्वाकांक्षी योजना राबविण्यात येत आहेत़ बीएसयुपी योजनेत ज्यांना घरकुल मिळाले नाही, अशा कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळणार आहे़ मागील वर्षी या योजनेतंर्गत जवळपास ५६ हजार नागरिकांनी महापालिकेकडे घरकुलासाठी आॅनलाईन नोंदणी केली होती़ नोंदणी केलेल्या अर्जदारांची माहिती पडताळण्यासाठी महापालिकेने पथके तयार केले़ त्यानुसार शहरात ठिकठिकाणी अर्जदारांची माहिती संकलित करण्यात आली़ पात्र अर्जदारांचे प्रस्ताव या योजनेचे समन्वयक असलेल्या म्हाडा कंपनीकडे पाठविण्यात आले आहेत़ त्यानंतर डीपीआर पाठविण्याचे काम सुरू आहे़ म्हाडाकडून हे प्रस्ताव केंद्र शासनाच्या मंजुरीसाठी जातील़ ही मंजुरी मिळण्यासाठी दोन महिन्यांची प्रतीक्षा करावी लागेल, अशी माहिती सूत्रांनी दिली़ या योजनेतंर्गत मध्यम उत्पन्न असलेल्या गटात दोन प्रकार केले आहे़ एमआयजी गट १ मध्ये ज्यांचे उत्पन्न ६ ते १२ लाख आहे व एमआयजी गट २ मध्ये ज्यांचे उत्पन्न १२ ते १८ लाख उत्पन्न आहे, अशांचा समावेश केला आहे़ गट १ मधील लाभार्थ्यांना ९ लाखांचे तर गट २ मधील लाभार्थ्यांना १२ लाखांजे कर्ज मंजूर केले जाईल़ शासनाकडून बँकेच्या व्याजदारावर सबसिडी मिळणार आहे़ गट १ साठी ४ टक्के तर गट २ साठी ३ टक्के सबसिडी मिळेल़ या लाभार्थ्यांना बँकेशी संपर्क साधून कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर कर्ज मिळेल़ कमकुवत गटासाठी ३ लाखांपर्यंत कर्ज देण्यात येणार असून कमी उत्पन्न असलेल्या गटातील लाभार्थ्यांना ६ लाखांपर्यंत कर्ज देण्यात येणार आहे़ घटक क्रमांक ३ मध्ये जे शहरात किरायाने राहतात, अशा लाभार्थ्यांचा समावेश असून किरायादार लाभार्थ्यांना शासकीय जमिनीवर घरे बांधून देण्यात येतील़ मात्र या प्रक्रियेत शासकीय जमीन उपलब्ध असणे गरजेचे आहे़ दरम्यान, आगामी महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पूर्वी घरकुलांना मंजुरी मिळेल, असा विश्वास महापालिकेतील सूत्रांनी व्यक्त केल्याने संबंधित लाभार्थ्यांची प्रतीक्षा संपणार आहे़