शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

जायकवाडी धरणात पाणी सोडण्याचा आदेश रद्द करण्यासंदर्भात याचिका; दिवाळीच्या सुटीनंतर सुनावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2018 22:12 IST

वरच्या धरणांतून जायकवाडी धरणात पाणी सोडण्याचा गोदावरी महामंडळाच्या कार्यकारी संचालकांचा आदेश रद्द करण्याची विनंती करणाऱ्या याचिकांवर दिवाळी सुटीनंतर सुनावणी होणार आहे.

ठळक मुद्दे गोदावरी महामंडळाच्या कार्यकारी संचालकांच्या आदेशाला आव्हान

औरंगाबाद : वरच्या धरणांतून जायकवाडी धरणात पाणी सोडण्याचा गोदावरी महामंडळाच्या कार्यकारी संचालकांचा आदेश रद्द करण्याची विनंती करणाऱ्या याचिकांवर दिवाळी सुटीनंतर सुनावणी होणार आहे. यासंदर्भात तातडीने सुनावणी घेण्याची गरज नसल्याचे न्या. आर. एम. बोर्डे आणि न्या. मंगेश एस. पाटील यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले.सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी (दि.३१) जायकवाडी धरणात पाणी सोडण्यास विरोध करणारा डॉ. विठ्ठलराव विखे सहकारी साखर कारखान्याचा अर्ज (आयए) फेटाळून तातडीने पाणी सोडण्याचा आदेश दिला होता. मात्र, याचिकाकर्त्यांना गोदावरी महामंडळाच्या कार्यकारी संचालकांच्या २३ आॅक्टोबर २०१८ च्या आदेशाला योग्य त्या प्राधिकरणापुढे आव्हान देण्याची मुभा दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाचा ३१ आॅक्टोबरचा आदेश खंडपीठात सादर करून २३ आॅक्टोबर २०१८ चा वरच्या धरणांतून जायकवाडी धरणात पाणी सोडण्याचा आदेश रद्द करण्याची विनंती प्रवरा सहकारी साखर कारखान्यासह आणखी एका याचिकाकर्त्याने केली होती.मात्र, राज्य शासनातर्फे मुख्य सरकारी वकील अमरजितसिंह गिरासे यांनी वरील याचिकांवर सुनावणी घेण्यास विरोध केला. त्यांनी खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिले की, दोन दिवसांपूर्वीच वरीलप्रमाणे विनंती करणाºया याचिका खंडपीठात दाखल करण्यात आल्या होत्या. मात्र, त्याबाबत तातडीने सुनावणी घेण्याची गरज नसल्याचे स्पष्ट करीत खंडपीठाने त्या याचिकांवर दिवाळी सुटीनंतर सुनावणी घेण्याचे यापूर्वीच स्पष्ट केले आहे.दरम्यान, गोदावरी महामंडळाचे कार्यकारी संचालक अजय कोहिरकर यांनी गोदावरी मराठवाडा विकास महामंडळाच्या वतीने गुरुवारी (दि.१) औरंगाबाद खंडपीठात ‘कॅव्हेट’ दाखल केले. सर्वोच्च न्यायालयाच्या ३१ आॅक्टोबरच्या आदेशाच्या अनुषंगाने जायकवाडी धरणात पाणी सोडण्याच्या २३ आॅक्टोबरच्या आदेशाला विरोध करणारी अथवा पाणी सोडण्यास विरोध करणारी याचिका दाखल झाल्यास महामंडळाचे म्हणणे ऐकल्याशिवाय कोणताही अंतिम आदेश करूनये, अशी विनंती ‘कॅव्हेट’द्वारे महामंडळाच्या वतीने अ‍ॅड. चैताली चौधरी-कुट्टी यांनी केली आहे.

टॅग्स :WaterपाणीCourtन्यायालय