शहरं
Join us  
Trending Stories
1
संरक्षण करारानंतर सौदी अरेबियाची पाकिस्तानला आणखी एक मोठी भेट; ३० लाख लोकांना रोजगार मिळणार
2
‘कोस्टल’वर थेट १४० चा हायस्पीड: ...तर मग गुन्हाच होईल दाखल; वाहतूक पोलिसांकडून दिवसाला ५०० ई-चालानची कारवाई
3
भारतीय नौदलाची ताकद वाढणार! आज अँड्रोथ युद्धनौका मिळणार, जाणून काय आहे खास?
4
Mumbai Accident: दादरमध्ये अपघात, 'बेस्ट बस'ला टेम्पो ट्रॅव्हलरची धडक; एक ठार, चार जखमी
5
'या' माशांना वाचवण्यासाठी बांगलादेशनं उतरवलं सैन्य दल; बंगालच्या खाडीत पाठवल्या १७ युद्धनौका
6
Indian shot dead: "मित्रा, तू बरा आहेस ना?" मदतीसाठी आलेल्या भारतीय व्यक्तीचीच गोळी घालून हत्या
7
VIRAL : 'सर डोकं दुखतंय...', कर्मचारी आजारी तरीही मॅनेजर सुट्टी देईना! संतापलेल्या तरुणानं काय केलं बघाच  
8
FD करुन तुम्ही कधीही श्रीमंत होणार नाही? CA ने दिला इशारा, म्हणाले खऱ्या कमाईसाठी गुंतवणूक धोरण बदला
9
Video - अरे बापरे! ऑर्डर केला iPhone 16; बॉक्स उघडताच...; ऑनलाईन खरेदीत अजब भानगड
10
Tata Capital IPO: प्रतीक्षा संपली! तुमच्या खिशात आहेत का १४,९९६ रुपये? तर बनू शकता टाटांच्या कंपनीचे प्रॉफिट पार्टनर
11
इवलीशी मुंबई झाली महाकाय ! त्या त्या भागानुसार प्रति स्क्वेअर फुटाचा दर काय... पहाल तर...
12
"प्यार मे सौदेबाजी...", अरबाज खान दुसऱ्यांदा बाबा झाल्यानंतर मलायका अरोराची क्रिप्टिक पोस्ट
13
सोनम वांगचुक यांच्या अटकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी, पत्नीने दाखल केली याचिका
14
Kantara Chapter 1: साऊथने पुन्हा एकदा करून दाखवलं! फक्त ४ दिवसांत 'कांतारा'ने कमावले ३०० कोटी
15
पतीच्या मृत्यूनंतर पुन्हा जोडीदाराची इच्छा पडली महागात; मॅट्रिमोनियल साइटवरून शिक्षिकेला कोट्यवधींचा गंडा!
16
Post Office Scheme: दर महिन्याला होईल ₹६१,००० ची कमाई; जबरदस्त आहे ही सरकारी स्कीम, कोट्यधीशही बनवेल
17
Jaipur Hospital Fire: जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
18
Share Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, Nifty २४,९१० च्या वर; सरकारी बँकांच्या शेअर्समध्ये मोठी तेजी
19
Jaipur Hospital Fire: '२० मिनिटांपूर्वी आगीची माहिती दिली, पण डॉक्टर पळून गेले'; SMS रुग्णालयातील प्रत्यक्षदर्शींचा धक्कादायक दावा
20
Video:...तर भारताच्या 'या' खेळाडूला मारायचंय; पाकिस्तानी स्पिनर अबरार अहमदचं विधान चर्चेत

झाड आधी डोक्यात रुजवा, मग जमिनीत : सयाजी शिंदे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2020 20:10 IST

वृक्षमित्र आले एकत्र , मराठवाडा रंगकर्मी गौरव पुरस्काराचे वितरण 

औरंगाबाद : निसर्गाचा ºहास रोखण्यासाठी प्रत्येकाने कमीत कमी पाच तरी झाडे लावली पाहिजे. मात्र, त्याआधी झाड डोक्यात रुजविणे आवश्यक आहे. नंतर ते जमिनीत लावा, असे आवाहन अभिनेता सयाजी शिंदे यांनी येथे केले. त्याच्या आवाहनाला उपस्थित वृक्षमित्रांनी जोरदार प्रतिसाद देऊन  औरंगाबादच्या चारीदिशेला असलेले डोंगर हिरवेगार करण्याचा संकल्प केला. 

प्रसंग होता, मराठवाडा रंगकर्मी गौरव पुरस्कार वितरणाच्या निमित्ताने व सह्याद्री देवराई आयोजित पहिले वृक्ष संमेलनाच्या पार्श्वभूमीवर सयाजी शिंदे शहरात आले होते. ‘आंब्याच्या नावानं चांगभलं, बेलाच्या नावानं चांगभलं... येऊन येऊन येणार कोण ‘झाडा’ शिवाय आहे कोण. एकानंतर एक पिढ्या येऊन जातील, पण आजोबाने लावलेली झाडे नातवांनाही आॅक्सिजन पुरवतील. झाड कधीच राजीनामा देत नाही, दिला तर परत घेत नाही’ असे म्हणत त्यांनी उपस्थित वृक्षमित्रांशी संवाद साधला. झाडांचा विषय सुरू असताना सयाजी शिंदे यांची मुलाखत घेणारे लेखक अरविंद जगताप म्हणाले की, सर्वत्र गुलमोहराची झाडेच आपणास दिसून येतात. या गुलमोहरावर अनेक  कवींनी कविता रचल्या. या गुलमोहराने फक्त कवींची सोय लावली. सरकारने जाहीर करावे की, कविता लिहिण्यासाठीच ‘गुलमोहरा’चे  झाड आहे. (हास्य). या झाडाचे वैशिष्ट्य काय, असा प्रश्न त्यांनी विचारला. तेव्हा हसत सयाजी म्हणाले की, अनेक वैशिष्ट्यांपैकी एक या झाडाखाली कुत्रंही बसत नाही (हास्य), या झाडावर पक्षीही बसत नाहीत (हास्य).  देशात अनेक ठिकाणी गाड्यांचे अपघात झाले ते याच वृक्षाला आदळून (हास्य). कवींमुळे  गुलमोहर झाडाला अमाप प्रसिद्धी मिळाली. मात्र, हे झाड पर्यावरणासाठी दुश्मन आहे. त्यापेक्षा आंबा, वड, बेलाची झाडे लावा, असा सल्लाही त्यांनी दिला.

‘सात ताऱ्यांमध्ये जे गाव आहे ते सातारा’ असा उल्लेख करीत त्यांनी शहरालगतचे सातारा गावातील डोंगराला हिरवेगार करण्याचे आवाहन केले आणि कृषिमित्रांनी प्रतिसाद देऊन संकल्प सोडला. संजय वनवे स्मृतिसंध्यानिमित्त रंगकर्मी मित्र पुरस्कार प्रवीण पाटेवार, ज्येष्ठ रंगकर्मी मित्र पुरस्कार मदन मिमरोट, रंगकर्मी कैलास टापरे यांना देण्यात आला. तसेच वृक्षमित्रांचा सत्कारही करण्यात आला. सूत्रसंचालन प्रेषित रुद्रवार यांनी केले. तत्पूर्वी गायक डॉ.गणेश चंदनशिवे यांनी ‘औरंगाबाद शहराची महती’ सांगणारे गीत सादर करून सर्वांची वाहवा मिळविली. कार्यक्रमाला मिळालेल्या प्रतिसादाने पुढील वर्षीही कार्यक्रम घेण्याचे आयोजक रमाकांत भालेराव यांनी जाहीर केले. 

पतीने लावलेल्या वडाच्या झाडालाच पत्नीने फेऱ्या माराव्यासयाजी शिंदे म्हणाले की, वटपौर्णिमेला महिला आपल्याला हाच नवरा जन्मोजन्मी मिळावा यासाठी वडाच्या झाडाला फेऱ्या मारतात. यात काहीच वाईट नाही, ही संस्कृती आहे. मात्र, प्रत्येक पत्नीने ठरविले पाहिजे की, माझ्या पतीने लावलेल्या वडाच्या झाडालाच मी फेरे मारले. बघा वडांच्या झाडांची संख्या वाढेल. या संकल्पनेचे सर्वांनी टाळ्या वाजवून स्वागत केले. 

टॅग्स :sayaji shindeसयाजी शिंदेNatureनिसर्गAurangabadऔरंगाबाद