शहरं
Join us  
Trending Stories
1
Rajnath Singh : 'ऑपरेशन सिंदूर' आणि हनुमान यांचा काय संबंध? राजनाथ सिंह यांनी सांगितला श्लोकाचा खरा अर्थ
2
'ऑपरेशन सिंदूर'च्या रात्री १०.३० वाजता अखेरचं बोलणं, पहाटे ३ वाजता पुन्हा कॉल, पण...
3
प्रचंड गुप्तता, २ दिवसांपूर्वी अधिकारी क्वारंटाईन; 'ऑपरेशन सिंदूर'ची 'अशी' केली तयारी
4
“संधी मिळाली तर पाकचा खात्मा करून टाकेन”; कर्नल सोफिया कुरेशींच्या वडिलांची प्रतिक्रिया
5
पाकिस्तानच्या सुरक्षा सल्लागारांनी अजित डोवाल यांना फोन केला? तुर्की मीडियाचा दावा
6
“पाकिस्तानला कमी लेखता कामा नये, २४ तासांत कारवाई करायला हवी होती”: संजय राऊत
7
सेटवर पोलीस आले अन् अभिनेत्याला घेऊन गेले; गर्लफ्रेंडने केले गंभीर आरोप, नेमकं प्रकरण काय?
8
पाकिस्तानी कुरापती! गुजरात बॉर्डरवर आढळले संशयास्पद ड्रोन; विजेच्या तारांना धडकताच स्फोट
9
अंगावरचे कपडे फाडले, बेदम मारहाण; 'यु ट्युबर'वर रेल्वेतील पॅन्ट्री कर्मचाऱ्यांचा हल्ला, कारण...
10
PNB Share Price: १०० रुपयांपेक्षा स्वस्त मिळतोय 'हा' बँकिंग स्टॉक, मोठ्या डिस्काऊंटवर खरेदी करण्याची संधी; बँकेचा नफाही वाढला 
11
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पुढे काय? आजच्या सर्वपक्षीय बैठकीत ठरणार मोठी रणनीती!
12
"माझ्या बाबांनी आधीच भविष्यवाणी केली होती"; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर मराठी अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत
13
टेलिकॉम क्षेत्रात पुन्हा जिओची बाजी! 'या' बाबतीत ठरले अव्वल; व्हीआय-BSNL जवळपासही नाही
14
बिळातून बाहेर पडले, पाकिस्तानी सैन्य अधिकारी उघडपणे दहशतवाद्यांसोबत दिसले; हा घ्या पुरावा
15
Lahore Blast: पाकिस्तानमध्ये अचानक सायरन वाजला! विमानतळाजवळ तीन मोठे स्फोट, लाहोरमध्ये घबराट
16
Astro Tips: रोज घराबाहेर पडताना लावलेली 'ही' छोटीशी सवय देईल दीर्घकाळ सकारात्मक परिणाम!
17
ATM मध्ये व्यवहारापूर्वी दोनदा 'Cancel' बटण दाबलं तर पिन चोरी थांबवू शकता का? पाहा दाव्यामागील सत्य
18
बँकांमध्ये तुमचे पैसे किती सुरक्षित? जर बँक बुडाली तर तुम्हाला पैसे परत मिळतात का?
19
कुख्यात आतंकवादी हाफिज सईदचं तळच उडवलं! मिसाईल स्ट्राईकने मुरिदकेत हाहाकार; पाहा व्हिडीओ
20
द्वेषाचं बीज उखडून फेकणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी यांचा पगार किती? कुठून घेतलं शिक्षण? काय मिळतात सुविधा?

पाण्यासाठी ग्रामस्थांचे हाल

By admin | Updated: April 19, 2015 00:47 IST

जेवळी : लोहारा तालुक्यातील आष्टाकासार येथील दोन डीपीचा वीज पुरवठा मागील पाच दिवसांपासून बंद पडल्याने गावात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली असून

जेवळी : लोहारा तालुक्यातील आष्टाकासार येथील दोन डीपीचा वीज पुरवठा मागील पाच दिवसांपासून बंद पडल्याने गावात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली असून, नागरिकांना जीव धोक्यात घालून पाणी आणावे लागत आहे.सात हजारांपेक्षा जास्त लोकसंख्या असणाऱ्या आष्टाकासार या गावातील नागरिकांना मागील दोन महिन्यांपासून तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. घागरभर पाण्यासाठी नागरिकांना रात्रीचा दिवस करावा लागत आहे. आठ दिवसांपासून या परिसरात वादळी वारे व हलका पाऊस पडत आहे. त्या दिवसांपासून या गावचा वीज पुरवठा वारंवार खंडित होत आहे. या गावाला येणेगूर उपकेंद्रावरुन वीजपुरवठा होत आहे. ग्रामपंचायत कार्यालयाजवळील एक व दर्गाहजवळील एक अशा दोन डिपीचा वीज पुरवठा मागील पाच दिवसांपासून खंडित आहे. यासंदर्भात संबंधित अभियंता व कर्मचाऱ्यांना सांगूनही त्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याने नागरिकांना याचा मात्र नाहक त्रास सहन करावा लागत आहे. गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या जलस्वराज्य प्रकल्पाची विहीरही हंगरगा येथील साठवण तलावात आहे. तेथील थोडेफार पाणी गावातील ग्रामपंचायत जवळील एका विहिरीत आणून सोडले जाते. ते पाणी व अधिग्रहण बोअरवरील पाण्यावर गावाची तहान भागविली जात आहे. मात्र वीज मंडळाच्या हलगर्जी व मनमानी कारभारामुळे येथील नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत असल्याचे उपसरपंच गंगाधर बलसुरे, गणेश शिदोरे, सुनिल सुलतानपुरे यांनी केली आहे. वीज मंडळाच्या कारभाराची तक्रार आ. ज्ञानराज चौगुले यांच्याकडेही करण्यात आली आहे. तरीही यासंदर्भात अजून कार्यवाही झालेली नसल्याचे ग्रा.पं. सदस्य सुनील सुलतानपुरे यांनी सांगितले. (वार्ताहर)