शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
3
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
4
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
5
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
6
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
7
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
8
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
9
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
10
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
11
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
12
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख
13
Stock Market Today: १७८ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकमध्ये जोरदार तेजी, FMGC आपटले
14
नियंत्रण कक्षात आला एक फोन कॉल; अवघ्या १२ मिनिटांत पोलिस पोहचले अन् मिळालं जीवदान
15
टॅरिफवर ट्रम्प यांचा आणखी एक यु-टर्न; आता 'या'वरील आयात शुल्क कमी करण्याची घोषणा
16
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
17
Akshaya Tritiya 2025: सोन्याची किंमत पाहून फुटतोय घाम? 'हा' आहे २४ कॅरेट सोनं स्वस्तात खरेदी करायचा जुगाड
18
भरत जाधवचं 'सही रे सही' नाटक कधी निरोप घेणार? केदार शिंदे म्हणाले, "ज्या दिवशी तो..."
19
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
20
शाहरुख, सलमान की आमिर- कोणासोबत काम करायला जास्त आवडतं?; परेश रावल म्हणाले...

‘ आपल्याच जवानांचं रक्त असेल तळपायांना लागलेलं’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2019 00:30 IST

कविवर्य कुुसुमाग्रजांच्या जयंतीनिमित्त कविता दिनी मराठवाडा साहित्य परिषदेने आज सायंकाळी आयोजित केलेल्या कविसंमेलनात प्रेमकवितांचा अधिक सोस न बाळगता कवींनी धीरगंभीर कविता सादर केल्या. अगदी शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवर भाष्य करण्यापासून तर सध्याच्या सत्तेच्या राजकारणावर भाष्य करणाऱ्या कवितांनी मनाचा ठाव घेतला.

ठळक मुद्देकविता दिन : मसापचे धीरगंभीर कविसंमेलन

औरंगाबाद : कविवर्य कुुसुमाग्रजांच्या जयंतीनिमित्त कविता दिनी मराठवाडा साहित्य परिषदेने आज सायंकाळी आयोजित केलेल्या कविसंमेलनात प्रेमकवितांचा अधिक सोस न बाळगता कवींनी धीरगंभीर कविता सादर केल्या. अगदी शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवर भाष्य करण्यापासून तर सध्याच्या सत्तेच्या राजकारणावर भाष्य करणाऱ्या कवितांनी मनाचा ठाव घेतला.मसापच्या डॉ. ना. गो. नांदापूरकर सभागृहात झालेल्या या कविसंमेलनाच्या अध्यक्षस्थानी श्रीधर नांदेडकर हे होते. समारोप करताना नांदेडकर यांनी ‘मराठीचा अभिमान बाळगत असतानाच इतर भाषांशीही मैत्री जपा. कवितेशी इमान राखा, असा सल्ला देत कवितेची मुक्ती माणसांपर्यंत पोहोचली पाहिजे, असा आग्रह धरला. त्यांनी सादर केलेल्या ‘ धूळफेक’ या कवितेच्या काही बोलक्या ओळी अशा :‘ धूळफेक करत,अभिनय करत,अनवाणी चालत,तुम्ही पोहोचलाच पुन्हासंसदेच्या पवित्र प्रवेशद्वारापाशीभावनांवर हुकुमत दाखवतपुन्हा भावुक व्हालप्रभू रामचंद्रांनीबहाल केलेला असेल तुम्हालासत्तेचा सुवर्ण मुकुटआणि गंजलेलं असलंलोखंडी असलं तरीहीकाळीज आहेच की दिलेलंमहाराज,संसदेच्या पायपुसण्यालाचाळीस वेळा पाय स्वच्छपुसाआपल्याच जवानांचं रक्तअसेल तळपायांना लागलेलंकवी रवी कोरडे यांनी ‘गळफासाची तयारी’ या कवितेत लिहिलेल्या ओळी अशा :‘ तू जेव्हा शेवटची तयारी करतोसपाय जमिनीपासून अधांतरी ठेवण्याचीतेव्हा अंगणातल्या खेळातलहानग्यांनी तुझ्यासाठीपूरणपोळीचा बेत केलेला असतो’नांदेडची कवयित्री सुचिता खल्लाळ यांनी तीन तुकड्यात सादर केलेल्या ‘कवीचा माफीनामा’ या कवितेने उत्स्फूर्त दाद मिळविली.माफक शब्दांची मोताज नसते कविताहा तुम्ही कोणता डाव मांडताहातहे तुम्ही कसे फासे फेकताहेतकवी लिहितो पाणीतर तुम्ही अमुकतमुक नदीचे नाव घेताकवी लिहितो रक्ततर तुम्ही फलान्या- बिस्तान्या जातीचा शिक्का मारताकवी लिहितो वारा, आभाळ, माती, आई, बाईतरी तुम्ही तोलता, तुकवता, नागवता कवीलादासू वैद्य, वीरा राठोड, विलास वैद्य, पी. विठ्ठल, अभय दाणी, योगिनी सातारकर, संदीप जगदाळे, वाल्मीक वाघमारे यांनी या संमेलनात भाग घेऊन प्रत्येकी दोन कविता सादर केल्या. प्रारंभी, मसापचे अध्यक्ष कौतिकराव ठाले यांनी प्रास्ताविक केले. डॉ. दादा गोरे यांनी कवींचे स्वागत केले. रामचंद्र काळुंखे यांनी आभार मानले. अस्लम मिर्झा यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादliteratureसाहित्य