शहरं
Join us  
Trending Stories
1
धगधगतं फ्रान्स! लाखो लोक रस्त्यावर उतरले, काही ठिकाणी दगडफेक; रेल्वे, मेट्रो, बस, शाळा बंद
2
काकासोबत असलेल्या प्रशिकवर बिबट्याची झडप, घरापासून ५० मीटरवर सापडला मृतदेह
3
रेपचा व्हिडिओ, पत्नीची आयडिया; पती विधवा महिलांसोबत बनवायचा संबंध, आरोपीचा खळबळजनक खुलासा
4
अजबच! फ्रेंड रिक्वेस्ट रिजेक्ट केल्याने तरुणी संतापली, अपहरण करून तरुणाला मारहाण केली, त्यानंतर...
5
हॉर्लिक्स, विक्स, झंडू बाम, डायपर, टुथपेस्ट... सर्वकाही स्वस्त; दिग्गज कंपन्यांनी जारी केली नवी लिस्ट
6
"एकटं वाटलं की मी सिद्धिविनायक मंदिरात जाऊन बसते...", रिंकूने सांगितलं कारण, म्हणाली...
7
Mumbai Crime: घाटकोपर रेल्वे स्थानकाबाहेर सापडला ३५ वर्षाच्या माणसाचा मृतदेह; कोणामुळे गेला जीव?
8
‘टॅरिफ’मुळे प्लास्टिक उद्योग अडचणीत; ३ वर्षांत भारतातून इतर देशांमध्ये चौपटीने निर्यात वाढविण्याचे लक्ष्य
9
गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान: अजित पवारांनी टोचले कान; म्हणाले, 'भाजपची जबाबदारी फडणवीसांची'
10
"आम्ही मित्र बनलो अन्..." १९ वर्षीय मॉडलनं का उचललं टोकाचं पाऊल?; बॅगेतील चिठ्ठीमुळे उघडलं रहस्य
11
शेअर बाजाराच्या तेजीला ब्रेक; Sensex १४७ अंकांनी आपटला, निफ्टीतही घसरण; 'हे' प्रमुख स्टॉक्स घसरले
12
यूएई सामन्याआधी केलेलं नाटक पाकिस्तानच्या अंगलट, आयसीसीनं पाठवला ईमेल!
13
रुममेटशी भांडण, पोलिसांनी थेट झाडल्या गोळ्या, अमेरिकेत भारतीय इंजिनियरचा मृत्यू  
14
बँक खात्यात पैसे नाही, टेन्शन कशाला? आता करा UPI पेमेंट, पुढच्या महिन्यात पैसे भरा; 'यांनी' आणलं जबरदस्त फीचर
15
आधी गोलंदाजीवर ठोकले गेले ५ षटकार, मग वडिलांचं निधन, श्रीलंकन क्रिकेटपटूवर कोसळला दु:खाचा डोंगर   
16
Nilon's Success Journey: लोणचं खायला घालून कंपनीनं कमावले ४०० कोटी; छोट्या किचनमधून झाली सुरुवात, आज परदेशातही आहे व्यवसाय
17
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानवर रात्री १.३० वाजताच स्ट्राइक का केले?; CDS चौहान यांचा खुलासा
18
फायद्याची बातमी! पेन्शनचा १००% पैसा टाका इक्विटीत; १ ऑक्टोबरपासून लागू होणार नवा नियम; पैसे कुठे आणि किती वाढत आहेत हे समजणे सोपे होणार
19
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
20
आयफोन १७ च्या खरेदीवर ईएमआय किती येईल? जाणून घ्या बँक आणि कॅशबॅक ऑफर्स!

‘खेलो इंडिया’मधून आॅलिम्पिक खेळाडू घडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 00:54 IST

क्रीडामंत्री राज्यवर्धनसिंह राठोड यांच्या दृष्टिकोनातून साकार झालेल्या ‘खेलो इंडिया’ या उपक्रमांतर्गत २0२४ आणि २0२८ मध्ये होणाऱ्या आॅलिम्पिक स्पर्धेसाठी खेळाडू तयार करण्यात येणार आहे. या खेळाडूंच्या मार्गदर्शनासाठी परदेशी प्रशिक्षकांनाही आमंत्रित करण्यात येणार असल्याचे भारतीय क्रीडा प्राधिकरण (साई) केंद्रातर्फे ‘खेलो इंडिया’अंतर्गत तिरंदाजी खेळाचे प्रमुख असणारे व भारताचे माजी हॉकी प्रशिक्षक अजयकुमार बन्सल यांनी सांगितले. औरंगाबाद येथे ‘खेलो इंडिया’ उपक्रमांतर्गत नुकत्याच झालेल्या तिरंदाजी खेळाच्या शिबिरासाठी अजयकुमार बन्सल यांचे साईच्या पश्चिम विभागीय केंद्रात आगमन झाले होते. याप्रसंगी त्यांनी ‘लोकमत’शी विशेष संवाद साधला.

ठळक मुद्देअजयकुमार बन्सल यांना विश्वास : मार्गदर्शनासाठी परदेशी प्रशिक्षक बोलावणार

जयंत कुलकर्णी ।औरंगाबाद : क्रीडामंत्री राज्यवर्धनसिंह राठोड यांच्या दृष्टिकोनातून साकार झालेल्या ‘खेलो इंडिया’ या उपक्रमांतर्गत २0२४ आणि २0२८ मध्ये होणाऱ्या आॅलिम्पिक स्पर्धेसाठी खेळाडू तयार करण्यात येणार आहे. या खेळाडूंच्या मार्गदर्शनासाठी परदेशी प्रशिक्षकांनाही आमंत्रित करण्यात येणार असल्याचे भारतीय क्रीडा प्राधिकरण (साई) केंद्रातर्फे ‘खेलो इंडिया’अंतर्गत तिरंदाजी खेळाचे प्रमुख असणारे व भारताचे माजी हॉकी प्रशिक्षक अजयकुमार बन्सल यांनी सांगितले.औरंगाबाद येथे ‘खेलो इंडिया’ उपक्रमांतर्गत नुकत्याच झालेल्या तिरंदाजी खेळाच्या शिबिरासाठी अजयकुमार बन्सल यांचे साईच्या पश्चिम विभागीय केंद्रात आगमन झाले होते. याप्रसंगी त्यांनी ‘लोकमत’शी विशेष संवाद साधला. ते म्हणाले की, ‘खेलो इंडिया’ या उपक्रमांतर्गत प्रत्येक वर्षी विविध खेळांतील प्रतिभावान अशा एक हजार खेळाडूंची निवड करण्यात येणार आहे. निवड झालेल्या खेळाडूंवर त्यांचा आहार, निवास, प्रशिक्षण, शिक्षण, स्पर्धा आदींसाठी ५ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे आणि खेळाडूंना दत्तक घेण्याची ही प्रक्रिया आठ वर्षे सुरू राहणार आहे. निवड झालेल्या खेळाडूंना २0२४ व २0२८ च्या आॅलिम्पिकसाठी घडवले जाईल. या उपक्रमांमुळे ग्रामीण व शहरातील खेळाडूंवर सुविधांपासून वंचित राहण्याची वेळ येणार नाही, तसेच एक प्रतिभावान खेळाडूंचा चमू मिळणार आहे. याचा फायदा भारताला आॅलिम्पिकसारख्या मोठ्या स्पर्धेसाठी होईल. तसेच दीपिका, अतानुदास यांच्यासारखे अनेक खेळाडू देशाला आॅलिम्पिकसाठी मिळतील आणि पदक जिंकण्याची संधीदेखील वाढेल.’खेळाडूंनी मानसिकदृष्ट्या भक्कम होण्याची गरज : पौर्णिमा माहातोभारतात गुणवत्ता भरपूर आहे; परंतु आॅलिम्पिकसारख्या मोठ्या व्यासपीठावर भारतीय खेळाडूंना आत्मविश्वासाच्या अभावामुळे पदक जिंकण्यात अपयश मिळत असल्याची प्रतिक्रिया प्रतिष्ठित द्रोणाचार्य पुरस्कारप्राप्त पौर्णिमा माहातो यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली. औरंगाबाद येथे ‘खेलो इंडिया’ उपक्रमांतर्गत राष्ट्रीय तिरंदाजी शिबिराच्या निमित्ताने त्या येथे आल्या होत्या. खेलो इंडियांतर्गत तिरंदाजी शिबीर हे २०२४ व २०२८ आॅलिम्पिक लक्षात घेऊन आयोजित करण्यात येत आहे. त्याअंतर्गत खेळाडूंना सुविधा मिळत आहेत. तिरंदाजीत कोरियाकडे चांगल्या दर्जाचे खेळाडू आहेत. त्यानंतर कोरिया, तैपई यांचा क्रमांक लागतो. भारत चौथ्या ते पाचव्या स्थानावर आहे. कामगिरी उंचावण्यासाठी भारतीय संघाला खूप मेहनत करावी लागणार आहे. जागतिक, आॅलिम्पिकसारख्या स्पर्धेसाठी एक महिना एकत्रित नियोजन बद्ध सराव करण्याची आवश्यकता आहे. तसेच आॅलिम्पिकसारख्या स्पर्धेत पदक जिंकण्यासाठी खेळाडूंनी मानसिकदृष्ट्या भक्कम होण्याची नितांत गरज असल्याचे पौर्णिमा माहातो यांनी सांगितले. पौर्णिमा माहातो यांना २०१३ साली द्रोणाचार्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून, त्या भारतीय तिरंदाजी संघाच्या प्रशिक्षिकादेखील आहेत.