शहरं
Join us  
Trending Stories
1
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
2
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
3
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
4
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
5
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
6
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
7
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
8
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
9
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
10
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
11
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
12
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
13
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
14
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
15
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
16
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
17
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
18
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
19
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
20
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

‘खेलो इंडिया’मधून आॅलिम्पिक खेळाडू घडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 00:54 IST

क्रीडामंत्री राज्यवर्धनसिंह राठोड यांच्या दृष्टिकोनातून साकार झालेल्या ‘खेलो इंडिया’ या उपक्रमांतर्गत २0२४ आणि २0२८ मध्ये होणाऱ्या आॅलिम्पिक स्पर्धेसाठी खेळाडू तयार करण्यात येणार आहे. या खेळाडूंच्या मार्गदर्शनासाठी परदेशी प्रशिक्षकांनाही आमंत्रित करण्यात येणार असल्याचे भारतीय क्रीडा प्राधिकरण (साई) केंद्रातर्फे ‘खेलो इंडिया’अंतर्गत तिरंदाजी खेळाचे प्रमुख असणारे व भारताचे माजी हॉकी प्रशिक्षक अजयकुमार बन्सल यांनी सांगितले. औरंगाबाद येथे ‘खेलो इंडिया’ उपक्रमांतर्गत नुकत्याच झालेल्या तिरंदाजी खेळाच्या शिबिरासाठी अजयकुमार बन्सल यांचे साईच्या पश्चिम विभागीय केंद्रात आगमन झाले होते. याप्रसंगी त्यांनी ‘लोकमत’शी विशेष संवाद साधला.

ठळक मुद्देअजयकुमार बन्सल यांना विश्वास : मार्गदर्शनासाठी परदेशी प्रशिक्षक बोलावणार

जयंत कुलकर्णी ।औरंगाबाद : क्रीडामंत्री राज्यवर्धनसिंह राठोड यांच्या दृष्टिकोनातून साकार झालेल्या ‘खेलो इंडिया’ या उपक्रमांतर्गत २0२४ आणि २0२८ मध्ये होणाऱ्या आॅलिम्पिक स्पर्धेसाठी खेळाडू तयार करण्यात येणार आहे. या खेळाडूंच्या मार्गदर्शनासाठी परदेशी प्रशिक्षकांनाही आमंत्रित करण्यात येणार असल्याचे भारतीय क्रीडा प्राधिकरण (साई) केंद्रातर्फे ‘खेलो इंडिया’अंतर्गत तिरंदाजी खेळाचे प्रमुख असणारे व भारताचे माजी हॉकी प्रशिक्षक अजयकुमार बन्सल यांनी सांगितले.औरंगाबाद येथे ‘खेलो इंडिया’ उपक्रमांतर्गत नुकत्याच झालेल्या तिरंदाजी खेळाच्या शिबिरासाठी अजयकुमार बन्सल यांचे साईच्या पश्चिम विभागीय केंद्रात आगमन झाले होते. याप्रसंगी त्यांनी ‘लोकमत’शी विशेष संवाद साधला. ते म्हणाले की, ‘खेलो इंडिया’ या उपक्रमांतर्गत प्रत्येक वर्षी विविध खेळांतील प्रतिभावान अशा एक हजार खेळाडूंची निवड करण्यात येणार आहे. निवड झालेल्या खेळाडूंवर त्यांचा आहार, निवास, प्रशिक्षण, शिक्षण, स्पर्धा आदींसाठी ५ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे आणि खेळाडूंना दत्तक घेण्याची ही प्रक्रिया आठ वर्षे सुरू राहणार आहे. निवड झालेल्या खेळाडूंना २0२४ व २0२८ च्या आॅलिम्पिकसाठी घडवले जाईल. या उपक्रमांमुळे ग्रामीण व शहरातील खेळाडूंवर सुविधांपासून वंचित राहण्याची वेळ येणार नाही, तसेच एक प्रतिभावान खेळाडूंचा चमू मिळणार आहे. याचा फायदा भारताला आॅलिम्पिकसारख्या मोठ्या स्पर्धेसाठी होईल. तसेच दीपिका, अतानुदास यांच्यासारखे अनेक खेळाडू देशाला आॅलिम्पिकसाठी मिळतील आणि पदक जिंकण्याची संधीदेखील वाढेल.’खेळाडूंनी मानसिकदृष्ट्या भक्कम होण्याची गरज : पौर्णिमा माहातोभारतात गुणवत्ता भरपूर आहे; परंतु आॅलिम्पिकसारख्या मोठ्या व्यासपीठावर भारतीय खेळाडूंना आत्मविश्वासाच्या अभावामुळे पदक जिंकण्यात अपयश मिळत असल्याची प्रतिक्रिया प्रतिष्ठित द्रोणाचार्य पुरस्कारप्राप्त पौर्णिमा माहातो यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली. औरंगाबाद येथे ‘खेलो इंडिया’ उपक्रमांतर्गत राष्ट्रीय तिरंदाजी शिबिराच्या निमित्ताने त्या येथे आल्या होत्या. खेलो इंडियांतर्गत तिरंदाजी शिबीर हे २०२४ व २०२८ आॅलिम्पिक लक्षात घेऊन आयोजित करण्यात येत आहे. त्याअंतर्गत खेळाडूंना सुविधा मिळत आहेत. तिरंदाजीत कोरियाकडे चांगल्या दर्जाचे खेळाडू आहेत. त्यानंतर कोरिया, तैपई यांचा क्रमांक लागतो. भारत चौथ्या ते पाचव्या स्थानावर आहे. कामगिरी उंचावण्यासाठी भारतीय संघाला खूप मेहनत करावी लागणार आहे. जागतिक, आॅलिम्पिकसारख्या स्पर्धेसाठी एक महिना एकत्रित नियोजन बद्ध सराव करण्याची आवश्यकता आहे. तसेच आॅलिम्पिकसारख्या स्पर्धेत पदक जिंकण्यासाठी खेळाडूंनी मानसिकदृष्ट्या भक्कम होण्याची नितांत गरज असल्याचे पौर्णिमा माहातो यांनी सांगितले. पौर्णिमा माहातो यांना २०१३ साली द्रोणाचार्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून, त्या भारतीय तिरंदाजी संघाच्या प्रशिक्षिकादेखील आहेत.