शहरं
Join us  
Trending Stories
1
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी
2
आपली मुलगी राजकारणात येणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले, म्हणाले...
3
लडाखमधील आंदोलनाला हिंसक वळण, जाळपोळ, लेहमध्ये ४ जणांचा मृत्यू, ७० जण जखमी 
4
हलगर्जीपणाचा कळस! सरकारी रुग्णालयात दुसऱ्याच पायाची सर्जरी, ऑक्सिजन मास्क काढला अन्...
5
"फायनलमध्ये बघून घेऊ’’, दोन वेळा मार खाल्यानंतर शाहीन शाह आफ्रिदीचं भारताला आव्हान    
6
जीएसटीमुळे वाहनांच्या किंमतीच नाही, RTO Tax देखील कमी झाला; तिहेरी फायदा कोणालाच कळला नाही...
7
समृद्धी महामार्गावर दुहेरी उत्पन्नाचा स्रोत; सौरऊर्जा निर्मिती करणारा देशातील पहिला 'एक्सप्रेसवे' !
8
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?
9
आयटी-मेटलसह 'या' क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी पडझड; गुंतवणूकदारांचे ३ लाख कोटी रुपये बुडाले
10
समस्या संपतील, स्वामी कायम सोबत असतील; ९ गुरुवार व्रताने बदल नक्की दिसतील, अशक्य शक्य होईल!
11
Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी U19 तील नवा सिक्सर किंग! सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड
12
VIDEO: भारतीय संघाची जर्सी घालून पाकिस्तानच्या गल्लीबोळात फिरला तरूण, पुढे काय घडलं?
13
लडाखच्या पूर्ण राज्याच्या दर्जासाठी लेह पेटले; सोनम वांगचूक म्हणाले, हा तरुणांचा राग होता, GenZ क्रांती...
14
नोकरी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! नवीन वर्षाच्या 'या' महिन्यापासून ATM मधून काढता येणार PF चे पैसे
15
Smartphones: १०,००० रुपयांपेक्षा कमी किमतीत ५० मेगापिक्सेलचा कॅमेरा; जाणून घ्या 'या' ७ स्मार्टफोनबद्दल!
16
अतिवृष्टी, पुराचा रेल्वे गाड्यांनाही फटका; पावसामुळे रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल
17
नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी 'गरबा'त विघ्न; नियमाचे पालन की 'मॉरल पोलिसिंग'? नागपूरमध्ये वाद का उफाळला?
18
उद्धव ठाकरेंचा दौरा ठरला; पुराचा फटका बसलेल्या 'या' पाच जिल्ह्यांत करणार पाहणी
19
डिलिव्हरी बॉय जेवण देण्यासाठी आला अन् समोर भिकारी; पेमेंटसाठी फोन काढताच बसला धक्का
20
17 मुलींची छेडछाड केल्याचा आरोप, स्वामी चैतन्यानंद सरस्वती फरार; खोट्या नंबर प्लेटसह व्हॉल्वो जप्त; कुणी केली तक्रार?

नगरपरिषदेमुळे होणार नियोजनबद्ध विकास

By admin | Updated: August 29, 2014 01:32 IST

औरंगाबाद : नगर परिषदेच्या स्थापनेमुळे सातारा आणि देवळाई परिसराचा नियोजनबद्ध विकास होणार आहे. केंद्र सरकारच्या विविध योजनांतर्गत रस्ते, पाणीपुरवठा योजना,

नगरपरिषदेमुळे होणार नियोजनबद्ध विकासऔरंगाबाद : नगर परिषदेच्या स्थापनेमुळे सातारा आणि देवळाई परिसराचा नियोजनबद्ध विकास होणार आहे. केंद्र सरकारच्या विविध योजनांतर्गत रस्ते, पाणीपुरवठा योजना, ड्रेनेज यासारख्या पायाभूत सुविधांसाठी नगर परिषदेला भरघोस अनुदान मिळू शकणार आहे. तसेच नगर परिषदेला पुरेसा कर्मचारी वर्गही मिळणार आहे.ग्रामपंचायतींना विकासकामांसाठी सरकारकडून अत्यल्प निधी मिळत असतो. मात्र, आता नगर परिषदेच्या स्थापनेमुळे अनुदानात मोठी वाढ होणार आहे. केंद्र सरकारच्या विविध योजनांतर्गत नगर परिषदांना दरवर्षी लाखो रुपयांचा निधी मिळतो. सध्या ग्रामपंचायतीत मोजकाच कर्मचारी वर्ग आहे. नगर परिषदेमुळे आता या ठिकाणी पुरेसा कर्मचारी वर्ग लाभणार असून, त्यांचे पगार हे राज्य सरकारकडून होतील. नगर परिषदेत पाणीपुरवठा, बांधकाम आणि नियोजन, अशा तीन विभागांसाठी तीन अभियंतेही असणार आहेत. विकास आराखडा बनेलसातारा आणि देवळाई गावांच्या हद्दीत सध्या वेगाने बांधकामे होत आहेत; पण या भागासाठी अद्याप विकास आराखडा अस्तित्वात आलेला नाही. मध्यंतरी सरकारने सातारा- देवळाईसह २८ गावांच्या विकास आराखड्याचे काम सिडकोला दिले होते. सिडकोने हा आराखडा तयार केला असला तरी त्याला मंजुरी मिळालेली नाही. नगर परिषद अस्तिवात आल्यानंतर पहिल्यांदा नगर परिषद हद्दीचा विकास आराखडा तयार होईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. ‘ब’ वर्गाची नगर परिषद असेलसातारा-देवळाई ही ‘ब’ वर्ग प्रकारातील नगर परिषद असणार आहे. सातारा देवळाई संयुक्त नगर परिषदेची लोकसंख्या ५१ हजार इतकी आहे. जिल्ह्यातील ६ नगर परिषदांपैकी केवळ सिल्लोड ही ‘ब’ वर्ग नगर परिषद आहे. उर्वरित पाचही नगर परिषदा या ‘क’ वर्गातील आहेत. सातारा-देवळाई नगर परिषदेमुळे जिल्ह्यातील नगर परिषदांची संख्या ७ झाली आहे.औरंगाबाद : नगर परिषद स्थापनेच्या निर्णयाची माहिती मिळताच सातारा आणि देवळाई परिसरात आनंदोत्सव साजरा झाला. नागरिकांनी ठिकठिकाणी एकत्र येऊन फटाके वाजविले. सातारा गावात ढोल-ताशांसह मिरवणूकही काढण्यात आली. ४सातारा आणि देवळाई भागात सायंकाळीच संयुक्त नगर परिषद स्थापनेची माहिती येऊन धडकली. त्यानंतर या भागात एकच जल्लोष झाला. सातारा गावात मुख्तार पटेल यांनी जोरदार मिरवणूक काढली. गुलालाची उधळण करीत ढोल-ताशांच्या गजरात ही मिरवणूक निघाली. यामध्ये गावातील तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले. नगर परिषदेमुळे सातारा आणि देवळाईचा चांगल्या पद्धतीने विकास होईल. सातारा-देवळाई भागात पाण्याचा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. हा प्रश्न आता नक्कीच सुटेल. नगर परिषदेसाठी सतत पाठपुरावा केला. त्याला आज यश मिळाले. त्यामुळे शासनाचे आभार. फेरोज पटेल, माजी सरपंच, सातारासातारा- देवळाई नगर परिषद एकत्र व्हावी म्हणून मुंबई मंत्रालयात खेट्या मारल्या. शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा, पालकमंत्री बाळासाहेब थोरात, वनमंत्री पतंगराव कदम, दुग्ध व्यवसाय व पशुसंवर्धनमंत्री अब्दुल सत्तार, आ. कल्याण काळे, आ. सुभाष झांबड आदींच्या प्रयत्नांमुळे ग्रामविकास व नगरविकास मंत्रालय आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या सकारात्मक भूमिकेने जनतेला न्याय मिळाला. -सरपंच करीम पटेल, देवळाई