शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
2
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
3
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
4
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
5
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड
6
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
7
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
8
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
9
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
10
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?
11
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
12
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
13
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
14
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
15
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
16
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
17
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
18
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
19
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
20
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती

विद्यापीठात रिक्त जागांसाठीच घेणार ‘पेट’

By | Updated: December 5, 2020 04:08 IST

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने जानेवारी अखेरपर्यंत पीएच.डी. प्रवेशपूर्व परीक्षा (पेट) घेण्याची तयारी सुरू केली असून मार्गदर्शकांकडे ...

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने जानेवारी अखेरपर्यंत पीएच.डी. प्रवेशपूर्व परीक्षा (पेट) घेण्याची तयारी सुरू केली असून मार्गदर्शकांकडे संशोधक विद्यार्थ्यांच्या जेवढ्या जागा रिक्त आहेत, तेवढ्याच जागांसाठी ‘पेट’ घेण्याचा महत्वपूर्ण निर्णय अधिष्ठाता मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

मागील चार वर्षांपूर्वी चौथी ‘पेट’ झाली होती. त्यानंतर आजवर ‘पेट’ घेण्यासाठी विद्यापीठाला मुहूर्त सापडला नाही. तथापि, विद्यमान कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी नवीन वर्षात पाचवी ‘पेट’ घेऊन त्यामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी काही निर्णय घेतले आहेत. त्यामध्ये पीएच.डी. संदर्भात विद्यापीठ अनुदान आयोगाने जारी केलेल्या अध्यादेशानुसार ज्या महाविद्यालयांमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रम शिकवला जातो. तेथे पदव्युत्तर अभ्यासक्रम शिकवणारे मान्यता प्राध्यापक आहेत व तेथे संशोधन केंद्र आहे, अशाच महाविद्यालयातील मार्गदर्शकांकडे विद्यार्थ्यांना संशोधनाची परवानगी असेल. या अध्यादेशामध्ये लवचिकता आणण्यासाठी कुलगुरुंनी प्रकुलगुरूंच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीच्या आतापर्यंत दोन बैठका झाल्या असून येत्या ९ डिसेंबर रोजी होणाऱ्या अंतिम बैठकीत विद्यार्थीहिताचे निर्णय घेतले जाणार आहेत.

डिसेंबर अखेरपर्यंत सर्व विद्याशाखांच्या संशोधन अधिमान्यता समितीच्या (आरआरसी) बैठका घेऊन पीएच.डी.च्या रिक्त जागांचा आढावा घेतला जाणार आहे. त्यानुसार विद्यापीठ व महाविद्यालयीन मार्गदर्शकांकडे संशोधनासाठी रिक्त जागांची माहिती समोर येईल व विषयांनुसार रिक्त जागांसाठीच पेट घेतली जाईल. विद्यापीठात काही असेही विषय आहेत. त्याविषयांत विद्यार्थी संशोधन करण्यास इच्छुक आहेत; पण त्या विषयांसाठी पूर्णवेळ प्राध्यापक नाहीत. काही विषयांसाठी मार्गदर्शकही नाहीत, असे विषय ‘पेट’मधून वगळण्यासाठीही या बैठकीत चर्चा झाली.

चौकट........

२० डिसेंबरपर्यंत अधिसूचना निघेल

यासंदर्भात प्रकुलगुरु डॉ. श्याम शिरसाठ यांनी सांगितले की, जानेवारीअखेरपर्यंत ‘पेट’ घेतली जाईल. तत्पूर्वी, विषयनिहाय संशोधक विद्यार्थी व मार्गदर्शकांची उपलब्धता यांची माहिती संकलित केली जाईल. त्यानंतर साधारणपणे २० डिसेंबरपर्यंत ‘पेट’ बाबत अधिसूचना जाहीर केली जाईल. अधिसूचना जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना महिनाभराचा अवधी द्यावा लागतो. त्यानंतर ती परीक्षा घेण्याचे विद्यापीठाचे प्रयत्न आहेत.