शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
बांगलादेश भारताकडून ५०,००० टन तांदूळ खरेदी करणार; दोन्ही देशांचे संबंध सुधारण्यासाठी युनूस सरकारचे प्रयत्न
3
३० वर्षांचा संसार, क्षणाचा राग अन् होत्याचं नव्हतं झालं; संशयी पतीने पत्नीला क्रूरपणे संपवलं
4
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
6
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
7
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
8
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
9
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
10
बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या! तुम्हाला गरिबांची काळजी नाही; हायकोर्टाचे फटकारे   
11
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
12
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
13
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
14
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
15
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
16
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
17
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
18
बांगलादेशात हिंदूची हत्या; दिल्ली, कोलकाता पेटले   
19
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
20
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
Daily Top 2Weekly Top 5

पाण्यासाठी ग्रामस्थांचे हाल

By admin | Updated: April 19, 2015 00:47 IST

जेवळी : लोहारा तालुक्यातील आष्टाकासार येथील दोन डीपीचा वीज पुरवठा मागील पाच दिवसांपासून बंद पडल्याने गावात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली असून

जेवळी : लोहारा तालुक्यातील आष्टाकासार येथील दोन डीपीचा वीज पुरवठा मागील पाच दिवसांपासून बंद पडल्याने गावात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली असून, नागरिकांना जीव धोक्यात घालून पाणी आणावे लागत आहे.सात हजारांपेक्षा जास्त लोकसंख्या असणाऱ्या आष्टाकासार या गावातील नागरिकांना मागील दोन महिन्यांपासून तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. घागरभर पाण्यासाठी नागरिकांना रात्रीचा दिवस करावा लागत आहे. आठ दिवसांपासून या परिसरात वादळी वारे व हलका पाऊस पडत आहे. त्या दिवसांपासून या गावचा वीज पुरवठा वारंवार खंडित होत आहे. या गावाला येणेगूर उपकेंद्रावरुन वीजपुरवठा होत आहे. ग्रामपंचायत कार्यालयाजवळील एक व दर्गाहजवळील एक अशा दोन डिपीचा वीज पुरवठा मागील पाच दिवसांपासून खंडित आहे. यासंदर्भात संबंधित अभियंता व कर्मचाऱ्यांना सांगूनही त्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याने नागरिकांना याचा मात्र नाहक त्रास सहन करावा लागत आहे. गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या जलस्वराज्य प्रकल्पाची विहीरही हंगरगा येथील साठवण तलावात आहे. तेथील थोडेफार पाणी गावातील ग्रामपंचायत जवळील एका विहिरीत आणून सोडले जाते. ते पाणी व अधिग्रहण बोअरवरील पाण्यावर गावाची तहान भागविली जात आहे. मात्र वीज मंडळाच्या हलगर्जी व मनमानी कारभारामुळे येथील नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत असल्याचे उपसरपंच गंगाधर बलसुरे, गणेश शिदोरे, सुनिल सुलतानपुरे यांनी केली आहे. वीज मंडळाच्या कारभाराची तक्रार आ. ज्ञानराज चौगुले यांच्याकडेही करण्यात आली आहे. तरीही यासंदर्भात अजून कार्यवाही झालेली नसल्याचे ग्रा.पं. सदस्य सुनील सुलतानपुरे यांनी सांगितले. (वार्ताहर)