शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
2
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
3
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
4
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
5
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
6
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
7
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
8
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
9
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
10
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
11
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
12
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
13
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
14
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
15
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)
16
जबरदस्त...! तब्बल 18.60 लाख रुपयांनी स्वस्त झाली अ‍ॅक्टर्स अन् नेत्यांच्या आवडीची ही ढासू SUV; आता किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या
17
Mohammad Nabi Fastest Fifty : एका षटकात ५ षटकार! युवीचा विक्रम आला होता धोक्यात, पण...
18
पालघर-डहाणूत ठाकरे गटाला खिंडार; सरपंच-उपसरपंच-पदाधिकारी शिवसेनेत, एकनाथ शिंदे म्हणाले...
19
Nuwan Thushara Unplayable Delivery : 'बेबी मलिंगा'ची कमाल! लेगला चेंडू टाकत उडवली ऑफ स्टंप (VIDEO)
20
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप

चालकाच्या मुजोरपणामुळे कळंबचे प्रवासी ताटकळले

By admin | Updated: February 26, 2017 00:42 IST

शिराढोण : कळंब तालुक्यातील शिराढोण येथील बसस्थानकात शनिवारी दुपारी आलेली लातूर आगाराची बस कळंबला न नेण्याचा पवित्रा चालकाने घेतल्याने काही काळ प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागला़

शिराढोण : कळंब तालुक्यातील शिराढोण येथील बसस्थानकात शनिवारी दुपारी आलेली लातूर आगाराची बस कळंबला न नेण्याचा पवित्रा चालकाने घेतल्याने काही काळ प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागला़ मोठ्या वादंगानंतर चालकाने बस पुढे कळंबकडे नेली़ या बसस्थानकात अवेळी येणाऱ्या बस आणि बंद झालेल्या काही बसेसमुळे प्रवाशांना तासंतास बसस्थानकात ‘लालपरी’ची वाट पहावी लागते़शिराढोण येथील बसस्थानकात कळंब डेपोच्या सहा आणि लातूर डेपोच्या पाच गाड्या धावतात. दिवसभरात एकूण ३० फेऱ्या होत असून, याद्वारे विविध मार्गावर वाहतूक करणारे प्रवाशी ये-जा करतात़ शनिवारी कळंबकडे जाण्यासाठी ११ ते ३ वाजेपर्यंत एकही बस आली नाही. या चार तासांच्या दरम्यान शेकडो प्रवासी ताटकळत बसची वाट पाहत होते. वाहतूक नियंत्रकाला प्रवासी बस कधी येणार याची विचारणा करीत होते. वाहतूक नियंत्रक दर अर्ध्यातासाला गाडी आहे़ परंतु आज गाडी आली नाही, येईल वाट पहा असे सांगत होते. प्रवाशांमध्ये शाळेतील विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिलांची संख्या मोठी होती. दुपारी अडीच वाजता लातूर डेपोची बस शिराढोण बसस्थानकात आली. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला़ मात्र, त्या गाडीच्या चालकाने बस परत लातूरला जाणार आहे, असे वाहतूक नियंत्रकांना सांगितल्यावर प्रवाशांनी गोंधळ घातला. वाहतूक नियंत्रकांनी ११ वाजल्यापासून कळंबला गाडी गेलेली नाही असे सांगितल्यानंतरही चालक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. वाहतूक नियंत्रकांनी आगार व्यवस्थापकांशी मोबाईलवरून संपर्क करून परिस्थिती कळविली. यावर कळंबच्या अगार व्यवस्थापकांनीही बसगाडी कळंबला पाठवा असे सांगितले. वाहतूक नियंत्रकांनी चालकाला बस कळंबला नेण्याबाबत लेखी दिले; तरीही लातूर डेपोचे चालक ‘मी लातूरला परत जाणार आहे’, याच भूमिकेवर ठाम होते. यामुळे प्रवासी, वाहतूक नियंत्रक व चालक यांच्यात जवळपास ३० मिनिटे गोंधळ सुरू होता. त्यानंतर चालकाने बस पुढे कळंबकडे नेली़ विशेष म्हणजे, यानंतर अवघ्या दहा मिनिटात एका पाठोपाठ एक अशा आणखी दोन गाड्या कळंबकडे जाण्यासाठी या स्थानकात दाखल झाल्या. सकाळी ११ पासून ३ वाजेपर्यंत कळंबकडे जाण्यासाठी एकही गाडी आली नाही़ परंतु तब्बल चार तासानंतर १५ मिनिटात एकापाठोपाठ एक अशा तीन गाड्या कळंबकडे धावल्या. अनियमित येणाऱ्या बसेसमुळे प्रवाशांना मात्र, गैरसोयीचा सामना करावा लागत आहे़ तरी वरिष्ठांनी याकडे लक्ष देऊन वेळेवर बसेस सोडाव्यात, अशी मागणी होत आहे़