शहरं
Join us  
Trending Stories
1
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
2
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
3
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
4
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
5
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
7
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
8
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
9
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
10
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
11
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
12
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
13
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
14
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
15
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
16
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
17
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
18
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
19
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
20
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश

सुखद ! औरंगाबादहून आता दररोज सकाळी मुंबईसाठी ‘उड्डाण’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 19:19 IST

Aurangabad Airport : किमान आठवड्यातून ३ दिवस सकाळी मुंबईला जाऊन सायंकाळी परत औरंगाबादेत परतणेही प्रवाशांना शक्य होणार आहे.

ठळक मुद्देइंडिगोने काही दिवसांपूर्वीच प्रवाशांची मागणी पाहून मुंबईसाठी रोज विमानसेवा देण्याचा निर्णय घेतला आहे. अखेर ८ जानेवारीपासून सकाळी १०.२० वाजता औरंगाबादहून मुंबईसाठी विमान उड्डाण

औरंगाबाद : इंडिगोचे मुंबई-औरंगाबाद-मुंबई विमान ८ जानेवारीपासून दुपारऐवजी आता सकाळच्या वेळेत उड्डाण घेणार आहे. त्यामुळे मुंबईला लवकर जाऊ इच्छिणाऱ्या प्रवाशांच्या सुविधेत भर पडणार आहे.

इंडिगोने काही दिवसांपूर्वीच प्रवाशांची मागणी पाहून मुंबईसाठी रोज विमानसेवा देण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या ही विमानसेवा आठवड्यातून ३ दिवस आहे. मात्र, ८ जानेवारीपासून हे विमान दररोज उड्डाण घेणार आहे. मुंबईसाठी शहरातून रोज हवाई कनेक्टिव्हिटी उपलब्ध राहणार आहे. हे विमान सध्या मुंबईहून येऊन औरंगाबादहून दुपारी १२.१० मुंबईला रवाना होते. मुंबईत पोहोचेपर्यंत एक वाजून जातो. त्यामुळे अर्धा दिवस औरंगाबादेत आणि अर्धा दिवस मुंबईत अशी प्रवाशांची अवस्था होती. त्यातून नियोजित कामे करण्यास अनेक अडचणी येतात.

त्यामुळे मुंबईसाठी सकाळच्या वेळेत विमानाचे उड्डाण झाले पाहिजे, अशी मागणी होत होती. त्यासाठी इंडिगोकडे पाठपुरावा करण्यात आला. अखेर ८ जानेवारीपासून सकाळी १०.२० वाजता औरंगाबादहून मुंबईसाठी विमान उड्डाण घेईल,अशी माहिती उद्योजक सुनीत कोठारी यांनी दिली. आठवड्यातून ३ दिवसांसाठी एअर इंडियाचीही मुंबईसाठी विमानसेवा सुरु आहे. त्यामुळे किमान आठवड्यातून ३ दिवस सकाळी मुंबईला जाऊन सायंकाळी परत औरंगाबादेत परतणेही प्रवाशांना शक्य होणार आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad International Airportऔरंगाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळ