शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
2
पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत
3
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
4
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
5
उद्या देशभरात 'सिव्हिल डिफेंस मॉक ड्रिल' होणार, राज्यांकडून अहवाल मागवले
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
7
संपादकीय: परीक्षा हे सर्वस्व नव्हे !
8
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
9
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
10
नहीं होगा, नहीं होगा... कुंभ में स्नान नहीं होगा?
11
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
12
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
13
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
14
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची
15
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी, डीजीपींनी एसआयटी नेमावी : कोर्ट
16
गायत्री पन्हाळकरला मराठीत शंभर गुण; राज्यात प्रथम : वाणिज्य शाखेत ८७ टक्के गुण
17
मुंबईकरांना दिलासा, पाणीपुरवठ्यात कपात नाही
18
२० वर्षांपूर्वी बांगलादेशमधून तो आला; नवी मुंबईतील महिलेशी संसार थाटला 
19
नवजात अर्भकांचे लसीकरण प्रसूती विभागातच करा; राज्य सरकारच्या सूचना, लागू होणार नवे नियम
20
२१०० रुपये लाडक्या बहिणींना देणे अशक्य! संजय शिरसाट निधी कापला म्हणून अजित पवारांवर संतापले

पाणंदमुक्तीसाठी लोकसहभाग चळवळ

By admin | Updated: May 7, 2017 00:02 IST

गेवराई : स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत गेवराई नगर पालिकेचे ८७ टक्के काम वर्षभरात पूर्ण करण्याची किमया सीओ भागवत बिघोत यांनी करून दाखवली आहे

लोकमत न्यूज नेटवर्कगेवराई : स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत गेवराई नगर पालिकेचे ८७ टक्के काम वर्षभरात पूर्ण करण्याची किमया सीओ भागवत बिघोत यांनी करून दाखवली आहे. शासन योजना लोकसहभागाशिवाय पूर्ण होऊ शकणार नाही हे लक्षात घेऊन गेवराईतील प्रत्येक कुटुंबाला भेट देऊन बिघोत यांनी जून २०१६ मध्ये काम सुरू केले.गेवराई शहराची लोकसंख्या ३५ हजाराच्या आसपास आहे. जून २०१६ ला भागवत बिघोत यांनी गेवराई नगरपालिकेचा सीओ पदाचा पदभार स्वीकारला. बिघोत यांनी परभणी विद्यापीठातून पदवीचे शिक्षण घेतले आहे. पूर्वी त्यांनी फौजदार म्हणूनही काम केलेले आहे. समन्वय साधत काम करण्याची त्यांची हातोटी आहे. फौजदारपदाचा राजीनामा देऊन त्यांनी गेवराई येथे ते सीओ म्हणून रुजू झाले. स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत गेवराई शहरामध्ये २१६० शौचालये बांधण्याचे त्यांना उद्दिष्ट दिले होते. गेवराई शहराला पाणंदमुक्त करण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर होते. सुरूवातीला त्यांनी कर्मचारी व नगरसेवक यांच्याशी समन्वय साधत शहरातील प्रत्येक कुटुंबाच्या घरी जाऊन भेटी दिल्या. नागरिकांशी चर्चा करून शौचालयाचे महत्त्व पटवून दिले. बिघोत व त्यांचे कर्मचारी दररोजी सकाळी दोन तास शहराचा फेरफटका मारत. उघड्यावर प्रात:र्विधी करणाऱ्यांना शौचालयाचे महत्त्व पटवून देत बांधण्यासाठी प्रोत्साहित करीत असत. पाहता पाहता त्यांनी गेवराई शहरात केवळ एका वर्षात १८८० शौचालयांचे उद्दिष्ट पूर्ण केले आहे. उर्वरित २८० शौचालयांचे काम प्रगतीपथावर असून, जून अखेरपर्यंत हे काम पूर्ण होणार असल्याचे त्यांनी सांगितले.लोकसहभागाबद्दल विचारले असता ते म्हणाले, शासनाची योजना लोकसहभागाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळे काम करताना लोकांचा व लोकप्रतिनिधींचा विश्वास संपादन करणे हेच महत्त्वाचे आहे. त्याशिवाय कामे मार्गी लागत नाहीत.