शहरं
Join us  
Trending Stories
1
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
2
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
3
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
4
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
5
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
6
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
7
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
8
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
9
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
10
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
11
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
12
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
13
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
14
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
15
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
16
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
17
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
18
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
19
Thane Fire: ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
20
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
Daily Top 2Weekly Top 5

झाड आधी डोक्यात रुजवा, मग जमिनीत : सयाजी शिंदे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2020 20:10 IST

वृक्षमित्र आले एकत्र , मराठवाडा रंगकर्मी गौरव पुरस्काराचे वितरण 

औरंगाबाद : निसर्गाचा ºहास रोखण्यासाठी प्रत्येकाने कमीत कमी पाच तरी झाडे लावली पाहिजे. मात्र, त्याआधी झाड डोक्यात रुजविणे आवश्यक आहे. नंतर ते जमिनीत लावा, असे आवाहन अभिनेता सयाजी शिंदे यांनी येथे केले. त्याच्या आवाहनाला उपस्थित वृक्षमित्रांनी जोरदार प्रतिसाद देऊन  औरंगाबादच्या चारीदिशेला असलेले डोंगर हिरवेगार करण्याचा संकल्प केला. 

प्रसंग होता, मराठवाडा रंगकर्मी गौरव पुरस्कार वितरणाच्या निमित्ताने व सह्याद्री देवराई आयोजित पहिले वृक्ष संमेलनाच्या पार्श्वभूमीवर सयाजी शिंदे शहरात आले होते. ‘आंब्याच्या नावानं चांगभलं, बेलाच्या नावानं चांगभलं... येऊन येऊन येणार कोण ‘झाडा’ शिवाय आहे कोण. एकानंतर एक पिढ्या येऊन जातील, पण आजोबाने लावलेली झाडे नातवांनाही आॅक्सिजन पुरवतील. झाड कधीच राजीनामा देत नाही, दिला तर परत घेत नाही’ असे म्हणत त्यांनी उपस्थित वृक्षमित्रांशी संवाद साधला. झाडांचा विषय सुरू असताना सयाजी शिंदे यांची मुलाखत घेणारे लेखक अरविंद जगताप म्हणाले की, सर्वत्र गुलमोहराची झाडेच आपणास दिसून येतात. या गुलमोहरावर अनेक  कवींनी कविता रचल्या. या गुलमोहराने फक्त कवींची सोय लावली. सरकारने जाहीर करावे की, कविता लिहिण्यासाठीच ‘गुलमोहरा’चे  झाड आहे. (हास्य). या झाडाचे वैशिष्ट्य काय, असा प्रश्न त्यांनी विचारला. तेव्हा हसत सयाजी म्हणाले की, अनेक वैशिष्ट्यांपैकी एक या झाडाखाली कुत्रंही बसत नाही (हास्य), या झाडावर पक्षीही बसत नाहीत (हास्य).  देशात अनेक ठिकाणी गाड्यांचे अपघात झाले ते याच वृक्षाला आदळून (हास्य). कवींमुळे  गुलमोहर झाडाला अमाप प्रसिद्धी मिळाली. मात्र, हे झाड पर्यावरणासाठी दुश्मन आहे. त्यापेक्षा आंबा, वड, बेलाची झाडे लावा, असा सल्लाही त्यांनी दिला.

‘सात ताऱ्यांमध्ये जे गाव आहे ते सातारा’ असा उल्लेख करीत त्यांनी शहरालगतचे सातारा गावातील डोंगराला हिरवेगार करण्याचे आवाहन केले आणि कृषिमित्रांनी प्रतिसाद देऊन संकल्प सोडला. संजय वनवे स्मृतिसंध्यानिमित्त रंगकर्मी मित्र पुरस्कार प्रवीण पाटेवार, ज्येष्ठ रंगकर्मी मित्र पुरस्कार मदन मिमरोट, रंगकर्मी कैलास टापरे यांना देण्यात आला. तसेच वृक्षमित्रांचा सत्कारही करण्यात आला. सूत्रसंचालन प्रेषित रुद्रवार यांनी केले. तत्पूर्वी गायक डॉ.गणेश चंदनशिवे यांनी ‘औरंगाबाद शहराची महती’ सांगणारे गीत सादर करून सर्वांची वाहवा मिळविली. कार्यक्रमाला मिळालेल्या प्रतिसादाने पुढील वर्षीही कार्यक्रम घेण्याचे आयोजक रमाकांत भालेराव यांनी जाहीर केले. 

पतीने लावलेल्या वडाच्या झाडालाच पत्नीने फेऱ्या माराव्यासयाजी शिंदे म्हणाले की, वटपौर्णिमेला महिला आपल्याला हाच नवरा जन्मोजन्मी मिळावा यासाठी वडाच्या झाडाला फेऱ्या मारतात. यात काहीच वाईट नाही, ही संस्कृती आहे. मात्र, प्रत्येक पत्नीने ठरविले पाहिजे की, माझ्या पतीने लावलेल्या वडाच्या झाडालाच मी फेरे मारले. बघा वडांच्या झाडांची संख्या वाढेल. या संकल्पनेचे सर्वांनी टाळ्या वाजवून स्वागत केले. 

टॅग्स :sayaji shindeसयाजी शिंदेNatureनिसर्गAurangabadऔरंगाबाद