शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
3
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
4
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
5
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
6
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
7
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
8
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
9
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
10
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
11
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
12
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
13
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
14
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
15
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
16
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
17
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
18
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
19
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
20
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
Daily Top 2Weekly Top 5

१५ दिवसांत प्लास्टिकमुक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 23:46 IST

शहर हागणदारीमुक्तीनंतर आता प्लास्टिकमुक्तीकडे नेण्यासाठी पालिका प्रशासन कंबर कसणार आहे. आगामी पंधरा दिवसांत शहरातील विक्रेत्यांनी प्लास्टिकचा साठा संपवून टाकावा. त्यानंतर वापर होत असल्यास तो जप्त करून दंडात्मक कारवाईचा इशाराही मुख्याधिकारी रामदास पाटील यांनी दिला.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : शहर हागणदारीमुक्तीनंतर आता प्लास्टिकमुक्तीकडे नेण्यासाठी पालिका प्रशासन कंबर कसणार आहे. आगामी पंधरा दिवसांत शहरातील विक्रेत्यांनी प्लास्टिकचा साठा संपवून टाकावा. त्यानंतर वापर होत असल्यास तो जप्त करून दंडात्मक कारवाईचा इशाराही मुख्याधिकारी रामदास पाटील यांनी दिला.हिंगोली शहरात काही दिवसांपूर्वी प्लास्टिकमुक्तीसाठी प्रयत्न केले जात होते. त्यात अनेक विक्रेते व दुकानदारांवरही कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर विक्रेत्यांनी प्लास्टिकच्या पिशव्या आणने बंद केले होते. शिवाय दुकानदार व व्यापारीही प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये सामान देत नसल्याचे दिसून येत होते. त्यामुळे प्रत्येकजण घरूनच पिशवी घेवून खरेदीसाठी बाहेर पडताना दिसत होता. काही दिवसांनी या मोहिमेकडे हागणदारीमुक्तीमुळे दुर्लक्ष झाले अन् व्यापाºयांनी प्लास्टिकचा मुक्त वापर सुरू केला आहे. त्यामुळे पुन्हा कचºयात प्लास्टिकचे प्रमाण वाढले आहे. शहरातील नाल्याही तुंबत आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा हिंगोलीत प्लास्टिकमुक्तीसाठी पालिकेने पथकांची स्थापना करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. या पथकांमार्फत प्लास्टिक वापराबाबत दुकानांची तपासणी केली जाणार आहे. येत्या पंधरा दिवसांत जुना साठा संपविणे अनिवार्य आहे. त्यानंतर कोणतेही कारण न सांगता प्लास्टिक वापर बंद करावा लागेल. अन्यथा प्लास्टिक जप्त करून संबंधितांना दंडा लावला जाणार आहे. व्यापाºयांनी ही बाब गांभिर्याने घेण्याचे आवाहनही पाटील यांनी केले.