शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

पाइप गायब; नगरसेवकही अनभिज्ञ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2017 00:01 IST

औरंगाबाद युटिलिटी कंपनीने खरेदी केलेले १२ कोटी रुपयांचे पाइप गायब झाले असून, महापालिका प्रशासनाने गायब झालेल्या पाइपच्या व्यासाप्रमाणे अनेक वॉर्डांमध्ये जलवाहिन्या टाकण्यासाठी निविदा काढल्याचा धक्कादायक प्रकार ‘लोकमत’ने उघडकीस आणला. या प्रकरणात अनेक नगरसेवकही पाइप गेले कुठे, असा प्रश्न उपस्थित करीत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : औरंगाबाद युटिलिटी कंपनीने खरेदी केलेले १२ कोटी रुपयांचे पाइप गायब झाले असून, महापालिका प्रशासनाने गायब झालेल्या पाइपच्या व्यासाप्रमाणे अनेक वॉर्डांमध्ये जलवाहिन्या टाकण्यासाठी निविदा काढल्याचा धक्कादायक प्रकार ‘लोकमत’ने उघडकीस आणला. या प्रकरणात अनेक नगरसेवकही पाइप गेले कुठे, असा प्रश्न उपस्थित करीत आहेत. ११४ नगरसेवकांना पाइप वाटप केल्याचे पुरावे मनपा प्रशासनाकडून सादर करण्यात येत आहेत.मागील वर्षी औरंगाबाद युटिलिटी कंपनीने तब्बल ३० कोटी रुपयांचे पाइप खरेदी केले होते. त्यातील ५ किलोमीटरचे पाइप जायकवाडी येथे टाकण्यात आले. १ आॅक्टोबरला कंपनीची हकालपट्टी झाल्याने समांतरचे काम अर्धवट पडले आहे. त्यापूर्वी कंपनीने शहरातील विविध वसाहतींमध्ये नवीन जलवाहिन्या टाकण्यासाठी पाइपची मोठ्या प्रमाणात खरेदी केली होती. १००, १५० आणि २०० मि. मी. व्यासाच्या जलवाहिन्या अनेक नगरसेवकांनी आपल्या वॉर्डांत आणून ठेवल्या होत्या. त्याचा वापर कुठेच करण्यात आला नव्हता. अवघ्या एक वर्षातच या जलवाहिन्या गायब झाल्याचा खळबळजनक प्रकार ‘लोकमत’ने उघडकीस आणला. तब्बल १२ कोटी रुपयांचे पाइप गायब झाले आहेत. नगरसेवकांनी आणून ठेवलेले पाइप गायब झाले असतानाच महापालिका प्रशासनाने काही ठरावीक नगरसेवकांच्या वॉर्डात नवीन जलवाहिन्या टाकण्यासाठी निविदा प्रसिद्ध केल्या आहेत. मजेशीर बाब म्हणजे या (पान २ वर)नगरसेवक राजू शिंदे यांनी या प्रकरणाची सखोल चौकशीची मागणी केली आहे. कोट्यवधी रुपयांचे पाइप कसे काय गायब होऊ शकतात. कंपनीने पाइप वाटप केले. कंपनी निघून गेल्यावर महापालिकेने हे पाइप आपल्या ताब्यात का घेतले नाहीत. सर्वसाधारण सभेत यावर सखोल चौकशीची मागणी करण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले.