शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
3
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
4
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
5
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
6
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
7
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
8
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
9
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
10
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
11
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
12
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
13
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
14
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
15
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
16
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
17
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
18
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
19
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
20
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी

‘खेलो इंडिया’मधून आॅलिम्पिक खेळाडू घडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 00:54 IST

क्रीडामंत्री राज्यवर्धनसिंह राठोड यांच्या दृष्टिकोनातून साकार झालेल्या ‘खेलो इंडिया’ या उपक्रमांतर्गत २0२४ आणि २0२८ मध्ये होणाऱ्या आॅलिम्पिक स्पर्धेसाठी खेळाडू तयार करण्यात येणार आहे. या खेळाडूंच्या मार्गदर्शनासाठी परदेशी प्रशिक्षकांनाही आमंत्रित करण्यात येणार असल्याचे भारतीय क्रीडा प्राधिकरण (साई) केंद्रातर्फे ‘खेलो इंडिया’अंतर्गत तिरंदाजी खेळाचे प्रमुख असणारे व भारताचे माजी हॉकी प्रशिक्षक अजयकुमार बन्सल यांनी सांगितले. औरंगाबाद येथे ‘खेलो इंडिया’ उपक्रमांतर्गत नुकत्याच झालेल्या तिरंदाजी खेळाच्या शिबिरासाठी अजयकुमार बन्सल यांचे साईच्या पश्चिम विभागीय केंद्रात आगमन झाले होते. याप्रसंगी त्यांनी ‘लोकमत’शी विशेष संवाद साधला.

ठळक मुद्देअजयकुमार बन्सल यांना विश्वास : मार्गदर्शनासाठी परदेशी प्रशिक्षक बोलावणार

जयंत कुलकर्णी ।औरंगाबाद : क्रीडामंत्री राज्यवर्धनसिंह राठोड यांच्या दृष्टिकोनातून साकार झालेल्या ‘खेलो इंडिया’ या उपक्रमांतर्गत २0२४ आणि २0२८ मध्ये होणाऱ्या आॅलिम्पिक स्पर्धेसाठी खेळाडू तयार करण्यात येणार आहे. या खेळाडूंच्या मार्गदर्शनासाठी परदेशी प्रशिक्षकांनाही आमंत्रित करण्यात येणार असल्याचे भारतीय क्रीडा प्राधिकरण (साई) केंद्रातर्फे ‘खेलो इंडिया’अंतर्गत तिरंदाजी खेळाचे प्रमुख असणारे व भारताचे माजी हॉकी प्रशिक्षक अजयकुमार बन्सल यांनी सांगितले.औरंगाबाद येथे ‘खेलो इंडिया’ उपक्रमांतर्गत नुकत्याच झालेल्या तिरंदाजी खेळाच्या शिबिरासाठी अजयकुमार बन्सल यांचे साईच्या पश्चिम विभागीय केंद्रात आगमन झाले होते. याप्रसंगी त्यांनी ‘लोकमत’शी विशेष संवाद साधला. ते म्हणाले की, ‘खेलो इंडिया’ या उपक्रमांतर्गत प्रत्येक वर्षी विविध खेळांतील प्रतिभावान अशा एक हजार खेळाडूंची निवड करण्यात येणार आहे. निवड झालेल्या खेळाडूंवर त्यांचा आहार, निवास, प्रशिक्षण, शिक्षण, स्पर्धा आदींसाठी ५ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे आणि खेळाडूंना दत्तक घेण्याची ही प्रक्रिया आठ वर्षे सुरू राहणार आहे. निवड झालेल्या खेळाडूंना २0२४ व २0२८ च्या आॅलिम्पिकसाठी घडवले जाईल. या उपक्रमांमुळे ग्रामीण व शहरातील खेळाडूंवर सुविधांपासून वंचित राहण्याची वेळ येणार नाही, तसेच एक प्रतिभावान खेळाडूंचा चमू मिळणार आहे. याचा फायदा भारताला आॅलिम्पिकसारख्या मोठ्या स्पर्धेसाठी होईल. तसेच दीपिका, अतानुदास यांच्यासारखे अनेक खेळाडू देशाला आॅलिम्पिकसाठी मिळतील आणि पदक जिंकण्याची संधीदेखील वाढेल.’खेळाडूंनी मानसिकदृष्ट्या भक्कम होण्याची गरज : पौर्णिमा माहातोभारतात गुणवत्ता भरपूर आहे; परंतु आॅलिम्पिकसारख्या मोठ्या व्यासपीठावर भारतीय खेळाडूंना आत्मविश्वासाच्या अभावामुळे पदक जिंकण्यात अपयश मिळत असल्याची प्रतिक्रिया प्रतिष्ठित द्रोणाचार्य पुरस्कारप्राप्त पौर्णिमा माहातो यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली. औरंगाबाद येथे ‘खेलो इंडिया’ उपक्रमांतर्गत राष्ट्रीय तिरंदाजी शिबिराच्या निमित्ताने त्या येथे आल्या होत्या. खेलो इंडियांतर्गत तिरंदाजी शिबीर हे २०२४ व २०२८ आॅलिम्पिक लक्षात घेऊन आयोजित करण्यात येत आहे. त्याअंतर्गत खेळाडूंना सुविधा मिळत आहेत. तिरंदाजीत कोरियाकडे चांगल्या दर्जाचे खेळाडू आहेत. त्यानंतर कोरिया, तैपई यांचा क्रमांक लागतो. भारत चौथ्या ते पाचव्या स्थानावर आहे. कामगिरी उंचावण्यासाठी भारतीय संघाला खूप मेहनत करावी लागणार आहे. जागतिक, आॅलिम्पिकसारख्या स्पर्धेसाठी एक महिना एकत्रित नियोजन बद्ध सराव करण्याची आवश्यकता आहे. तसेच आॅलिम्पिकसारख्या स्पर्धेत पदक जिंकण्यासाठी खेळाडूंनी मानसिकदृष्ट्या भक्कम होण्याची नितांत गरज असल्याचे पौर्णिमा माहातो यांनी सांगितले. पौर्णिमा माहातो यांना २०१३ साली द्रोणाचार्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून, त्या भारतीय तिरंदाजी संघाच्या प्रशिक्षिकादेखील आहेत.