शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने युद्धविरामासाठी विनवणी केली; भारतीय शिष्टमंडळाने सांगितला 'त्या' दिवसाचा घटनाक्रम
2
कोण आहे २२ वर्षीय शर्मिष्ठा पनोली?; जिच्या अटकेमुळे भारतात सुरू झाला नवा वाद
3
VIDEO : "ए मंत्रीजी जोर से ताली बजा दो...!"; व्यासपीठावर जेपी नड्डा यांच्यासमोर वेगळ्याच अंदाजात दिसल्या वसुंधरा राजे 
4
शेतीच्या वादातून जन्मदात्या आईचा खून; मुलासह सून, व्याही पोलिसांच्या जाळ्यात अडकले
5
काही गोष्टी मनात ठेवायच्या...'त्या' वादग्रस्त विधानावर अजित पवारांनी कोकाटेंचे कान टोचले
6
पाण्याच्या टाकीवर चढून बैलाने घातला शोलेस्टाईल धिंगाणा, सहा तासांनंतर झाली सुटका
7
IPL 2025: यंदा आयपीएल कोण जिंकणार? डेव्हिड वॉर्नरची मोठी भविष्यवाणी
8
भारताच्या स्वातंत्र्यानंतर ६५९ दिवसांनी भोपाळमध्ये फडकला तिरंगा; १ जूनचा इतिहास जाणून घ्या
9
तो कोणाच्या संपर्कात होता, काय चॅटिंग केले ? नीलेश चव्हाणकडे सापडले नेपाळचे सीमकार्ड 
10
"२०२६ मध्ये ममता बॅनर्जी सरकार कायमचं उखडून टाकू..."; अमित शाह यांनी दिलं चॅलेंज
11
विद्यार्थी आंदोलन चिरडण्यासाठी स्वत:च देत होत्या चिथावणी, बांगलादेशच्या कोर्टात शेख हसिनांवर गंभीर आरोप
12
आठवा वेतन आयोग लागू होण्यास होऊ शकतो उशीर, जानेवारी 2026 पासून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांचं काय होणार? आली नवी अपडेट
13
...तर पाकिस्तानसोबतच चीनचीही हवा निघणार! रशियानं भारताला दिली Su-57E ची जबरदस्त ऑफर, काय आहे याची 'खासियत'?
14
Coronavirus: हळूहळू पाय पसरतोय कोरोना! देशात सक्रीय रुग्णसंख्या ३७५८; राज्याची आकडेवारी वाचा
15
CNG-PNG वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! नैसर्गिक वायूच्या दरात मोठी कपात, 'इतके' रुपये वाचणार!
16
सिद्धार्थच्या आईचा नवा व्यवसाय, सीमा चांदेकर यांनी पुण्यात सुरू केलं स्वत:चं दुकान
17
अजितदादा-महेशदादा यांच्यातील खडाखडीमुळे महापालिका निवडणुकीत रंगणार दोस्तीत कुस्ती
18
मुंबई आणि पंजाबमधील लढत पावसामुळे रद्द झाल्यास फायनलमध्ये कोण जाणार? असं आहे समीकरण

गुलाबी थंडीची चाहूल

By admin | Updated: November 16, 2015 00:41 IST

औरंगाबाद : दिवाळी सण संपताच गुलाबी थंडीची चाहूल लागली आहे. पाच दिवसांपासून तापमानात तीन अंशांनी घट झाली आहे. आॅक्टोबर हिटमुळे

औरंगाबाद : दिवाळी सण संपताच गुलाबी थंडीची चाहूल लागली आहे. पाच दिवसांपासून तापमानात तीन अंशांनी घट झाली आहे. आॅक्टोबर हिटमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना तापमान कमी झाल्यामुळे दिलासा मिळत आहे. थंडीमुळे कपाटात ठेवलेले ऊबदार कपडे बाहेर काढले जात आहेत. स्वेटर, कानटोपीच्या खरेदीसाठी बाजारात गर्दी होत आहे.गेली दोन वर्षे दिवाळीत थंडीचा अनुभव न आल्याने कुडकुडणाऱ्या थंडीत अभ्यंगस्नानाचा आनंद घेता आला नाही. यंदा दिवाळीत सुरुवातीलाच गुलाबी थंडीला सुरुवात झाल्याचा अनुभव आला. शहरातील तापमान दोन-तीन अंशांनी खाली आले असून थंडीची चाहूल लागली आहे. आगामी काही दिवसांत तापमानाचा पारा आणखी खाली जाणार असून यंदा कडाक्याची थंडी पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. थंडीला सुरुवात झाल्यामुळे स्वेटर, कानटोप्या, मफलर यांची बाजारपेठ फुलत आहे. त्यांची खरेदी करण्यासाठी नागरिकांची पावले दुकाने आणि बाजारपेठांकडे वळत आहेत. हिवाळा म्हटले की या कालावधीत आरोग्याकडे सर्वांधिक जास्त लक्ष दिले जाते. आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी व्यायामाकडे लक्ष दिले जाते. त्यामुळे युवा वर्गाची पावले व्यायामशाळेकडे वळत आहेत. बाजारात खारीक, खोबरा, काजू, किसमिस, बदाम आदींची खरेदी वाढत आहे.