शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

गाव पाहणी न करताच बनताहेत आराखडे

By admin | Updated: March 29, 2016 00:49 IST

बीड : जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत निवड झालेल्या गावांमध्ये तालुकास्तरीय समितीने गावात मुक्काम करून ग्रामस्थांशी चर्चा करून ते सांगतील

बीड : जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत निवड झालेल्या गावांमध्ये तालुकास्तरीय समितीने गावात मुक्काम करून ग्रामस्थांशी चर्चा करून ते सांगतील त्याच कामांना प्राधान्य देणे बंधनकारक आहे; मात्र तालुकास्तरीय समिती जिल्ह्याच्या ठिकाणी बसूनच गावाच्या विकास आराखडे बनवीत असल्याने जलयुक्त योजनेच्या कामांना घरघर लागण्याची शक्यता जिल्ह्यात निर्माण झाली आहे.पूर्वी अधिकाऱ्यांना वाटतील तीच कामे गावांमध्ये राबविली जात होती. मात्र, जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत कामाच्या या पद्धतीत बदल केला आहे. तालुकास्तरावर एक समिती नेमली आहे. या समितीने जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत निवडलेल्या गावांमध्ये जाऊन एक दिवस मुक्काम करायचा, तेथील ग्रामस्थांशी चर्चा करायची, निवडलेल्या गावात कुठली कामे महत्त्वाची आहेत, असे ग्रामस्थांना वाटते, हे जाणून घ्यायचे व त्याप्रमाणे तेथील कामांचा कृती आराखडा बनवायचा, ही पद्धत जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत लागू केली आहे. मात्र, या नियमाला तिलांजली दिली जात आहे. अधिकारी गावात मुक्काम न करता तालुका अथवा जिल्ह्याच्या ठिकाणी बसूनच गावात कुठली कामे करायची, याचा आराखडा बनवीत असल्याने जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजना संबंधित गावासाठी किती उपयुक्त ठरतील, याबाबत शंका निर्माण होत आहे. (प्रतिनिधी)