शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
3
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
4
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
5
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
6
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
7
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
8
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
9
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
10
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
11
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
12
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
13
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
14
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
16
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
17
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
18
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
19
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
20
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख

‘ आपल्याच जवानांचं रक्त असेल तळपायांना लागलेलं’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2019 00:30 IST

कविवर्य कुुसुमाग्रजांच्या जयंतीनिमित्त कविता दिनी मराठवाडा साहित्य परिषदेने आज सायंकाळी आयोजित केलेल्या कविसंमेलनात प्रेमकवितांचा अधिक सोस न बाळगता कवींनी धीरगंभीर कविता सादर केल्या. अगदी शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवर भाष्य करण्यापासून तर सध्याच्या सत्तेच्या राजकारणावर भाष्य करणाऱ्या कवितांनी मनाचा ठाव घेतला.

ठळक मुद्देकविता दिन : मसापचे धीरगंभीर कविसंमेलन

औरंगाबाद : कविवर्य कुुसुमाग्रजांच्या जयंतीनिमित्त कविता दिनी मराठवाडा साहित्य परिषदेने आज सायंकाळी आयोजित केलेल्या कविसंमेलनात प्रेमकवितांचा अधिक सोस न बाळगता कवींनी धीरगंभीर कविता सादर केल्या. अगदी शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवर भाष्य करण्यापासून तर सध्याच्या सत्तेच्या राजकारणावर भाष्य करणाऱ्या कवितांनी मनाचा ठाव घेतला.मसापच्या डॉ. ना. गो. नांदापूरकर सभागृहात झालेल्या या कविसंमेलनाच्या अध्यक्षस्थानी श्रीधर नांदेडकर हे होते. समारोप करताना नांदेडकर यांनी ‘मराठीचा अभिमान बाळगत असतानाच इतर भाषांशीही मैत्री जपा. कवितेशी इमान राखा, असा सल्ला देत कवितेची मुक्ती माणसांपर्यंत पोहोचली पाहिजे, असा आग्रह धरला. त्यांनी सादर केलेल्या ‘ धूळफेक’ या कवितेच्या काही बोलक्या ओळी अशा :‘ धूळफेक करत,अभिनय करत,अनवाणी चालत,तुम्ही पोहोचलाच पुन्हासंसदेच्या पवित्र प्रवेशद्वारापाशीभावनांवर हुकुमत दाखवतपुन्हा भावुक व्हालप्रभू रामचंद्रांनीबहाल केलेला असेल तुम्हालासत्तेचा सुवर्ण मुकुटआणि गंजलेलं असलंलोखंडी असलं तरीहीकाळीज आहेच की दिलेलंमहाराज,संसदेच्या पायपुसण्यालाचाळीस वेळा पाय स्वच्छपुसाआपल्याच जवानांचं रक्तअसेल तळपायांना लागलेलंकवी रवी कोरडे यांनी ‘गळफासाची तयारी’ या कवितेत लिहिलेल्या ओळी अशा :‘ तू जेव्हा शेवटची तयारी करतोसपाय जमिनीपासून अधांतरी ठेवण्याचीतेव्हा अंगणातल्या खेळातलहानग्यांनी तुझ्यासाठीपूरणपोळीचा बेत केलेला असतो’नांदेडची कवयित्री सुचिता खल्लाळ यांनी तीन तुकड्यात सादर केलेल्या ‘कवीचा माफीनामा’ या कवितेने उत्स्फूर्त दाद मिळविली.माफक शब्दांची मोताज नसते कविताहा तुम्ही कोणता डाव मांडताहातहे तुम्ही कसे फासे फेकताहेतकवी लिहितो पाणीतर तुम्ही अमुकतमुक नदीचे नाव घेताकवी लिहितो रक्ततर तुम्ही फलान्या- बिस्तान्या जातीचा शिक्का मारताकवी लिहितो वारा, आभाळ, माती, आई, बाईतरी तुम्ही तोलता, तुकवता, नागवता कवीलादासू वैद्य, वीरा राठोड, विलास वैद्य, पी. विठ्ठल, अभय दाणी, योगिनी सातारकर, संदीप जगदाळे, वाल्मीक वाघमारे यांनी या संमेलनात भाग घेऊन प्रत्येकी दोन कविता सादर केल्या. प्रारंभी, मसापचे अध्यक्ष कौतिकराव ठाले यांनी प्रास्ताविक केले. डॉ. दादा गोरे यांनी कवींचे स्वागत केले. रामचंद्र काळुंखे यांनी आभार मानले. अस्लम मिर्झा यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादliteratureसाहित्य